शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

‘एमएसएमई’ रोजगार देणारा स्रोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:39 IST

नाशिक : भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात ३८ टक्के भाग हा सूक्ष्म, लघु व मध्यम स्वरूपाच्या उद्योगांचा देशात एकूण पाच कोटी एमएसएमईच्या माध्यमातून १२ कोटी रोजगार उपलब्ध होत असल्याने एमएसएमई हा देशातील रोजगार निर्मिताचा मोठा स्त्रोत आहे. त्यामुळेच केंद्र सरकार औद्योगिक विकासासोबच रोजगार निर्मितीसाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना विविध योजनांच्या माध्यमातून पाठबळ उभे करीत असल्याचे प्रतिपादन रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे संचालक तथा केंद्रीय अर्थखात्याचे सल्लागार आशुतोष रारावीकर यांनी केले.

ठळक मुद्देआशुतोष रारावीकर : बीबीएनजीच्या राष्ट्रीय परिषदेत उद्योजकांना मार्गदर्शन

नाशिक : भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात ३८ टक्के भाग हा सूक्ष्म, लघु व मध्यम स्वरूपाच्या उद्योगांचा देशात एकूण पाच कोटी एमएसएमईच्या माध्यमातून १२ कोटी रोजगार उपलब्ध होत असल्याने एमएसएमई हा देशातील रोजगार निर्मिताचा मोठा स्त्रोत आहे. त्यामुळेच केंद्र सरकार औद्योगिक विकासासोबच रोजगार निर्मितीसाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना विविध योजनांच्या माध्यमातून पाठबळ उभे करीत असल्याचे प्रतिपादन रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे संचालक तथा केंद्रीय अर्थखात्याचे सल्लागार आशुतोष रारावीकर यांनी केले.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील ब्राह्मण व्यावसायिकांच्या ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबलतर्फे (बीबीएनजी) सातपूर येथे रविवारी (दि. ११) राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपाच्या उद्योग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांच्यासह व्यासपीठावर संदीप फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप झा, बीबीएनजीचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, अशोका बिल्डकॉनचे संचालक संजय लोंढे, मुकुंद कुलकर्णी, विराज लोमटे आदी उपस्थित होते.राराविकर म्हणाले, देशातील लघुउद्योगांच्या विकासासाठी बँक आणि उद्योग यांच्यामध्ये विश्वासाचे नाते निर्माण व्हायला पाहिजे. यातूनच मोठ्या प्रमाणात विकास साधता येईल. सोबतच सरकार, बँका आणि उद्योग क्षेत्रातील विविध संघटना यांच्यात चांगला संवाद झाला तरच मोठ्या आणि लघु उद्योगात येणाºया अडचणींवर सहज मात करता येईल. उद्योजकांसाठी अनेक योजना असून, अनेकदा या सर्व गोष्टी उद्योजकांना माहीत नसतात. त्यामुळे उद्योजकांच्या संघटनांनी ही त्रुटी दूर करण्याची गरज आहे.जे उद्योग अडचणीत आहेत त्यांना मदत करणे गरजेचे आहेत. त्यासाठी आरबीआयने बँकांना सूक्ष्म व लघु उद्योगांना आर्थिक सहकार्य करण्याच्या सूचनाही केल्या असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले, तसेच उद्योग संघटनांनी व्यवसाय क्लस्टर उभारून त्यातून कौशल्य विकासावर भर देत नवीन उद्योग व उद्योगाचा विस्तार करण्याचा सल्ला देतानाच नाशिकमध्ये संरक्षण, अन्न प्रक्रि या, शेती विषयक उद्योगास भरपूर वाव असून, या क्षेत्रातील उद्योजकांना मोठ्या प्रमाणात संधी व सवलती उपलब्ध असल्याचे आशुतोष राराविकर यांनी अधोरेखित केले.आरबीआयच्या सूचनेनुसार एमएसएमई कॉर्नर सुरू करण्यात आले असून, तीन दिवसांत कर्ज उपलब्ध करून देण्याची यंत्रणा राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीपाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. ब्राह्मण समाजातील तरुणवर्ग उद्योग व्यवसायाकडे वळत आहे. ऐतिहासिक कालखंडात निर्माण झालेल्या समाजनिहाय व्यवस्थेत कामांची विभागणी केलेली होती. परंतु आता चित्र पूर्णपणे बदलले असून उद्योग व्यवसायासाठी मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आगामी काळात अर्थकारण हे पूर्णपणे बौद्धिक क्षमतेवरच असेल. त्यामुळे बुद्धिजीव समाजाने उद्योजकतेकडे वळण्याची गरज आहे.- संदीप झा, अध्यक्ष, संदीप फाउंडेशन.