शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
भयंकर! पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
दे दणादण! IRS अधिकारी आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; ऑफिसमध्ये तुफान राडा
4
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
5
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
6
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
7
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
8
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
9
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
10
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
11
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
12
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
13
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
14
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
15
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
16
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
17
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
18
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
19
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश

अडीचशे कोटींसाठी पालिकेचा निरुत्साह

By admin | Updated: July 21, 2014 01:32 IST

अडीचशे कोटींसाठी पालिकेचा निरुत्साह

 

नाशिक : पालिकेच्या तिजोरीत खडखडाट त्यातच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी शासनाकडून निधी मिळण्याची अपेक्षा नाही, अशा स्थितीत जमेल तिथून निधी मिळवण्याच्या प्रयत्नांची गरज असताना प्रशासनाकडून मात्र तसे होत नाही. जकातीच्या तुलनेत एलबीटीत मिळणारे उत्पन्न कमी झाल्यास त्याची भरपाई राज्य शासन करणार आहे. त्यानुसार पालिकेने २४० कोटी रुपयांचा आकडा निश्चित केला; परंतु अद्याप शासनाकडे प्रस्तावच पाठविला नसल्याचे वृत्त आहे. प्रशासनातील ही उदासीनता हा चर्चेचा विषय ठरला आहे.महापालिकेला जकात वसुलीतून विक्रमी सहाशे कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाल्यानंतर गेल्या आर्थिक वर्षात उच्चांकी वसुली होईल, असा पालिकेला विश्वास होता; परंतु राज्य शासनाने त्यावर पाणी फेरले. गेल्यावर्षी २१ पासून महापालिका हद्दीत जकात रद्द करून त्याऐवजी एलबीटी लागू करण्यात आला आहे. एलबीटी लागू झाल्यानंतर जकातीच्या तुलनेत घट येईल, असे पालिकांचे म्हणणे असल्याने राज्य शासनाने पहिल्या वर्षी जकात आणि एलबीटी यांच्या उत्पन्नात जी तफावत येईल त्याची भरपाई करण्यात येईल, असे जाहीर केले. अपेक्षेनुसार जकातीच्या तुलनेत पालिकेचे उत्पन्न घटले असून, जकातीची तुलना करता २४० कोटी रुपयांचे नुकसान झाले, असे नाशिक महापालिकेचे म्हणणे आहे.यासंदर्भात राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवून निधी मिळवणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र महापालिकेने हालचालच केलेली नाही. यासंदर्भात एलबीटी विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी लेखा विभागाला पत्र दिले आहे, असे सांगतात तर लेखा अधिकारी याबाबत एलबीटी विभागानेच पाठपुरावा केला पाहिजे असे सांगतात. कोणीही निधीचा प्रस्ताव पाठविण्यासही तयार नाही की निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे पालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. गेल्या महिन्यात तर एलबीटीची मासिक वसुली इतकी घटली होती की, कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. दुसरीकडे पालिका आपल्या हक्काचे निधी मिळवण्याविषयी अनास्था दाखवत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)