शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

महापालिकाही बाजू मांडणार

By admin | Updated: October 24, 2015 00:25 IST

महापौरांचे आदेश : पाण्यासंबंधीच्या याचिकेवर सुनावणी

नाशिक : जायकवाडीला १३ टीमएसी पाणी सोडण्यापूर्वी महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणच्या निर्णयाला नगर जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांसह दाखल झालेल्या एकूण सहा जनहित याचिकांच्या सुनावणीप्रसंगी नाशिक महापालिकेलाही आपले म्हणणे मांडण्यासाठी महापौरांनी उच्च न्यायालयातील पालिकेच्या वकिलांना आदेशित केले आहे.जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या निर्णयाच्या अधीन राहून औरंगाबादच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने पाणी सोडण्याचा आदेश नाशिक पाटबंधारे विभागाला नुकताच दिला आहे. त्यानुसार गंगापूर धरणातून १.३३ टीमएसी पाणी जायकवाडी सोडले जाणार आहे. मात्र, जायकवाडीला पाणी सोडण्यावरून नाशिकबरोबरच नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधी व नागरिकांनी आंदोलने सुरू केली आहेत. शिवसेनेच्या आमदारांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन गंगापूर धरणावर ठिय्या आंदोलन केले, तर महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांनी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून एकही थेंब सोडू न देण्याचा निर्धार केला. दरम्यान, या पाणी सोडण्याच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात नगर जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांसह संगमनेर येथील हरिश्चंद्र पाणीपुरवठा फेडरेशनच्या वतीने जनहित याचिका दाखल झाल्या असून, त्यावर शुक्रवारी सुनावणी होणार होती. त्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेनेही गंगापूर धरणातील पाण्यासंदर्भात न्यायालयात आपले म्हणणे मांडावे यासाठी उपमहापौर गुरुमित बग्गा आणि अजय बोरस्ते यांनी महापौर अशोक मुर्तडक यांना विनंती केली. गंगापूर धरणावर पहिला हक्क नाशिक महापालिकेचा असून, धरणातील पाणी नाशिककरांसाठी आरक्षित आहे. त्यामुळे महापालिकेनेही आपली बाजू न्यायालयात मांडली पाहिजे, अशी भूमिका घेऊन महापौरांनी तत्काळ उच्च न्यायालयातील पालिकेचे वकील जयशेखर अ‍ॅण्ड कंपनी यांना आदेशित केले. (प्रतिनिधी)