शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

ऊसशेती जळीत घटनेस महावितरण कंपनी जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 01:47 IST

डांगसौंदाणे : महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे येथील दोन शेतकऱ्यांचा एकूण नऊ एकर ऊस जळून खाक झाला आहे. या घटनेस महावितरण कंपनी जबाबदार असल्याचा ठपका विद्युत निरीक्षण कार्यालयाकडून करण्यात आलेल्या चौकशी अहवालात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता या चौकशी अहवालाच्या आधारावर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देघटनेतील जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे.

डांगसौंदाणे : महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे येथील दोन शेतकऱ्यांचा एकूण नऊ एकर ऊस जळून खाक झाला आहे. या घटनेस महावितरण कंपनी जबाबदार असल्याचा ठपका विद्युत निरीक्षण कार्यालयाकडून करण्यात आलेल्या चौकशी अहवालात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता या चौकशी अहवालाच्या आधारावर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची प्रतीक्षा आहे.बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे येथील शेतकरी दिगंबर धर्मा बोरसे यांचा सात एकर ऊस आणि ठिबक सिंचन, तर वंदना साहेबराव काकुळते यांचा दोन एकर ऊस बुधवारी (दि,४) शॉटसर्किटमुळे जळून खाक झाला होता. त्यात या दोन्ही शेतकऱ्यांचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या जळीत उसाचा पंचनामा करून विद्युत निरीक्षक कार्यालयाकडून चौकशी करण्यात आली. चौकशी अहवाल महावितरण कंपनीला सादर करण्यात आला आहे. या अहवालाच्या आधारावर आता घटनेतील जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे.२०१८ पासून नुकसानग्रस्त शेतकरी शेतातील कामासंदर्भात महावितरण कंपनीच्या डांगसौंदाणे कार्यालयाशी पाठपुरावा करत होते, मात्र महावितरण कंपनीच्या स्थानिक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या कामाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ही घटना घडल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. घटनेला महिना होत आला आहे, मात्र अद्याप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही.दरम्यान,नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महावितरण कंपनीकडून जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार दिलीप बोरसे यांनी यापूर्वी सांगितले आहे. त्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे.माझ्याकडे अद्याप विद्युत निरीक्षक कार्यालयाचा अहवाल प्राप्त झालेला नाही, मात्र चौकशी अहवाल आल्यानंतर घटनेच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, शिवाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव नुकसानभरपाई देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.- रमेश सानप, अधीक्षक इंजिनिअर, महावितरण कंपनी, मालेगावमाझ्या शेतातील ऊस जळीत घटनेस महावितरण जबाबदार आहे, त्यामुळे महावितरण कंपनीने लवकरात लवकर मला झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई द्यावी.- दिगंबर बोरसे, नुकसानग्रस्त शेतकरी. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती