शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

मनपाचे हॉकर्स झोन कायद्याच्या कचाट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:32 IST

शहरातील मुख्य रहदारीचे रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिकेने तयार केलेले हॉकर्स झोन कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. यासंदर्भात माजी आमदार आणि ज्येष्ठ वकील विलास लोणारी यांनी महापालिकेला नोटीस बजावली आहे. त्यावर प्रशासनाने अद्याप काही उत्तर दिले नसल्याने आता हा वाद न्यायलयात नेण्याची पूर्ण तयारी लोणारी यांनी केली आहे.

नाशिक : शहरातील मुख्य रहदारीचे रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिकेने तयार केलेले हॉकर्स झोन कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. यासंदर्भात माजी आमदार आणि ज्येष्ठ वकील विलास लोणारी यांनी महापालिकेला नोटीस बजावली आहे. त्यावर प्रशासनाने अद्याप काही उत्तर दिले नसल्याने आता हा वाद न्यायलयात नेण्याची पूर्ण तयारी लोणारी यांनी केली आहे.  शहरात बेसुमार वाढत्या अतिक्रमणांचा प्रश्न सोडविण्याची गरज होती. त्यातच उच्च न्यायालयानेदेखील शहरांमध्ये हॉकर्स झोन करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गेल्या अनेक वर्षांपासून महापालिका यासंदर्भातील रचना करीत होती. बºयाच भवती न भवतीनंतर ते जाहीर झाले असले तरी आता त्याची अंमलबजावणी अनेक ठिकाणी अडचणीची झाली आहे. विशेषत: महापालिकेने मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवली असली तरी त्यांना नागरी वसाहतीत विशेषत: कॉलनी रोडवर जागा दिल्याने वादाचा विषय ठरला आहे. पंचवटीत चक्क काळाराम मंदिराच्या समोरच हॉकर्सला जागा देऊन महापालिकेने पर्यटनासाठी येणाºयांसाठी अतिक्रमणांचे दर्शन घडविल्याचा आरोप होत आहे. के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या बाजूच्या परिसरात तर तब्बल साडेतीनशे टपºया वसविण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात येत आहे. डिसूझा कॉलनी परिसरात तर चक्क कॉलनी रोडवरच पंधरा टपºया मांडण्यात आल्या आहेत.  महापालिकेने रस्ते मुक्त करताना कोणते निकष लावले आहेत, याचाच उलगडा होत नसल्याने येथील रहिवासी आणि माजी आमदार अ‍ॅड. विलास लोणारी यांनी महापालिकेला नोटीस बजावून याबाबत विचारणा केली आहे. मात्र, अद्यापही महापालिकेकडून त्यांना प्रत्युत्तर आले नसून त्यांनी आता न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. मनपाच्या अशाप्रकारच्या स्थलांतर योजनांचा आजवरचा अनुभव फार चांगला नाही. महापालिकेने घरकुल योजना राबविताना झोपडपट्टीमुक्त शहर असा संकल्प केला होता. मात्र, घरकुले घेऊन तेथे पोटभाडेकरू ठेवणाºया अनेकांनी मूळ झोपडपट्ट्या सोडल्या नाहीत. त्यामुळे कोठेही झोपडपट्ट्या हटल्याचे चित्र दिसत नाही. हॉकर्स झोन हे महापालिकेने केले खरे, परंतु खरोखरीच संबंधित स्थलांतरित होऊन रस्ते मोकळे होतील काय. असा प्रश्नही या निमित्ताने चर्चिला जात आहे.