शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

नाफेडचा कांदा दिल्ली, भुवनेश्वरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:07 IST

शेखर देसाई।लासलगाव : कांदा भावात स्थिरता यावी यासाठी नाफेडने एप्रिल ते आॅगस्ट २०१८ या कालावधीत खरेदी केलेल्या १३ हजार ५०० मेट्रिक टन कांदा आता आठ ते दहा दिवसांपासून दिल्ली, आझादनगर, भुवनेश्वर या ठिकाणी पाठवण्यात येत असल्याची माहिती नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. दरम्यान, सहा महिन्यांपासून हा ...

ठळक मुद्देवातावरण बदलाचा फटका : दररोज १५ ते २० टक्क्यांपर्यंत नुकसान

शेखर देसाई।लासलगाव : कांदा भावात स्थिरता यावी यासाठी नाफेडने एप्रिल ते आॅगस्ट २०१८ या कालावधीत खरेदी केलेल्या १३ हजार ५०० मेट्रिक टन कांदा आता आठ ते दहा दिवसांपासून दिल्ली, आझादनगर, भुवनेश्वर या ठिकाणी पाठवण्यात येत असल्याची माहिती नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. दरम्यान, सहा महिन्यांपासून हा कांदा खरेदी होत असल्याने त्यामध्ये दररोज होणाऱ्या वातावरणाच्या बदलामुळे १५ ते २० टक्क्यांपर्यंत घट आणि नुकसान होत आहे. ज्यावेळी संपूर्ण चाळीमधून कांदा बाहेर काढण्यात येईल त्यावेळेसच नुकसानीची आकडेवारी समोर येईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.कांद्याच्या भावात चढ-उतार झाल्यानंतर समतोल ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने नाफेड मार्फत कांदा स्थिरीकरण फंड अंतर्गत कांदा खरेदी दर वर्षी करण्यात येते. या वर्षी २५ हजार मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट होते. त्यानुसार नाफेडने साडेतेरा हजार मेट्रिक टन कांदा खरेदी केला होता. तो आता विविध राज्यात नाफेडचे तसेच मद्यथेअरीमार्फत पाठविला जात आहे. कांद्याचे घसरते दर आटोक्यात राहावे व ग्राहकाला योग्य दरात कांदा उपलब्ध व्हावा, या हेतूने तसेच कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नाफेडमार्फत किंमत स्थिरीकरण निधीच्या माध्यमातून २५ हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात आतापर्यंत तब्बल १३ कोटी रु पये खर्च करून १३ हजार ५०० मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला आहे. शेतमालाच्या दरातील घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने स्वामीनाथन आयोगाने सुचविलेल्या भाव स्थिरीकरण निधी योजनेसाठी मोठी आर्थिक तरतूद केली. त्यातून या वर्षी २५ हजार मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट आहे. घाऊक बाजारात भाव घसरू नयेत, म्हणून नाशिक,नगर, पुणे जिल्ह्यातील बाजार समित्यांमधून नाफेडने हा कांदा खरेदी केला आहे. केंद्र सरकारने नाफेडमार्फत किंमत स्थिरीकरण निधीच्या माध्यमातून खरेदी केलेला कांदा रवाना करण्यासाठी चाळीतून बाहेर काढला जात आहे. यातील वजनातील घट व हवामानाचा परिणाम यामुळे कांदा किती खराब निघतो हे लवकरच समजेल.- नानासाहेब पाटीलसंचालक, नाफेड