शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

‘एमएसएमई’ रोजगार देणारा स्रोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:39 IST

नाशिक : भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात ३८ टक्के भाग हा सूक्ष्म, लघु व मध्यम स्वरूपाच्या उद्योगांचा देशात एकूण पाच कोटी एमएसएमईच्या माध्यमातून १२ कोटी रोजगार उपलब्ध होत असल्याने एमएसएमई हा देशातील रोजगार निर्मिताचा मोठा स्त्रोत आहे. त्यामुळेच केंद्र सरकार औद्योगिक विकासासोबच रोजगार निर्मितीसाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना विविध योजनांच्या माध्यमातून पाठबळ उभे करीत असल्याचे प्रतिपादन रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे संचालक तथा केंद्रीय अर्थखात्याचे सल्लागार आशुतोष रारावीकर यांनी केले.

ठळक मुद्देआशुतोष रारावीकर : बीबीएनजीच्या राष्ट्रीय परिषदेत उद्योजकांना मार्गदर्शन

नाशिक : भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात ३८ टक्के भाग हा सूक्ष्म, लघु व मध्यम स्वरूपाच्या उद्योगांचा देशात एकूण पाच कोटी एमएसएमईच्या माध्यमातून १२ कोटी रोजगार उपलब्ध होत असल्याने एमएसएमई हा देशातील रोजगार निर्मिताचा मोठा स्त्रोत आहे. त्यामुळेच केंद्र सरकार औद्योगिक विकासासोबच रोजगार निर्मितीसाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना विविध योजनांच्या माध्यमातून पाठबळ उभे करीत असल्याचे प्रतिपादन रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे संचालक तथा केंद्रीय अर्थखात्याचे सल्लागार आशुतोष रारावीकर यांनी केले.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील ब्राह्मण व्यावसायिकांच्या ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबलतर्फे (बीबीएनजी) सातपूर येथे रविवारी (दि. ११) राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपाच्या उद्योग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांच्यासह व्यासपीठावर संदीप फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप झा, बीबीएनजीचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, अशोका बिल्डकॉनचे संचालक संजय लोंढे, मुकुंद कुलकर्णी, विराज लोमटे आदी उपस्थित होते.राराविकर म्हणाले, देशातील लघुउद्योगांच्या विकासासाठी बँक आणि उद्योग यांच्यामध्ये विश्वासाचे नाते निर्माण व्हायला पाहिजे. यातूनच मोठ्या प्रमाणात विकास साधता येईल. सोबतच सरकार, बँका आणि उद्योग क्षेत्रातील विविध संघटना यांच्यात चांगला संवाद झाला तरच मोठ्या आणि लघु उद्योगात येणाºया अडचणींवर सहज मात करता येईल. उद्योजकांसाठी अनेक योजना असून, अनेकदा या सर्व गोष्टी उद्योजकांना माहीत नसतात. त्यामुळे उद्योजकांच्या संघटनांनी ही त्रुटी दूर करण्याची गरज आहे.जे उद्योग अडचणीत आहेत त्यांना मदत करणे गरजेचे आहेत. त्यासाठी आरबीआयने बँकांना सूक्ष्म व लघु उद्योगांना आर्थिक सहकार्य करण्याच्या सूचनाही केल्या असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले, तसेच उद्योग संघटनांनी व्यवसाय क्लस्टर उभारून त्यातून कौशल्य विकासावर भर देत नवीन उद्योग व उद्योगाचा विस्तार करण्याचा सल्ला देतानाच नाशिकमध्ये संरक्षण, अन्न प्रक्रि या, शेती विषयक उद्योगास भरपूर वाव असून, या क्षेत्रातील उद्योजकांना मोठ्या प्रमाणात संधी व सवलती उपलब्ध असल्याचे आशुतोष राराविकर यांनी अधोरेखित केले.आरबीआयच्या सूचनेनुसार एमएसएमई कॉर्नर सुरू करण्यात आले असून, तीन दिवसांत कर्ज उपलब्ध करून देण्याची यंत्रणा राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीपाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. ब्राह्मण समाजातील तरुणवर्ग उद्योग व्यवसायाकडे वळत आहे. ऐतिहासिक कालखंडात निर्माण झालेल्या समाजनिहाय व्यवस्थेत कामांची विभागणी केलेली होती. परंतु आता चित्र पूर्णपणे बदलले असून उद्योग व्यवसायासाठी मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आगामी काळात अर्थकारण हे पूर्णपणे बौद्धिक क्षमतेवरच असेल. त्यामुळे बुद्धिजीव समाजाने उद्योजकतेकडे वळण्याची गरज आहे.- संदीप झा, अध्यक्ष, संदीप फाउंडेशन.