शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

‘नाफेड’ने दोन हजार दराने कांदा खरेदी करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 23:55 IST

सिन्नर : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने नाफेडमार्फत ७०० ते ९०० रुपये दराने कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या दरात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघणार नसल्याने नाफेडने दोन हजार रुपये प्रतिक्विंंटल दराने शेतकºयांकडून कांदा खरेदी करावा, अशी मागणी सिन्नर बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ भिसे यांनी केली आहे.

सिन्नर : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने नाफेडमार्फत ७०० ते ९०० रुपये दराने कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या दरात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघणार नसल्याने नाफेडने दोन हजार रुपये प्रतिक्विंंटल दराने शेतकºयांकडून कांदा खरेदी करावा, अशी मागणी सिन्नर बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ भिसे यांनी केली आहे.राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी दरातील चढउतार आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान यामुळे मेटाकुटीला आला आहे. प्रतिकूल परिस्थितीत कांद्याचे उत्पन्न घ्यायचे आणि बाजारात मातीमोल किमतीला तो विकायचा. यातून उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकºयांवर आर्थिक नुकसान सोसण्याची वेळ आली आहे. सद्यस्थितीत उन्हाळ कांदा बाजारात विक्रीसाठी येत असून, ४०० ते ९०० रुपये दराने तो खरेदी केला जात आहे. यामुळे होणाºया नुकसानीमुळे शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासनाने नाफेडमार्फत कांदा खरेदी करण्याची घोषणा केली आहे. ही खरेदी ५०० ते ९०० रुपये प्रतिक्विंंटल दराने करण्यात येईल, असे सांगितले जाते. वास्तविक क्विंंटलभर कांदा उत्पादन करायचा म्हटला तरी साधारणपणे दीड हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. खते, बी-बियाणे मशागतीसाठी मजूर अशी तजवीज केल्यावर वेळेवर पाणी देण्यासाठी शेतकºयांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. एवढे कष्ट उपसल्यावर हाताशी आलेले उत्पादन जर ४०० ते ९०० रुपयांपर्यंत खरेदी केले जात असेल तर शेती न केलेली बरी अशी शेतकºयाची धारणा झाली आहे. शेतकºयाचा कांदा लागवडीचा खर्च भरून निघावा व त्याच्या हाती दोन पैसे वाढवून मिळावेत यासाठी शासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.----------------------------------नाफेड मार्फत कमी दराने कांदा खरेदी करून शासन शेतकºयांची थट्टा करत आहे, असा आरोप भिसे यांनी केला आहे. कांदा उत्पादक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी नाफेडमार्फत होणारी कांदा खरेदी २००० रुपये प्रतिक्विंंटल दराने करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक