शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

मुंढे यांना न्यायालयीन कचाट्यात अडकविण्यामागे अधिकारीच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 00:44 IST

बेकायदेशीर बांधकामे हटविण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर ग्रीन फिल्ड प्रकरणात त्यांना न्यायालयाचा अवमान केल्याने नामुष्की पत्करावी लागली खरी; परंतु त्यांना अशा प्रकारे अडचणीत आणण्यासाठी जे पत्र विलंबाने सादर केले, ते जाणीवपूर्वक विलंबाने सादर करून आयुक्तांना अडकविण्याचा घाट घातला गेला की काय, अशी शंका निर्माण होण्याइतपत स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देन्यायालयाचा अवमान केल्याने नामुष्की पत्करावी लागलीखुद्द आयुक्तांनीच याबाबत खोदकाम करून या प्रकाराचा छडा लावलानगररचना विभागाने आयुक्तांना अडकविण्यासाठीच खेळी केली

नाशिक : बेकायदेशीर बांधकामे हटविण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर ग्रीन फिल्ड प्रकरणात त्यांना न्यायालयाचा अवमान केल्याने नामुष्की पत्करावी लागली खरी; परंतु त्यांना अशा प्रकारे अडचणीत आणण्यासाठी जे पत्र विलंबाने सादर केले, ते जाणीवपूर्वक विलंबाने सादर करून आयुक्तांना अडकविण्याचा घाट घातला गेला की काय, अशी शंका निर्माण होण्याइतपत स्थिती निर्माण झाली आहे. खुद्द आयुक्तांनीच याबाबत खोदकाम करून या प्रकाराचा छडा लावला असून, महापालिकेला कारवाई स्थगित करण्याचे आदेश देणारे पत्र दुपारी २ वाजून ५२ मिनिटांनी पालिकेच्या नगरचना विभागाला प्राप्त झाल्यानंतरही हे पत्र कारवाई होईपर्यंत दडपून ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  पूररेषेतील बांधकामे हटविण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर २१ मे रोजी त्यांनी गंगापूर रोडवरील ग्रीन फिल्ड लॉन्सचे अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले. मात्र ही कारवाई करताना उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने मुंढे यांना न्यायालयात हजर राहावे लागले आणि न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी माफीदेखील मागावी लागली होती. या नामुष्कीमुळे मुंढे यांनी या सर्व प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मोहीम हाती घेतली असून, त्या अंतर्गत अनेक प्रकारच्या संशयात टाकणाऱ्या बाबी निष्पन्न झाल्याने नगररचना विभागाने आयुक्तांना अडकविण्यासाठीच ही खेळी केली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ‘ग्रीन फिल्ड’ प्रकरणात उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर त्यासंदर्भातील पत्र याचिकाकर्त्यांच्या वतीने २१ मे रोजी २ वाजून ५२ मिनिटांनी नगररचना विभागाला प्राप्त झाले होते. त्यावर तत्कालीन कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण यांची स्वाक्षरी असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, नगररचना विभागाच्या सहायक संचालकांनी सादर केलेल्या अहवालात सदर पत्र ३.४५ वाजता मिळाल्याचा दावा केला आहे व अतिक्रमण ४.३० मिनिटांनी पाडण्यात आले. न्यायालयात दाखल कागदपत्रात मात्र महापालिकेला दुपारी २. ५२ वाजताच पत्र मिळाल्याची वेळ असल्याचे नमूद असल्याने हा सर्व प्रकार आयुक्तांनी उघड केला आहे. विशेष म्हणजे, सदरचे पत्र म्हणजेच न्यायालयाच्या आदेशाची प्रत तत्काळ अतिक्र मण विभागाला देणे आवश्यक होते. मात्र ती न देता तुकाराम मुंढे यांनाच अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचे घटनाक्रमावरून दिसत आहे. सदर प्रकार उघड झाल्यानंतर नगररचना खात्याच्या अधिकाºयांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलणे सुरू केले आहे. त्यामुळे नगररचना विभागाचे सहायक संचालक आकाश बागुल यांच्यासह दोन ते तीन अभियंत्यांवर कारवाई होण्याची शक्यता प्रशासकीय सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.गेल्या महिन्यात नगररचना विभागाचे सहायक अभियंता रवि पाटील बेपत्ता झाले होते. कामाचा तणाव वाढल्याने ते घर सोडून गेले होते. तथापि, ग्रीन फिल्ड प्रकरणात न्यायालयाच्या अवमानाचा जो प्रकार घडला त्यात आयुक्तांनी चौकशी केल्यास या प्रकरणात आपल्यावरही कारवाई होऊ शकेल या तणावात ते होते. त्यात नगररचना विभागाच्या एका अभियंत्याने यू आर एन ट्रबल असा मेसेज पाठविला होता. त्यामुळे तणाव अधिक वाढल्याने ते घर सोडून गेले होते, अशी चर्चाही पालिका वर्तुळात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका