शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
5
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
6
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
7
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
9
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
10
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
11
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
12
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
13
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
14
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
15
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
16
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
17
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
18
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
19
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
20
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांवर साचलेला चिखल अन् प्रशासनाकडून बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 20:19 IST

श्याम खैरनार सुरगाणा : गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरूच असल्याने तालुक्यातील प्रमुख मार्गासह त्यांना जोडलेले रस्ते व दुर्गम भागातील ...

ठळक मुद्देरस्त्यांची दुरवस्था : खड्ड्यांनी आणला वाहनधारकांच्या नाकात दम

श्याम खैरनारसुरगाणा : गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरूच असल्याने तालुक्यातील प्रमुख मार्गासह त्यांना जोडलेले रस्ते व दुर्गम भागातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक रस्त्यांवर चिखल तुडवत वाट काढावी लागत आहे तर काही रस्त्यांवरील खड्ड्यांनी वाहनधारकांना अक्षरश: नाकात दम आणला आहे. सुरगाणा ते उंबरठाण व उंबरठाण ते बर्डीपाडा या गुजरातला जोडणाऱ्या महामार्गावर ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरील लहान भोरमाळ जवळील अपघाती वळणावर असलेल्या फरशी पुलावर खड्डे पडून तुंबलेल्या पाण्यातून वाहन नेताना मोठे भगदाड तर नसेल ना याची भीती निर्माण होते. याआधी याच फरशी पुलावर भगदाड पडून वाहतुकीस काही दिवस अडथळा निर्माण झाला होता. खरे तर या फरशी पुलाची थोडी उंची वाढवणे गरजेचे होते.येथील बाराबंगला जवळील रस्त्याचे काम बंद करण्यात आल्याने या रस्त्याचे काम रखडले असून, परिणामी वाहतुकीस प्रचंड अडथळा निर्माण होत आहे. पायी चालणाऱ्या नागरिकांना देखील याचा त्रास दररोज सहन करावा लागत आहे. त्यामुळे पाऊस कमी होताच या रस्त्याचे काम इस्टीमेट प्रमाणे सुरू करून पूर्ण करून खोळंबणारी वाहतूक सुरळीत करण्याची मागणी केली जात आहे.कायम रहदारी असलेल्या घाटमाथ्यावरील चिराई ते नागझरी फाटा या दरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली असून, हरणटेकडीपासून पुढे अंदाजे एक किलोमीटर रस्त्याची तर वाट लागली आहे. गेल्या काही वर्षांत या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही. सुरगाण्याहून वणीकडे जाण्यासाठी हा मधला व अतिशय महत्त्वाचा मार्ग असूनही हा रस्ता चांगला प्रतीचा व्हावा यासाठी कुणाकडूनही प्रयत्न झालेले दिसून आले नाही. या खराब रस्त्यामुळे असंख्य वाहनधारक बोरगावमार्गे जाणे पसंत करतात. खुंटविहीरकडे जाणारा रस्ता देखील खराब झाला आहे.चिंचपाडा फाटा ते रगतविहीर हा रस्ता गेली काही वर्षे नूतनीकरणासाठी प्रतीक्षेत आहे. ठाणगाव इळींगपाडा रस्त्याची तर वाट लागून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. चिखलातून दुचाकी नेताना चालकांना सर्कस करावी लागत आहे. भवानदगड फाटा ते सतखांब या जुन्या रस्त्याचे नवीन रस्त्यात रूपांतर अद्यापही झाले नसल्याने या रस्त्याचीही वाट लागली आहे. यासारख्या बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी रस्ते मंजूर असून अद्याप काम सुरू करण्यात आलेले नाही. पावसाळा संपल्यानंतरच काम सुरू होण्याची शक्यता आहे.काही ठिकाणी रस्तेच नाहीतखुंटविहीर ते पिंपळसोंड रस्ता देखील खराब झाला आहे. गेल्या काही वर्षांत या रस्त्याचे नवीन डांबरीकरण झाले नाही.भवानदगड फाटा - सतखांब बारी, ठाणगाव - इळींगपाडा, मनखेड - माणी, माणी - उंबरदे (प.), बाऱ्हे - खोकरविहीर, पळसन - बाऱ्हे, बाऱ्हे - ठाणगाव - बेडसे, राक्षसभुवन - ठाणगाव, मनखेड - जाहुले, मनखेड - कवेली - माणी - सुरगाणा, दोडीपाडा - म्हैसखडक, चिराई - हरणटेकडी - नागझरी फाटा, आंबोडे - केळावण, चिंपाडा फाटा ते रगतविहीर व तेथून पुढे गुजरात सीमेपर्यंत, पांगारणे - उदमाळ, पांगारणे - रांजुणे इत्यादी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तसेच भिवतास धबधबा जवळील फरशी पुलाच्या बाजूने काही वर्षांपासून खचलेला भराव अद्याप भरण्यात आलेला नाही. पिंपळसोंड - उदमाळ, उंबरपाडा - पिंपळसोंड - पारधी वस्ती, पिंपळसोंड - तातापाणी, उंबरपाडा - कुंभारचोंड वस्ती, रांजुणे - करवळपाडा आदी ठिकाणी रस्ता निर्माण करणे आवश्यक आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाGovernmentसरकार