शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारच्या निषेधार्थ सीटूच्या वतीने औद्योगिक क्षेत्रात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 19:45 IST

नाशिक :  कामगारांच्या विरुद्ध तयार केलेल्या चार श्रमसंहिता मागे घेण्यात यावे आणि दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाले तरी अजूनही तोडगा काढण्यात आला नाही. त्यामुळे सीटूच्या वतीने बुधवारी (दि.२६)  काळा दिवस पाळून केंद्रातील मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

ठळक मुद्देश्रमजीवी,कृषी कायद्यांना विराेध सीटू कार्यालयाबाहेर घोषणाबाजी

नाशिक कामगारांच्या विरुद्ध तयार केलेल्या चार श्रमसंहिता मागे घेण्यात यावे आणि दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाले तरी अजूनही तोडगा काढण्यात आला नाही. त्यामुळे सीटूच्या वतीने बुधवारी (दि.२६)  काळा दिवस पाळून केंद्रातील मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. 

दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण होत आहेत तरी देखील मोदी सरकार यावर कोणताही तोडगा काढण्यास तयार नाही.तसेच कामगारांच्या विरुद्ध तयार केलेल्या चार श्रमसंहिता मागे घेण्यात यावे या मागण्यांसाठी व काळ्या कायद्यांचा निषेध करण्यासाठी नाशिक जिल्हा सीटूच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. सिटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदाेलनात  जिल्हाध्यक्ष सिताराम ठोंबरे,सेक्रेटरी संतोष काकडे,तुकाराम सोनजे, कल्पना शिंदे,मोहन जाधव,आत्माराम डावरे,अरविंद शहापुरे,दीपक घोरपडे,नितीन सूर्यवंशी,गौतम कोंगळे, निवृत्ती केदार,प्रभाकर जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.  

 दरम्यान, अंबड,सातपुर,सिन्नर व पिंपळगाव बसवंत आणि इगतपुरी तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतील विविध कारखान्यातील पाच हजारावर कामगारांनी आपापल्या कंपनीच्या गेटवर घोषणा देऊन निदर्शने केली. पाळला. सातपूर येथील जुन्या सी.आय.टी.यू ऑफिस येथे कॉ. सिंधू शार्दुल यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम कामगारांनी निषेध आंदोलन केले.मालेगाव येथील यंत्रमाग कामगार व सिटूचे कार्यकर्ते रमेश जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.संजीवनगर भागातील कामगारांनी देखील मोदी सरकारचा निषेध केला.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकारPoliticsराजकारण