शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
4
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
5
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
6
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
7
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
8
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
9
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
10
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
11
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
12
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
13
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
14
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
15
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
16
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
17
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
18
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
19
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
20
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला

रस्त्यांवर साचलेला चिखल अन् प्रशासनाकडून बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 20:19 IST

श्याम खैरनार सुरगाणा : गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरूच असल्याने तालुक्यातील प्रमुख मार्गासह त्यांना जोडलेले रस्ते व दुर्गम भागातील ...

ठळक मुद्देरस्त्यांची दुरवस्था : खड्ड्यांनी आणला वाहनधारकांच्या नाकात दम

श्याम खैरनारसुरगाणा : गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरूच असल्याने तालुक्यातील प्रमुख मार्गासह त्यांना जोडलेले रस्ते व दुर्गम भागातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक रस्त्यांवर चिखल तुडवत वाट काढावी लागत आहे तर काही रस्त्यांवरील खड्ड्यांनी वाहनधारकांना अक्षरश: नाकात दम आणला आहे. सुरगाणा ते उंबरठाण व उंबरठाण ते बर्डीपाडा या गुजरातला जोडणाऱ्या महामार्गावर ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरील लहान भोरमाळ जवळील अपघाती वळणावर असलेल्या फरशी पुलावर खड्डे पडून तुंबलेल्या पाण्यातून वाहन नेताना मोठे भगदाड तर नसेल ना याची भीती निर्माण होते. याआधी याच फरशी पुलावर भगदाड पडून वाहतुकीस काही दिवस अडथळा निर्माण झाला होता. खरे तर या फरशी पुलाची थोडी उंची वाढवणे गरजेचे होते.येथील बाराबंगला जवळील रस्त्याचे काम बंद करण्यात आल्याने या रस्त्याचे काम रखडले असून, परिणामी वाहतुकीस प्रचंड अडथळा निर्माण होत आहे. पायी चालणाऱ्या नागरिकांना देखील याचा त्रास दररोज सहन करावा लागत आहे. त्यामुळे पाऊस कमी होताच या रस्त्याचे काम इस्टीमेट प्रमाणे सुरू करून पूर्ण करून खोळंबणारी वाहतूक सुरळीत करण्याची मागणी केली जात आहे.कायम रहदारी असलेल्या घाटमाथ्यावरील चिराई ते नागझरी फाटा या दरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली असून, हरणटेकडीपासून पुढे अंदाजे एक किलोमीटर रस्त्याची तर वाट लागली आहे. गेल्या काही वर्षांत या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही. सुरगाण्याहून वणीकडे जाण्यासाठी हा मधला व अतिशय महत्त्वाचा मार्ग असूनही हा रस्ता चांगला प्रतीचा व्हावा यासाठी कुणाकडूनही प्रयत्न झालेले दिसून आले नाही. या खराब रस्त्यामुळे असंख्य वाहनधारक बोरगावमार्गे जाणे पसंत करतात. खुंटविहीरकडे जाणारा रस्ता देखील खराब झाला आहे.चिंचपाडा फाटा ते रगतविहीर हा रस्ता गेली काही वर्षे नूतनीकरणासाठी प्रतीक्षेत आहे. ठाणगाव इळींगपाडा रस्त्याची तर वाट लागून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. चिखलातून दुचाकी नेताना चालकांना सर्कस करावी लागत आहे. भवानदगड फाटा ते सतखांब या जुन्या रस्त्याचे नवीन रस्त्यात रूपांतर अद्यापही झाले नसल्याने या रस्त्याचीही वाट लागली आहे. यासारख्या बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी रस्ते मंजूर असून अद्याप काम सुरू करण्यात आलेले नाही. पावसाळा संपल्यानंतरच काम सुरू होण्याची शक्यता आहे.काही ठिकाणी रस्तेच नाहीतखुंटविहीर ते पिंपळसोंड रस्ता देखील खराब झाला आहे. गेल्या काही वर्षांत या रस्त्याचे नवीन डांबरीकरण झाले नाही.भवानदगड फाटा - सतखांब बारी, ठाणगाव - इळींगपाडा, मनखेड - माणी, माणी - उंबरदे (प.), बाऱ्हे - खोकरविहीर, पळसन - बाऱ्हे, बाऱ्हे - ठाणगाव - बेडसे, राक्षसभुवन - ठाणगाव, मनखेड - जाहुले, मनखेड - कवेली - माणी - सुरगाणा, दोडीपाडा - म्हैसखडक, चिराई - हरणटेकडी - नागझरी फाटा, आंबोडे - केळावण, चिंपाडा फाटा ते रगतविहीर व तेथून पुढे गुजरात सीमेपर्यंत, पांगारणे - उदमाळ, पांगारणे - रांजुणे इत्यादी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तसेच भिवतास धबधबा जवळील फरशी पुलाच्या बाजूने काही वर्षांपासून खचलेला भराव अद्याप भरण्यात आलेला नाही. पिंपळसोंड - उदमाळ, उंबरपाडा - पिंपळसोंड - पारधी वस्ती, पिंपळसोंड - तातापाणी, उंबरपाडा - कुंभारचोंड वस्ती, रांजुणे - करवळपाडा आदी ठिकाणी रस्ता निर्माण करणे आवश्यक आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाGovernmentसरकार