शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

ऊसशेती जळीत घटनेस महावितरण कंपनी जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 01:47 IST

डांगसौंदाणे : महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे येथील दोन शेतकऱ्यांचा एकूण नऊ एकर ऊस जळून खाक झाला आहे. या घटनेस महावितरण कंपनी जबाबदार असल्याचा ठपका विद्युत निरीक्षण कार्यालयाकडून करण्यात आलेल्या चौकशी अहवालात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता या चौकशी अहवालाच्या आधारावर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देघटनेतील जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे.

डांगसौंदाणे : महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे येथील दोन शेतकऱ्यांचा एकूण नऊ एकर ऊस जळून खाक झाला आहे. या घटनेस महावितरण कंपनी जबाबदार असल्याचा ठपका विद्युत निरीक्षण कार्यालयाकडून करण्यात आलेल्या चौकशी अहवालात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता या चौकशी अहवालाच्या आधारावर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची प्रतीक्षा आहे.बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे येथील शेतकरी दिगंबर धर्मा बोरसे यांचा सात एकर ऊस आणि ठिबक सिंचन, तर वंदना साहेबराव काकुळते यांचा दोन एकर ऊस बुधवारी (दि,४) शॉटसर्किटमुळे जळून खाक झाला होता. त्यात या दोन्ही शेतकऱ्यांचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या जळीत उसाचा पंचनामा करून विद्युत निरीक्षक कार्यालयाकडून चौकशी करण्यात आली. चौकशी अहवाल महावितरण कंपनीला सादर करण्यात आला आहे. या अहवालाच्या आधारावर आता घटनेतील जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे.२०१८ पासून नुकसानग्रस्त शेतकरी शेतातील कामासंदर्भात महावितरण कंपनीच्या डांगसौंदाणे कार्यालयाशी पाठपुरावा करत होते, मात्र महावितरण कंपनीच्या स्थानिक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या कामाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ही घटना घडल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. घटनेला महिना होत आला आहे, मात्र अद्याप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही.दरम्यान,नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महावितरण कंपनीकडून जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार दिलीप बोरसे यांनी यापूर्वी सांगितले आहे. त्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे.माझ्याकडे अद्याप विद्युत निरीक्षक कार्यालयाचा अहवाल प्राप्त झालेला नाही, मात्र चौकशी अहवाल आल्यानंतर घटनेच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, शिवाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव नुकसानभरपाई देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.- रमेश सानप, अधीक्षक इंजिनिअर, महावितरण कंपनी, मालेगावमाझ्या शेतातील ऊस जळीत घटनेस महावितरण जबाबदार आहे, त्यामुळे महावितरण कंपनीने लवकरात लवकर मला झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई द्यावी.- दिगंबर बोरसे, नुकसानग्रस्त शेतकरी. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती