शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

केंद्र सरकारच्या निषेधार्थ सीटूच्या वतीने औद्योगिक क्षेत्रात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 19:45 IST

नाशिक :  कामगारांच्या विरुद्ध तयार केलेल्या चार श्रमसंहिता मागे घेण्यात यावे आणि दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाले तरी अजूनही तोडगा काढण्यात आला नाही. त्यामुळे सीटूच्या वतीने बुधवारी (दि.२६)  काळा दिवस पाळून केंद्रातील मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

ठळक मुद्देश्रमजीवी,कृषी कायद्यांना विराेध सीटू कार्यालयाबाहेर घोषणाबाजी

नाशिक कामगारांच्या विरुद्ध तयार केलेल्या चार श्रमसंहिता मागे घेण्यात यावे आणि दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाले तरी अजूनही तोडगा काढण्यात आला नाही. त्यामुळे सीटूच्या वतीने बुधवारी (दि.२६)  काळा दिवस पाळून केंद्रातील मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. 

दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण होत आहेत तरी देखील मोदी सरकार यावर कोणताही तोडगा काढण्यास तयार नाही.तसेच कामगारांच्या विरुद्ध तयार केलेल्या चार श्रमसंहिता मागे घेण्यात यावे या मागण्यांसाठी व काळ्या कायद्यांचा निषेध करण्यासाठी नाशिक जिल्हा सीटूच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. सिटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदाेलनात  जिल्हाध्यक्ष सिताराम ठोंबरे,सेक्रेटरी संतोष काकडे,तुकाराम सोनजे, कल्पना शिंदे,मोहन जाधव,आत्माराम डावरे,अरविंद शहापुरे,दीपक घोरपडे,नितीन सूर्यवंशी,गौतम कोंगळे, निवृत्ती केदार,प्रभाकर जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.  

 दरम्यान, अंबड,सातपुर,सिन्नर व पिंपळगाव बसवंत आणि इगतपुरी तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतील विविध कारखान्यातील पाच हजारावर कामगारांनी आपापल्या कंपनीच्या गेटवर घोषणा देऊन निदर्शने केली. पाळला. सातपूर येथील जुन्या सी.आय.टी.यू ऑफिस येथे कॉ. सिंधू शार्दुल यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम कामगारांनी निषेध आंदोलन केले.मालेगाव येथील यंत्रमाग कामगार व सिटूचे कार्यकर्ते रमेश जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.संजीवनगर भागातील कामगारांनी देखील मोदी सरकारचा निषेध केला.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकारPoliticsराजकारण