शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
4
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
5
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
6
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं कौतुक
7
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
8
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
9
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
10
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
11
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
12
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
13
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
14
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
15
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
16
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
17
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
18
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
19
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
20
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार

कोटबेल येथे वृद्ध शेतकऱ्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:17 IST

नाशिक : बागलाण तालुक्यात शेत शिवारात राहणाऱ्या एका वृद्ध शेतकऱ्याची तीन तरुणांनी कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्याची खळबळजनक घटना ...

नाशिक : बागलाण तालुक्यात शेत शिवारात राहणाऱ्या एका वृद्ध शेतकऱ्याची तीन तरुणांनी कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि. २२) पहाटे कोटबेल येथील घुबडदरा शिवारात उघडकीस आली. याप्रकरणी जायखेडा पोलिसांना एका संशयित आरोपीला जेरबंद करण्यात यश आले आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी खुनाची सुपारी दिली असल्याची दबक्या आवाजात चर्चा होत आहे.

तालुक्यातील कोटबेल येथील सहादू रामचंद्र खैरनार (वय ७७) असे खून झालेल्या वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. सहादू खैरनार यांना मूलबाळ नसल्याने ते आपल्या पत्नीसमवेत कोटबेलच्या घुबडदरा शिवारात राहत होते. गुरुवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पती-पत्नी झोपेत असताना दोन अज्ञात व्यक्ती त्यांच्या घराचा दरवाजा तोडून घरात घुसले. खैरनार यांच्या पत्नीने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मारहाण करून त्यांच्या तोंडात कापडाचे बोळे घातले. त्यानंतर सहादू खैरनार यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातले. वर्मी घाव लागल्याने खैरनार जागीच ठार झाले. खैरनार मृत झाल्याची खात्री करून तिघे हल्लेखोर पसार झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नीने आरडाओरडा केल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी खैरनार यांच्या घराकडे धाव घेतली असता सहादू खैरनार रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचे आढळून आल्याने जमलेल्या शेतकऱ्यांनी पोलीस पाटील साहेबराव कांदळकर यांना घटनेची माहिती दिली. कांदळकर यांनीही कोणताही विलंब न लावता जायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांना माहिती दिल्याने तपासाची चक्रे शीघ्र गतीने फिरून संपूर्ण परिसर पिंजून काढत एकाला पकडण्यात यश आले, तर दोघे मात्र पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाले.

इन्फो

पूर्ववैमनस्यातून घटना?

संशयित आरोपी अवघ्या वीस वर्षांचा असून, पंकज चौधरी असे त्याचे नाव आहे. तो धुळे जिल्ह्यातील नेर येथील रहिवासी असून, त्याचे अन्य साथीदार देखील त्याच वयोगटातील असल्याची माहिती समोर येत आहे.

याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सायंकाळी उशिरा मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, खैरनार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी शेतजमीन विक्री केली होती. व्यवहार देखील पूर्ण झालेला नव्हता. हल्लेखोरांनी पैशांची कोणतीही मागणी न केल्याने या खुनामागे पूर्ववैमनस्य असल्याचे बोलले जात आहे.