शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

महापालिकेचे स्मार्ट कार्ड : मोफत असूनही योजनेचा फज्जा काढले पन्नास हजार, वाटले अवघे शंभर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 02:04 IST

नाशिक : कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने सहा-सात महिन्यांपूर्वी येस बॅँकेच्या संयुक्त विद्यमाने नियमित कर भरणाऱ्या ५० हजार नागरिकांना मोफत प्रीपेड स्मार्ट कार्ड वितरित करण्याची योजना आणली.

ठळक मुद्देस्मार्ट कार्डचा पुरता फज्जा उडालावाटप विभागीय कार्यालयांमधून सुरू करण्यात आले

नाशिक : कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने सहा-सात महिन्यांपूर्वी येस बॅँकेच्या संयुक्त विद्यमाने नियमित कर भरणाऱ्या ५० हजार नागरिकांना मोफत प्रीपेड स्मार्ट कार्ड वितरित करण्याची योजना आणली. परंतु, सहाही विभागांत अवघ्या शंभर नागरिकांनीच स्मार्ट कार्डला प्रतिसाद दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, स्मार्ट कार्डचा पुरता फज्जा उडाला आहे.महापालिकेचे माजी आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या काळात येस बँकेच्या सहयोगाने नागरी सुविधा केंद्रे सुरू करण्यात आली. त्यापाठोपाठ बॅँकेच्या सहकार्याने कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी करदात्या भाग्यवान ५० हजार नागरिकांना प्रीपेड स्मार्ट कार्ड मोफत देण्याची योजना आणली गेली. त्यानुसार, महापालिकेने नियमित कर भरणा करणाºया नागरिकांमधून ५० हजार लोकांची निवड करून त्यांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर विभागनिहाय प्रसिद्ध केली. त्याचे वाटप विभागीय कार्यालयांमधून सुरूही करण्यात आले. परंतु, गेल्या सहा-सात महिन्यांत सहाही विभागांतून अवघ्या १०० नागरिकांनाच स्मार्ट कार्डचे वाटप होऊ शकले असून, अनेक नागरिकांनी ते मोफत असूनही नाकारले असल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक आपल्याला स्मार्ट कार्ड मोफत मिळणार आहे, याची खबर संबंधित निवड झालेल्या नागरिकांपर्यंत जाऊन पोहोचविण्यात आली नाही. सदर स्मार्ट कार्ड संबंधीची माहिती देणारे एसएमएस निवड झालेल्या नागरिकांच्या मोबाइलवर पाठविले जाणार असल्याचे महापालिकेकडून सांगितले गेले. परंतु, तशीही कार्यवाही झाल्याचे दिसून आली नाही. स्मार्ट कार्डकरिता नागरिकांना केवायसी कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार होती. केवायसीकरिता आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले होते. त्यासाठी रजिस्ट्रेशन प्रक्रियेकरिता नागरिकांना मोबाइल क्रमांक द्यावा लागणार होता. निवड करण्यात आलेल्या नागरिकांना आधार कार्डसह कार्ड प्रदान डेस्कवर समक्ष उपस्थित राहावे लागणार होते. त्यानंतर डेस्कवर आधार कार्डाची नोंदणी तसेच स्कॅनिंग व अपलोडिंग केले जाणार होते. केवायसीकरिता दिलेल्या कागदपत्रांची छाननी येस बँकेच्या केवायसी पडताळणी टीमकडून झाल्यानंतर कार्ड सक्रि य केले जाणार होते. शिवाय, नागरिकांना देण्यात येणारे कार्ड हे प्रीपेड असल्याने नागरिकांना ते रिचार्ज करावे लागणार होते. कार्ड मोफत देणार असले तरी नागरिकांना बॅँक खात्यात ठराविक रक्कम ठेवावी लागणार होती. एवढा सारा द्राविडी प्राणायाम करण्याऐवजी नागरिकांनी सदर कार्ड मोफत असूनही त्याला प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे, सहाही विभागांत पन्नास हजार नागरिकांमधून अवघे शंभर नागरिकच लाभार्थी ठरले असून, त्यातही अनेकांना बळजबरीने कार्ड दिल्याची चर्चा आहे.