शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

याद्यांचा घोळ; केंद्र बदलाने भ्रमंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 01:47 IST

मतदार यादीत नाव नसणे किंवा अ‍ॅपवर नाव असूनही प्रत्यक्ष यादीत अनुक्रमांक दुसराच असणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मतदारांचे पाच-सहा किलो मीटर अंतरावर स्थलांतर यासारख्या प्रकारांमुळे उत्साह असूनही मतदारांची दमछाक झाली.

नाशिक : मतदार यादीत नाव नसणे किंवा अ‍ॅपवर नाव असूनही प्रत्यक्ष यादीत अनुक्रमांक दुसराच असणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मतदारांचे पाच-सहा किलो मीटर अंतरावर स्थलांतर यासारख्या प्रकारांमुळे उत्साह असूनही मतदारांची दमछाक झाली. या त्रुटींचा फटका मतदानाच्या टक्केवारीला बसला अन्यथा त्यात आणखी भर पडली असती. निवडणुकीपूर्वी मतदारांच्या नावाच्या सचित्र चिठ्या देण्याचे काम बीएलओंकडे देण्यात आले होते. परंतु त्यांनी ते काम वेळेत पूर्ण केले नाही, काही ठिकाणी अपुरे पत्ते आणि अन्य चुकांमुळे बीएलओंची इच्छा असूनही त्यांना चिठ्या पोहोचवता आल्या नाही, तर राजकीय पक्षांनीदेखील याबाबत यंदा फारसा उत्साह दाखविला नव्हता. अनेक नगरसेवकांच्या संपर्क कार्यालयात आल्यास नाव शोधून देण्याची व्यवस्था होती. मतदारांची नावे शोधण्यासाठी सोशल मीडियावर काही लिंक शेअर होत होत्या त्यावरून अनेकांनी नावे शोधली.सोमवारी (दि. २९) सकाळी मतदान केंद्रावर गर्दी असली तरी केंद्रांच्या परिसरातच बीएलओ ठाण मांडून होते. त्याठिकाणी जाऊन मतदार नावे शोधत होती. गेल्यावेळी मतदान करूनदेखील अनेकांची नावे नव्हती. काहींकडे तर ईपीक कार्ड (मतदार ओळखपत्र) असूनही यादीत त्यांची नावे नव्हती. भाग क्रमांक, यादी क्रमांक आणि मतदान केंद्र क्रमांक अशी वेगवेगळ्या स्वरूपाच्या याद्या होत्या, त्यामुळे त्यांच्यामागे मतदारांना शोधावे लागत होते.काठेगल्लीतील अटलबिहारी वाजपेयी शाळेच्या केंद्रात तर बीएलओंनी मतदान केंद्रावर आलेल्या मतदारांनाच याद्या शोधण्याच्या कामांना लावले. आनंदवल्ली येथे तर बीएलओच्या टेबलासमोर मतदान केंद्रासारख्या रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिक