शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

महापालिका : विभागीय कार्यालयांमध्येही नोंदणीची सुविधा ३,७६४ दिव्यांगांचे पेन्शनसाठी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 01:26 IST

नाशिक : महापालिकेने अपंग पुनर्वसन कायद्यांतर्गत आणि ३ टक्के राखीव निधीतून दिव्यांगांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्दे१४ कोटी रुपयांची तरतूद३,७६४ दिव्यांगांनी अर्ज सादर केले

नाशिक : महापालिकेने अपंग पुनर्वसन कायद्यांतर्गत आणि ३ टक्के राखीव निधीतून दिव्यांगांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, या योजनेसाठी आतापर्यंत महापालिकेकडे ३,७६४ दिव्यांगांनी अर्ज दाखल केले आहेत. दिव्यांगांना सदर अर्ज दाखल करण्यासाठी आता मनपाच्या सहाही विभागीय कार्यालयांत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. महापालिकेने दिव्यांगांसाठी विविध उपक्रमांची आखणी केलेली आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात सुमारे १४ कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आलेली आहे. येत्या दोन महिन्यांत सदर निधी महापालिकेला खर्च करायचा आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने अहमदनगर महापालिकेच्या धर्तीवर नाशिक शहरातही दिव्यांगांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, महापालिकेच्या राजीव गांधी भवन येथे दिव्यांगांना विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार, मनपा मुख्यालयात आतापर्यंत ३,७६४ दिव्यांगांनी आपले अर्ज पेन्शन योजनेसाठी सादर केले आहेत. ज्यांनी अर्ज सादर केलेले नाहीत अशा दिव्यांगांना आता मनपाच्या सहाही विभागीय कार्यालयांत नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. दरम्यान, प्राप्त अर्जांची महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार वर्गवारी सुरू केली असून, लवकरच त्याबाबतचा परीपूर्ण प्रस्ताव महासभेवर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. भंडारी यांनी दिली. दरम्यान, आतापर्यंत जिल्हा रुग्णालयांमध्ये दिव्यांगांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र जिल्हा शल्य चिकित्सकांच्या स्वाक्षरीने दिले जात होते. मात्र, शासनाच्या नव्या निर्णयानुसार, महापालिकेच्या वैद्यकीय अधीक्षकाच्या स्वाक्षरीने अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानुसार, महापालिकेच्या नाशिकरोड येथील बिटको रुग्णालय आणि जुन्या नाशकातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात तपासणीची सुविधा उपलब्ध करून प्रमाणपत्र प्रदान केले जाणार असल्याची माहितीही डॉ. राजेंद्र भंडारी यांनी दिली आहे.फिरत्या दवाखान्याला प्रतिसादमहापालिकेने २६ जानेवारीपासून दिव्यांगांसाठी फिरता दवाखाना कार्यान्वित केला आहे. गेल्या चार दिवसांत आतापर्यंत सात दिव्यांगांनी या सुविधेचा लाभ घेतला असल्याची माहिती वैद्यकीय विभागाने दिली. याशिवाय, मंगळवारी (दि.३०) सातपूर येथील नॅब कार्यशाळेतील ३० दिव्यांगांची आरोग्य तपासणीही करण्यात आली. उपचाराची गरज भासणाºया दिव्यांगांनी सदर फिरत्या दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी यांच्याशी (मोबाइल क्रमांक ९६०७०६०१२२) व वाहनचालक यांच्याशी (मोबाइल क्रमांक ९६०७०६०१३३) या क्रमांकावर सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत संपर्क साधल्यास त्यांच्यापर्यंत फिरता दवाखाना पोहोचणार आहे.