शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

महापालिकेचे स्मार्ट कार्ड : मोफत असूनही योजनेचा फज्जा काढले पन्नास हजार, वाटले अवघे शंभर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 02:04 IST

नाशिक : कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने सहा-सात महिन्यांपूर्वी येस बॅँकेच्या संयुक्त विद्यमाने नियमित कर भरणाऱ्या ५० हजार नागरिकांना मोफत प्रीपेड स्मार्ट कार्ड वितरित करण्याची योजना आणली.

ठळक मुद्देस्मार्ट कार्डचा पुरता फज्जा उडालावाटप विभागीय कार्यालयांमधून सुरू करण्यात आले

नाशिक : कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने सहा-सात महिन्यांपूर्वी येस बॅँकेच्या संयुक्त विद्यमाने नियमित कर भरणाऱ्या ५० हजार नागरिकांना मोफत प्रीपेड स्मार्ट कार्ड वितरित करण्याची योजना आणली. परंतु, सहाही विभागांत अवघ्या शंभर नागरिकांनीच स्मार्ट कार्डला प्रतिसाद दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, स्मार्ट कार्डचा पुरता फज्जा उडाला आहे.महापालिकेचे माजी आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या काळात येस बँकेच्या सहयोगाने नागरी सुविधा केंद्रे सुरू करण्यात आली. त्यापाठोपाठ बॅँकेच्या सहकार्याने कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी करदात्या भाग्यवान ५० हजार नागरिकांना प्रीपेड स्मार्ट कार्ड मोफत देण्याची योजना आणली गेली. त्यानुसार, महापालिकेने नियमित कर भरणा करणाºया नागरिकांमधून ५० हजार लोकांची निवड करून त्यांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर विभागनिहाय प्रसिद्ध केली. त्याचे वाटप विभागीय कार्यालयांमधून सुरूही करण्यात आले. परंतु, गेल्या सहा-सात महिन्यांत सहाही विभागांतून अवघ्या १०० नागरिकांनाच स्मार्ट कार्डचे वाटप होऊ शकले असून, अनेक नागरिकांनी ते मोफत असूनही नाकारले असल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक आपल्याला स्मार्ट कार्ड मोफत मिळणार आहे, याची खबर संबंधित निवड झालेल्या नागरिकांपर्यंत जाऊन पोहोचविण्यात आली नाही. सदर स्मार्ट कार्ड संबंधीची माहिती देणारे एसएमएस निवड झालेल्या नागरिकांच्या मोबाइलवर पाठविले जाणार असल्याचे महापालिकेकडून सांगितले गेले. परंतु, तशीही कार्यवाही झाल्याचे दिसून आली नाही. स्मार्ट कार्डकरिता नागरिकांना केवायसी कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार होती. केवायसीकरिता आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले होते. त्यासाठी रजिस्ट्रेशन प्रक्रियेकरिता नागरिकांना मोबाइल क्रमांक द्यावा लागणार होता. निवड करण्यात आलेल्या नागरिकांना आधार कार्डसह कार्ड प्रदान डेस्कवर समक्ष उपस्थित राहावे लागणार होते. त्यानंतर डेस्कवर आधार कार्डाची नोंदणी तसेच स्कॅनिंग व अपलोडिंग केले जाणार होते. केवायसीकरिता दिलेल्या कागदपत्रांची छाननी येस बँकेच्या केवायसी पडताळणी टीमकडून झाल्यानंतर कार्ड सक्रि य केले जाणार होते. शिवाय, नागरिकांना देण्यात येणारे कार्ड हे प्रीपेड असल्याने नागरिकांना ते रिचार्ज करावे लागणार होते. कार्ड मोफत देणार असले तरी नागरिकांना बॅँक खात्यात ठराविक रक्कम ठेवावी लागणार होती. एवढा सारा द्राविडी प्राणायाम करण्याऐवजी नागरिकांनी सदर कार्ड मोफत असूनही त्याला प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे, सहाही विभागांत पन्नास हजार नागरिकांमधून अवघे शंभर नागरिकच लाभार्थी ठरले असून, त्यातही अनेकांना बळजबरीने कार्ड दिल्याची चर्चा आहे.