शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

रस्त्यांवर साचलेला चिखल अन् प्रशासनाकडून बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 20:19 IST

श्याम खैरनार सुरगाणा : गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरूच असल्याने तालुक्यातील प्रमुख मार्गासह त्यांना जोडलेले रस्ते व दुर्गम भागातील ...

ठळक मुद्देरस्त्यांची दुरवस्था : खड्ड्यांनी आणला वाहनधारकांच्या नाकात दम

श्याम खैरनारसुरगाणा : गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरूच असल्याने तालुक्यातील प्रमुख मार्गासह त्यांना जोडलेले रस्ते व दुर्गम भागातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक रस्त्यांवर चिखल तुडवत वाट काढावी लागत आहे तर काही रस्त्यांवरील खड्ड्यांनी वाहनधारकांना अक्षरश: नाकात दम आणला आहे. सुरगाणा ते उंबरठाण व उंबरठाण ते बर्डीपाडा या गुजरातला जोडणाऱ्या महामार्गावर ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरील लहान भोरमाळ जवळील अपघाती वळणावर असलेल्या फरशी पुलावर खड्डे पडून तुंबलेल्या पाण्यातून वाहन नेताना मोठे भगदाड तर नसेल ना याची भीती निर्माण होते. याआधी याच फरशी पुलावर भगदाड पडून वाहतुकीस काही दिवस अडथळा निर्माण झाला होता. खरे तर या फरशी पुलाची थोडी उंची वाढवणे गरजेचे होते.येथील बाराबंगला जवळील रस्त्याचे काम बंद करण्यात आल्याने या रस्त्याचे काम रखडले असून, परिणामी वाहतुकीस प्रचंड अडथळा निर्माण होत आहे. पायी चालणाऱ्या नागरिकांना देखील याचा त्रास दररोज सहन करावा लागत आहे. त्यामुळे पाऊस कमी होताच या रस्त्याचे काम इस्टीमेट प्रमाणे सुरू करून पूर्ण करून खोळंबणारी वाहतूक सुरळीत करण्याची मागणी केली जात आहे.कायम रहदारी असलेल्या घाटमाथ्यावरील चिराई ते नागझरी फाटा या दरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली असून, हरणटेकडीपासून पुढे अंदाजे एक किलोमीटर रस्त्याची तर वाट लागली आहे. गेल्या काही वर्षांत या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही. सुरगाण्याहून वणीकडे जाण्यासाठी हा मधला व अतिशय महत्त्वाचा मार्ग असूनही हा रस्ता चांगला प्रतीचा व्हावा यासाठी कुणाकडूनही प्रयत्न झालेले दिसून आले नाही. या खराब रस्त्यामुळे असंख्य वाहनधारक बोरगावमार्गे जाणे पसंत करतात. खुंटविहीरकडे जाणारा रस्ता देखील खराब झाला आहे.चिंचपाडा फाटा ते रगतविहीर हा रस्ता गेली काही वर्षे नूतनीकरणासाठी प्रतीक्षेत आहे. ठाणगाव इळींगपाडा रस्त्याची तर वाट लागून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. चिखलातून दुचाकी नेताना चालकांना सर्कस करावी लागत आहे. भवानदगड फाटा ते सतखांब या जुन्या रस्त्याचे नवीन रस्त्यात रूपांतर अद्यापही झाले नसल्याने या रस्त्याचीही वाट लागली आहे. यासारख्या बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी रस्ते मंजूर असून अद्याप काम सुरू करण्यात आलेले नाही. पावसाळा संपल्यानंतरच काम सुरू होण्याची शक्यता आहे.काही ठिकाणी रस्तेच नाहीतखुंटविहीर ते पिंपळसोंड रस्ता देखील खराब झाला आहे. गेल्या काही वर्षांत या रस्त्याचे नवीन डांबरीकरण झाले नाही.भवानदगड फाटा - सतखांब बारी, ठाणगाव - इळींगपाडा, मनखेड - माणी, माणी - उंबरदे (प.), बाऱ्हे - खोकरविहीर, पळसन - बाऱ्हे, बाऱ्हे - ठाणगाव - बेडसे, राक्षसभुवन - ठाणगाव, मनखेड - जाहुले, मनखेड - कवेली - माणी - सुरगाणा, दोडीपाडा - म्हैसखडक, चिराई - हरणटेकडी - नागझरी फाटा, आंबोडे - केळावण, चिंपाडा फाटा ते रगतविहीर व तेथून पुढे गुजरात सीमेपर्यंत, पांगारणे - उदमाळ, पांगारणे - रांजुणे इत्यादी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तसेच भिवतास धबधबा जवळील फरशी पुलाच्या बाजूने काही वर्षांपासून खचलेला भराव अद्याप भरण्यात आलेला नाही. पिंपळसोंड - उदमाळ, उंबरपाडा - पिंपळसोंड - पारधी वस्ती, पिंपळसोंड - तातापाणी, उंबरपाडा - कुंभारचोंड वस्ती, रांजुणे - करवळपाडा आदी ठिकाणी रस्ता निर्माण करणे आवश्यक आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाGovernmentसरकार