शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

मविप्र नाशिक : नऊ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना समारंभपुर्वक पदवीप्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 18:18 IST

मराठा विद्या प्रसारक समाजाच्या तृतीय पदवीप्रदान सोहळ्याचे. गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात सोमवारी (दि.१२) पार पडलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

ठळक मुद्दे माहिती-तंत्रज्ञानाची कास धरणे आवश्यक आहेमविप्र संस्थेच्या नऊ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना चव्हाण यांच्या हस्ते पदवीप्रदान

नाशिक : आपण समाजासाठी आपल्या ज्ञानाचा कितपत उपयोग करतो, याचे आत्मपरीक्षण पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी करावे. आपला सर्वांगीण विकास शिक्षणाच्या माध्यमातून साधताना समाजाच्या जडणघडणीसाठी आत्मसात केलेल्या ज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडलाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना केले.निमित्त होते, मराठा विद्या प्रसारक समाजाच्या तृतीय पदवीप्रदान सोहळ्याचे. गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात सोमवारी (दि.१२) पार पडलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार होत्या. तसेच नाना महाले, भाऊसाहेब खातळे, सचिन पिंगळे, हेमंत वाजे, प्रा. नानासाहेब दाते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी चव्हाण म्हणाले, स्पर्धेच्या या युगात स्वत:ला टिकवून सिद्ध करण्यासाठी अभ्यासासोबत माहिती-तंत्रज्ञानाची कास धरणे आवश्यक आहे. एकूण आपले व्यक्तिमत्त्व ‘स्मार्ट’ करण्यावर भर द्यावा.यावेळी विद्यापीठामध्ये विशेष गुणवत्ता प्राप्त मविप्र संस्थेच्या नऊ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना चव्हाण यांच्या हस्ते पदवीप्रदान करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी पदवीग्रहण क रण्याप्रसंगी असलेला विशेष गणवेश परिधान केला होता. याबरोबरच व्यासपीठावर मान्यवरांनीही पदवीदान करतानाचा गणवेश परिधान केला होता. मंगेश पाडगावकर लिखित ‘ज्ञान बनो कर्मशील, कर्म ज्ञानवान’ या विद्यापीठ गीताने पदवीप्रदान सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला. सूत्रसंचालन तुषार पाटील व डॉ. सुरेश जाधव यांनी केले. सिडको महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांनी आभार मानले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिक