शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
3
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
4
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
5
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
6
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
7
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
8
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
9
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
10
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
11
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
12
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
13
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
14
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
15
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
16
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
17
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
18
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
19
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
20
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...

‘एमएसएमई’ रोजगार देणारा स्रोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:39 IST

नाशिक : भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात ३८ टक्के भाग हा सूक्ष्म, लघु व मध्यम स्वरूपाच्या उद्योगांचा देशात एकूण पाच कोटी एमएसएमईच्या माध्यमातून १२ कोटी रोजगार उपलब्ध होत असल्याने एमएसएमई हा देशातील रोजगार निर्मिताचा मोठा स्त्रोत आहे. त्यामुळेच केंद्र सरकार औद्योगिक विकासासोबच रोजगार निर्मितीसाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना विविध योजनांच्या माध्यमातून पाठबळ उभे करीत असल्याचे प्रतिपादन रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे संचालक तथा केंद्रीय अर्थखात्याचे सल्लागार आशुतोष रारावीकर यांनी केले.

ठळक मुद्देआशुतोष रारावीकर : बीबीएनजीच्या राष्ट्रीय परिषदेत उद्योजकांना मार्गदर्शन

नाशिक : भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात ३८ टक्के भाग हा सूक्ष्म, लघु व मध्यम स्वरूपाच्या उद्योगांचा देशात एकूण पाच कोटी एमएसएमईच्या माध्यमातून १२ कोटी रोजगार उपलब्ध होत असल्याने एमएसएमई हा देशातील रोजगार निर्मिताचा मोठा स्त्रोत आहे. त्यामुळेच केंद्र सरकार औद्योगिक विकासासोबच रोजगार निर्मितीसाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना विविध योजनांच्या माध्यमातून पाठबळ उभे करीत असल्याचे प्रतिपादन रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे संचालक तथा केंद्रीय अर्थखात्याचे सल्लागार आशुतोष रारावीकर यांनी केले.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील ब्राह्मण व्यावसायिकांच्या ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबलतर्फे (बीबीएनजी) सातपूर येथे रविवारी (दि. ११) राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपाच्या उद्योग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांच्यासह व्यासपीठावर संदीप फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप झा, बीबीएनजीचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, अशोका बिल्डकॉनचे संचालक संजय लोंढे, मुकुंद कुलकर्णी, विराज लोमटे आदी उपस्थित होते.राराविकर म्हणाले, देशातील लघुउद्योगांच्या विकासासाठी बँक आणि उद्योग यांच्यामध्ये विश्वासाचे नाते निर्माण व्हायला पाहिजे. यातूनच मोठ्या प्रमाणात विकास साधता येईल. सोबतच सरकार, बँका आणि उद्योग क्षेत्रातील विविध संघटना यांच्यात चांगला संवाद झाला तरच मोठ्या आणि लघु उद्योगात येणाºया अडचणींवर सहज मात करता येईल. उद्योजकांसाठी अनेक योजना असून, अनेकदा या सर्व गोष्टी उद्योजकांना माहीत नसतात. त्यामुळे उद्योजकांच्या संघटनांनी ही त्रुटी दूर करण्याची गरज आहे.जे उद्योग अडचणीत आहेत त्यांना मदत करणे गरजेचे आहेत. त्यासाठी आरबीआयने बँकांना सूक्ष्म व लघु उद्योगांना आर्थिक सहकार्य करण्याच्या सूचनाही केल्या असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले, तसेच उद्योग संघटनांनी व्यवसाय क्लस्टर उभारून त्यातून कौशल्य विकासावर भर देत नवीन उद्योग व उद्योगाचा विस्तार करण्याचा सल्ला देतानाच नाशिकमध्ये संरक्षण, अन्न प्रक्रि या, शेती विषयक उद्योगास भरपूर वाव असून, या क्षेत्रातील उद्योजकांना मोठ्या प्रमाणात संधी व सवलती उपलब्ध असल्याचे आशुतोष राराविकर यांनी अधोरेखित केले.आरबीआयच्या सूचनेनुसार एमएसएमई कॉर्नर सुरू करण्यात आले असून, तीन दिवसांत कर्ज उपलब्ध करून देण्याची यंत्रणा राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीपाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. ब्राह्मण समाजातील तरुणवर्ग उद्योग व्यवसायाकडे वळत आहे. ऐतिहासिक कालखंडात निर्माण झालेल्या समाजनिहाय व्यवस्थेत कामांची विभागणी केलेली होती. परंतु आता चित्र पूर्णपणे बदलले असून उद्योग व्यवसायासाठी मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आगामी काळात अर्थकारण हे पूर्णपणे बौद्धिक क्षमतेवरच असेल. त्यामुळे बुद्धिजीव समाजाने उद्योजकतेकडे वळण्याची गरज आहे.- संदीप झा, अध्यक्ष, संदीप फाउंडेशन.