शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

ऐन उन्हाळ्यात महावितरणचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 23:24 IST

नाशिक : लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे विजेची मागणी दरवर्षी एवढी नसल्याचे सांगितले जात असताना दुसरीकडे मात्र रहिवासी भागात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. त्यामुळे घरात असणाऱ्या नागरिकांची अवस्था बिकट होत चालली आहे.

नाशिक : लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे विजेची मागणी दरवर्षी एवढी नसल्याचे सांगितले जात असताना दुसरीकडे मात्र रहिवासी भागात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. त्यामुळे घरात असणाऱ्या नागरिकांची अवस्था बिकट होत चालली आहे.  गेल्या काही वर्षात महावितरणच्या वतीने कोणत्या भागात वीजपुरवठा खंडित होणार याचे एसएमएस पाठविले जात ते तर पाठविणे बंद झाले आहेच. परंतु तक्रारीसाठी दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर फोन केल्यानंतर लॉकडाउनमुळे कर्मचारी कमी असल्याची कैफियत सांगून दिलगिरी व्यक्त केली जात आहे. गेल्या महिन्याच्या अखेरपासून शहर परिसरात ऊन वाढू लागले आहे. चालू महिन्यात तापमानाने चाळिशी पार केली आहे. गेल्या महिन्यात २३ मार्चपासून देशभरा लॉकडाउन असल्याने नागरिकांना घरातच रहावे लागत आहे. त्यामुळे उन्हाळा जाणवत असताना गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे.मध्यवर्ती कॉलेजरोड, शरणपूररोड भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होतो तर दुसºया अनेक भागात दिवसदिवस वीजपुरवठा खंडित होत असतो. परंतु तक्रार करणार कोणाकडे? असा प्रश्न निर्माण होतो. महावितरण कंपनीने दिलेल्या हेल्पलाइनवर फोन केल्यास अनेक सूचना केल्या जातात आणि त्यानंतरही लॉकडाउनमुळे कर्मचारी संख्या कमी असल्याने महावितरणच्या अ‍ॅपवर तक्रार करा, असे सांगून बोळवणूक केली जाते. यापूर्वी तक्रार केल्यास संबंधितांना पुन्हा कॉल करून फॉल्ट कुठे आहे आणि वीजपुरवठा कधी सुरळीत होईल, असे सांगितले जात असे. मात्र आता अशी कोणतीही सुविधा नाही. गेल्या महिन्यात लॉकडाउन आणि संचारबंदी घोषित केल्यानंतर उद्योगधंदे, बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे विजेची मागणी दरवर्षी इतकी नाही. आताही शासन खासगी आणि शासकीय वीज केंद्रातून मुबलक वीज उपलब्ध असल्याचे सांगते आणि दुसरीकडे मात्र, भारनियमन नसतानाही वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक