शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

महापालिका : सहाही विभागांत २४ तास नियंत्रण कक्ष आपत्ती व्यवस्थापन आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:36 IST

नाशिक : महापालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला असून, त्याअंतर्गत महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनसह सहाही विभागीय कार्यालयात येत्या ९ जूनपासून विभागीय आपत्ती नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरू ठेवले जाणार आहेत.

ठळक मुद्देनदीपात्रालगत ५० जीवरक्षक नियुक्त केले जाणार आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला

नाशिक : महापालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला असून, त्याअंतर्गत महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनसह सहाही विभागीय कार्यालयात येत्या ९ जूनपासून विभागीय आपत्ती नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरू ठेवले जाणार आहेत. दरम्यान, पूरस्थितीच्या वेळी नदीपात्रालगत ५० जीवरक्षक नियुक्त केले जाणार आहेत.केरळ किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन झाल्यानंतर शहरात वेळेत पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात उद्भवणारी पूरस्थिती आणि अन्य आपत्तींचा सामना करण्यासाठी महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. शहरात विविध ठिकाणी पावसाचे पाणी साचणाऱ्या ४९३ ठिकाणांची यादी तयार करून बांधकाम विभागामार्फत उपाययोजना करण्यात आल्या असून, पावसाळापूर्व नालेसफाईची ८० टक्के पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय, मनपा क्षेत्रातील नदीकाठच्या पूरबाधित झोपडपट्ट्यांची यादी तयार करण्यात आली असून, संबंधित विभागीय कार्यालयांमार्फत पूरपरिस्थितीकाळात या भागाकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.पूराची माहिती नागरिकांपर्यंत लवकर पोहोचावी यासाठी एसएमएसच्या माध्यमातून तसेच ध्वनिक्षेपकांच्या माध्यमातून पूर्वसूचना दिली जाणार आहे. आपत्ती नियंत्रणासाठी पूरपरिस्थिती काळाकरिता दोन शोध व बचाव पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अग्निशमन दलाकडील रबर बोट, फायबर बोट, लाइफ जॅकेट, लाइफ रिंग, क ॉक्र ीट कटिंग मशीन, कॉम्बी रेस्क्यू टूल्स, टॉर्चेस, दोन अत्याधुनिक रेस्क्यू व्हॅन आदी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आठ फिरते वैद्यकीय पथक तैनात करण्यात येणार आहेत. मनपाच्या चारही तरण तलावांवरील जीवरक्षकांबरोबरच पंचवटी, रामकुंड, आनंदवल्ली या भागातील निष्णात पोहणाºयांची माहितीही संकलित करण्यात आली असून पूरपरिस्थितीच्या वेळी ५० जीवरक्षक तैनात केले जाणार आहेत.