शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

महापालिका : सहाही विभागांत २४ तास नियंत्रण कक्ष आपत्ती व्यवस्थापन आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:36 IST

नाशिक : महापालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला असून, त्याअंतर्गत महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनसह सहाही विभागीय कार्यालयात येत्या ९ जूनपासून विभागीय आपत्ती नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरू ठेवले जाणार आहेत.

ठळक मुद्देनदीपात्रालगत ५० जीवरक्षक नियुक्त केले जाणार आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला

नाशिक : महापालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला असून, त्याअंतर्गत महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनसह सहाही विभागीय कार्यालयात येत्या ९ जूनपासून विभागीय आपत्ती नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरू ठेवले जाणार आहेत. दरम्यान, पूरस्थितीच्या वेळी नदीपात्रालगत ५० जीवरक्षक नियुक्त केले जाणार आहेत.केरळ किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन झाल्यानंतर शहरात वेळेत पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात उद्भवणारी पूरस्थिती आणि अन्य आपत्तींचा सामना करण्यासाठी महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. शहरात विविध ठिकाणी पावसाचे पाणी साचणाऱ्या ४९३ ठिकाणांची यादी तयार करून बांधकाम विभागामार्फत उपाययोजना करण्यात आल्या असून, पावसाळापूर्व नालेसफाईची ८० टक्के पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय, मनपा क्षेत्रातील नदीकाठच्या पूरबाधित झोपडपट्ट्यांची यादी तयार करण्यात आली असून, संबंधित विभागीय कार्यालयांमार्फत पूरपरिस्थितीकाळात या भागाकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.पूराची माहिती नागरिकांपर्यंत लवकर पोहोचावी यासाठी एसएमएसच्या माध्यमातून तसेच ध्वनिक्षेपकांच्या माध्यमातून पूर्वसूचना दिली जाणार आहे. आपत्ती नियंत्रणासाठी पूरपरिस्थिती काळाकरिता दोन शोध व बचाव पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अग्निशमन दलाकडील रबर बोट, फायबर बोट, लाइफ जॅकेट, लाइफ रिंग, क ॉक्र ीट कटिंग मशीन, कॉम्बी रेस्क्यू टूल्स, टॉर्चेस, दोन अत्याधुनिक रेस्क्यू व्हॅन आदी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आठ फिरते वैद्यकीय पथक तैनात करण्यात येणार आहेत. मनपाच्या चारही तरण तलावांवरील जीवरक्षकांबरोबरच पंचवटी, रामकुंड, आनंदवल्ली या भागातील निष्णात पोहणाºयांची माहितीही संकलित करण्यात आली असून पूरपरिस्थितीच्या वेळी ५० जीवरक्षक तैनात केले जाणार आहेत.