शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
2
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
3
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
4
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
5
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
6
Ola Electric ला सरकारकडून मिळणार ३६६.७८ कोटी रुपयांचा मोठा दिलासा; शेअरमध्ये जोरदार तेजी, जाणून घ्या
7
क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीची दखल; वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव
8
सर्व (पक्ष) समावेशक भाजपा नीती! काँग्रेस रिकामी, उद्धवसेनेचे घर खाली, मनसेचा कणा मोडला
9
कोंबडी आधी की अंडं? शतकानुशतके पडलेल्या या जुन्या प्रश्नाचं उत्तर अखेर वैज्ञानिकांना सापडलं
10
तुम्ही सुद्धा 'हर्बल टी' पिता का? FSSAI नं कंपन्यांना दिला इशारा, नक्की प्रकरण काय?
11
Girish Mahajan : भाजपामध्ये प्रवेशाचे 'महाभारत'; मंत्री गिरीश महाजन यांना घेराव; निष्ठावंतांवरच अन्याय का?
12
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
13
Viral : टेक्नोलॉजिया! अवघ्या एका विटेत पठ्ठ्याने तयार केला रूम हीटर; ५० रुपयांच्या खर्चात थंडी केली गायब
14
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
15
शिंदेसेनेकडून ४२ जागांचा प्रस्ताव, जागा वाटपाचा तिढा सुटेना; तीन मंत्र्यांसह नेत्यांची जंबो बैठक
16
"मला खूप दुखतंय...", उपचारांसाठी ८ तास वेटिंग; कॅनडात वडिलांसमोर भारतीयाचा तडफडून मृत्यू
17
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
18
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
19
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
20
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
Daily Top 2Weekly Top 5

येवल्याच्या पाण्यासाठी भुजबळांचे पत्र नाराजी : प्रशासन प्रस्ताव प्रलंबित ठेवत असल्याबद्दल खेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:14 IST

नाशिक : येवला तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवत असल्याने नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत.

ठळक मुद्दे येवला तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाईची स्थिती टँकरला मंजुरी देण्यास प्राथमिकता देणे आवश्यक

नाशिक : येवला तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवत असल्याने नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत. त्यामुळे तहानलेल्या येवलेकरांना प्राधान्याने पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात यावे, अशा मागणीचे पत्र आमदार छगन भुजबळ यांनी मुंबईतील केईएम रुग्णालयातून नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. या पत्रात छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, जिल्हाभरात येवला तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाईची स्थिती असून, दिवसागणिक पिण्याच्या पाण्याची परिस्थिती भीषण होत आहे. हा भाग मुळातच अवर्षणप्रवण आहे. अशा परिस्थितीमध्ये गावांकडून टँकरची मागणी आल्यानंतर तातडीने पाहणी करून टँकरला मंजुरी देण्यास प्राथमिकता देणे आवश्यक असते. मात्र अनेक दिवस प्रस्ताव प्रलंबित राहत आहेत. गावांचा टंचाई कृती आराखड्यात समावेश आहे का, जलयुक्त शिवार योजनेत समावेश आहे का इत्यादी निकषांचा किस काढून काही गावांचे प्रस्ताव प्रलंबित ठेवले जात आहेत. खरे तर टँकर मंजुरीचे अधिकार प्रांतांना देण्याऐवजी जिल्हापातळीवर घेऊन कालापव्यय केला जात असल्याने भुजबळांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. सध्या येवला तालुक्यातील संभाजीनगर-सावरगाव, बदापूर, आडगाव रेपाळ,पन्हाळसाठे व रहाडी या पाच गावांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे प्रलंबित आहेत, तर कोळम खु., कोळम बु., डोंगरगाव, खिर्डीसाठे-हनुमाननगर, पिंपळखुटे खु. अंतर्गत अहिरेवस्ती आणि कदमवस्ती अशा पाच गावांचे प्रस्ताव उपविभागीय अधिकारी स्तरावर प्रलंबित आहे. नगरसूल ग्रामपंचायतीने एकोणवीस वाड्या-वस्त्यांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे टँकर सुरू करण्यासाठी पाठविलेल्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी कार्यालयाने अनेक दिवसांपासून मंजुरी दिलेली नाही. गणेशपूर,आड सुरेगाव, गारखेडे व देवठाण या चार गावांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा मंजूर आहे. मात्र ही गावे आजही पाण्याच्या टँकरच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून येवल्यासाठी मंजूर असलेले १६ पैकी ५ टँकर अजूनही येवल्यात पोहोचलेले नाहीत. भीषण टंचाई परिस्थिती असतानाही ११ गावांचे प्रस्ताव अनेक दिवस विविध स्तरांवर मंजुरीसाठी प्रलंबित ठेवण्यात आल्याबद्दल भुजबळ यांनी खेद व्यक्त केला आहे. टंचाईग्रस्त गावांतील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी टँकरकडे डोळे लावून बसलेले आहेत. शासकीय अधिकारी टंचाईकडे दुर्लक्ष करीत आहेत, अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झालेली आहे. तेथील भीषण परिस्थितीचा विचार करून टंचाईग्रस्त गावांतील पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचे प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करावे आणि या गावांमध्ये टँकर पोहचले की नाही याचा आढावा घेऊन दुष्काळी भागातील नागरिकांना दिलासा द्यावा, असे भुजबळ यांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.