शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

मनपा प्रशासन आता आॅनलाइन

By admin | Updated: April 11, 2015 00:37 IST

ईआरपी संगणकीयप्रणाली : सर्व विभागांचे कामकाज संगणकावर

नाशिक : साडेपाच हजार कर्मचारी, दोन ते अडीच हजार कोटी रुपयांचे वार्षिक अंदाजपत्रक आणि १७ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहराच्या विकासाचा भार आपल्या डोक्यावर घेऊन मिरवणाऱ्या नाशिक महापालिकेने गतिमान प्रशासनाच्यादृष्टीने एक पाऊल पुढे टाकले असून, १ एप्रिलपासून ईआरपी (एंटरप्राईज रिसोर्स प्लॅनिंग) संगणकीय प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. महापालिकेचे संपूर्ण प्रशासकीय कामकाजच आता आॅनलाइन होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने सर्व विभागातील इत्यंभूत घडामोडी एका क्लिकसरशी संगणकाच्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. परिणामी, प्रशासनाच्या कामकाजात पारदर्शकता येऊन लालफितीचा कारभार संपुष्टात येण्यास मदत होणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. गतिमान प्रशासनासाठी शासनाने सन २००५ मध्येच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संगणकीय कार्यप्रणाली कार्यान्वित करण्याचे धोरण जाहीर केले होते. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रशासकीय कामकाज एकसूत्री व्हावे यासाठी शासनाने कल्याण-डोंबिवली महापालिकेला समन्वयक म्हणून नेमले होते. मात्र, नाशिक महापालिकेने त्यापूर्वीच संगणकीयप्रणालीच्या दृष्टीने पावले उचलली होती. तीन-चार वर्षांच्या प्रयत्नानंतर क्रिसिल आणि झेन्सर टेक्नॉलॉजी या कंपनीच्या मदतीने मनपाने सर्व माहिती संकलित करून प्रशासकीय कामकाज संगणकाच्या पडद्यावर उतरविण्यात यश मिळविले आहे. याबाबत मनपाचे मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनी सांगितले, यावर्षाचे अंदाजपत्रक ईआरपी संगणकीय-प्रणालीनुसार आयुक्तांनी सादर करत त्याची सुरुवात केली आहे. या प्रणालीनुसार महापालिकेतील सुमारे साडेपाच हजार कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती, त्यांचे सेवापुस्तक, त्यातील वेळोवेळी होणाऱ्या नोंदी, भविष्य निर्वाह निधी व निवृत्ती वेतन योजना आदि माहिती प्रशासनातील प्रत्येक विभागाला संगणकावर पाहता येणार आहे. त्याचबरोबर लेखा विभागाचे संपूर्ण हिशेब, जमा-खर्चाचा ताळेबंद, निविदाप्रक्रियांची स्थिती यांचीही माहिती आॅनलाइन उपलब्ध होणार आहे. ईआरपी प्रणालीत स्टोअर मॅनेजमेंटही समाविष्ट करण्यात आले असून, त्यानुसार महापालिकेच्या रुग्णालयांमधील औषधांचा साठा, औषधांची एक्सपायरी डेट, वाहन भांडारामधील स्थिती आदिंची माहिती उपलब्ध होणार आहे. सदर प्रणालीने मनपातील सर्व विभाग एकमेकांशी जोडले जात असून, विभागातील प्रत्येकाला सर्व विभागांची माहिती बसल्याजागी उपलब्ध होणार आहे. या प्रणालीमुळे बनावट नोंदी करण्यालाही पायबंद बसणार असून, पूर्ण माहिती देणे बंधनकारक असणार आहे. या प्रणालीमुळे गतिमान प्रशासन संकल्पना राबविण्यास खूपच मदत होणार असल्याची माहितीही राजेश लांडे यांनी दिली. (प्रतिनिधी)