शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ऐन उन्हाळ्यात महावितरणचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 23:24 IST

नाशिक : लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे विजेची मागणी दरवर्षी एवढी नसल्याचे सांगितले जात असताना दुसरीकडे मात्र रहिवासी भागात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. त्यामुळे घरात असणाऱ्या नागरिकांची अवस्था बिकट होत चालली आहे.

नाशिक : लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे विजेची मागणी दरवर्षी एवढी नसल्याचे सांगितले जात असताना दुसरीकडे मात्र रहिवासी भागात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. त्यामुळे घरात असणाऱ्या नागरिकांची अवस्था बिकट होत चालली आहे.  गेल्या काही वर्षात महावितरणच्या वतीने कोणत्या भागात वीजपुरवठा खंडित होणार याचे एसएमएस पाठविले जात ते तर पाठविणे बंद झाले आहेच. परंतु तक्रारीसाठी दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर फोन केल्यानंतर लॉकडाउनमुळे कर्मचारी कमी असल्याची कैफियत सांगून दिलगिरी व्यक्त केली जात आहे. गेल्या महिन्याच्या अखेरपासून शहर परिसरात ऊन वाढू लागले आहे. चालू महिन्यात तापमानाने चाळिशी पार केली आहे. गेल्या महिन्यात २३ मार्चपासून देशभरा लॉकडाउन असल्याने नागरिकांना घरातच रहावे लागत आहे. त्यामुळे उन्हाळा जाणवत असताना गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे.मध्यवर्ती कॉलेजरोड, शरणपूररोड भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होतो तर दुसºया अनेक भागात दिवसदिवस वीजपुरवठा खंडित होत असतो. परंतु तक्रार करणार कोणाकडे? असा प्रश्न निर्माण होतो. महावितरण कंपनीने दिलेल्या हेल्पलाइनवर फोन केल्यास अनेक सूचना केल्या जातात आणि त्यानंतरही लॉकडाउनमुळे कर्मचारी संख्या कमी असल्याने महावितरणच्या अ‍ॅपवर तक्रार करा, असे सांगून बोळवणूक केली जाते. यापूर्वी तक्रार केल्यास संबंधितांना पुन्हा कॉल करून फॉल्ट कुठे आहे आणि वीजपुरवठा कधी सुरळीत होईल, असे सांगितले जात असे. मात्र आता अशी कोणतीही सुविधा नाही. गेल्या महिन्यात लॉकडाउन आणि संचारबंदी घोषित केल्यानंतर उद्योगधंदे, बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे विजेची मागणी दरवर्षी इतकी नाही. आताही शासन खासगी आणि शासकीय वीज केंद्रातून मुबलक वीज उपलब्ध असल्याचे सांगते आणि दुसरीकडे मात्र, भारनियमन नसतानाही वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक