शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

येवल्यात मुस्लीम महिलांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 22:08 IST

येवला : केंद्राच्या तिहेरी तलाक विधेयकाविरोधात येवल्यात मुस्लीम महिलांनी बुधवारी मूक मोर्चा काढत प्रांताधिकारी व तहसीलदारांना निवेदन दिले. सकाळी ११ वाजता पट्टनवाली मशिदीपासून आईना मशीद, आझाद चौक, काळा मारुती रोड, गंगा दरवाजा मार्गे हा मुस्लीम महिलांचा मोर्चा येवला तहसील व प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चात सहभागी हजारो महिलांनी मूक मोर्चा काढत तिहेरी तलाक विधेयक रद्द करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देकेंद्राच्या निर्णयाला विरोध तिहेरी तलाक विधेयक रद्द करण्याची मागणी

येवला : केंद्राच्या तिहेरी तलाक विधेयकाविरोधात येवल्यात मुस्लीम महिलांनी बुधवारी मूक मोर्चा काढत प्रांताधिकारी व तहसीलदारांना निवेदन दिले. सकाळी ११ वाजता पट्टनवाली मशिदीपासून आईना मशीद, आझाद चौक, काळा मारुती रोड, गंगा दरवाजा मार्गे हा मुस्लीम महिलांचा मोर्चा येवला तहसील व प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चात सहभागी हजारो महिलांनी मूक मोर्चा काढत तिहेरी तलाक विधेयक रद्द करण्याची मागणी केली.या मागणीचे निवेदन तहसीलदार व प्रांताधिकारी यांना दिले. तिहेरी तलाक रद्द करण्याचा निर्णय केवळ राजकीय स्वार्थासाठी घेण्यात आलेला असून, तातडीने हे विधेयक मागे घ्यावे, अशी मागणी या मोर्चात मुस्लीम महिलांनी केली. आम्ही शरीयतला बाध्य आहोत, शरीयतवर आमचा संपूर्ण विश्वास आहे, ट्रिपल तलाक बिल रद्द करा, शरीयतमध्ये कोणाचा हस्तक्षेप नको, सहानुभूतीच्या नावावर आमचा विश्वासघात केल्याने सरकारच्या या निर्णयाचा आम्ही निषेध करतो. शरीयतमुळे मुस्लीम महिला पूर्ण सुरक्षित अशा आशयाचे फलक महिलांच्या हातात होते.प्रांताधिकारी भीमराज दराडे व तहसीलदार नरेश बहिरम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहर काजी राफीउद्दीनसह उलेमा धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते. केंद्रीय मंत्रिमंडळाने तिहेरी तलाक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे विधेयक लोकसभेत मंजूर झाले असून राज्यसभेत हे विधेयक मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत आहे. तिहेरी तलाक रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयाला मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने विरोध दर्शविला आहे. दरम्यान, तिहेरी तलाक विधेयक रद्दकरण्याच्या मागणीसाठी आंदोलन छेडण्यात आले असून, या विरोधात हजारो मुस्लीम महिलांनी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला होता. तीन तलाकचा घेतलेला निर्णय हा शरीयत विरोधात आणि अन्यायकारक असून, त्याचे समर्थन होऊ शकत नाही. भारतीय संविधानाने सर्व धर्मांना आपल्या धर्मांनुसार आचरण करण्याचा अधिकार दिलेला असताना केवळ मतांच्या राजकारणासाठी सरकारने तीन तलाकचे बिल आणले आहे, हे आम्ही कदापि मान्य करणार नाही. त्यामुळे हे बिल रद्द करावे, अशी प्रतिक्रि या महिलांनी व्यक्त केली.

तीन तलाक बिल विरोधातील मागण्या...

शरीयत कायद्यामधील सरकारचा हस्तक्षेप मंजूर नाही.तीन तलाक बिल सरकारने रद्द करावे.शरीयत कायद्यावर संपूर्ण विश्वास. 

मोर्चात हजारो महिलांनी उपस्थित राहून सरकार विरोधात निषेध नोंदवला.शैक्षणिक व आर्थिक सुविधांपासून वंचित.