शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नाशिकच्या गिर्यारोहकाने पारनेरमध्ये शोधला भोरवाडी गिरीदुर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:18 IST

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात सपाट पठारी भागावर अनेक ऐतिहासिक भुईकोट किल्ले, गढी आणि वेशी असलेली गावे आहेत. परंतु त्यामध्ये ...

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात सपाट पठारी भागावर अनेक ऐतिहासिक भुईकोट किल्ले, गढी आणि वेशी असलेली गावे आहेत. परंतु त्यामध्ये आता नव्याने भर पडली आहे ती एका भोरवाडी गिरीदुर्गाची. नाशिकचे गिर्यारोहक सुदर्शन कुलथे यांनी या किल्ल्याचा गिरीभ्रमंतीदरम्यान शाेध घेतला आहे. हरिश्चंद्रगडापासून सह्याद्रीची उपरांग थेट पारनेर शहराच्या दिशेने जाते. पारनेरच्या दिशेने जाताना ह्या उपरांगेची उंची कमी कमी होत जाते. त्यावरील मांडओहोळ धरणाजवळील म्हसोबाझाप ग्रामपंचायतीतील भोरवाडी येथील किल्ला आतापर्यंत कधीही प्रकाशझोतात आलेला नव्हता. कुलथे यांनी परिसरात असलेल्या ऐतिहासिक ठिकाणांची भटकंती आणि अभ्यास करताना भोरवाडी किल्ल्याचा शोध घेतला.

भोरवाडी किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची दोन हजार ८२४ फूट (८६० मीटर) असून, किल्ल्याची चढाई सोप्या श्रेणीची असल्याचे कुलथे यांनी सांगितले. म्हसोबाझाप गावाच्या १२ वाड्या असून, यापैकी कण्हेरवाडी आणि भोरवाडी गावातून किल्ल्यावर जाता येते.

--इन्फो--

किल्ल्याची स्थानिक ओळख ‘चुचळा’

या भागातील स्थानिक लोक या किल्ल्याच्या टोकदार निमुळत्या आकारामुळे त्याला चुचळा या नावाने ओळखतात. भोरवाडी गावातून मुख्य किल्ला व त्यालगत असलेला छोटा डोंगर यांच्या खिंडीतून वर चढाईचा मार्ग आहे. पायथ्यापासून माथ्यापर्यंतची चढाई ही फक्त ११० ते १२० मीटर एवढी आहे. किल्ल्यावर चढाई मार्गात खडकातून खोदलेला मार्ग आणि अनेक पायऱ्या कोरलेल्या दिसतात. चढाई मार्गावर तटबंदीचे चिरे ओळीने असल्याचे पहावयास मिळतात. त्यामधून पूर्वी प्रवेशद्वार असावे अशी रचना दिसते. माथ्यावरील सपाटीच्या भागावर गडफेरीदेखील सहज करता येऊ शकते. तेथे दोन पाण्याचे खोदीव टाके आहेत. हे दोन्ही टाके २६ फूट लांब तर १० फूट रुंद इतक्या आकाराचे आहेत. त्यांची खोली साधारणत: १० फूट इतकी असावी. टाके माथ्याकडून वाहून आलेल्या माती-गाळाने निम्मे बुजले गेले आहे. माथ्याच्या उत्तरेकडे पाण्याचे तिसरे टाके असून, तेदेखील याच आकाराचे आहे.

---कोट---

भोरवाडीचा किल्ला हा अहमदनगर, संगमनेर आणि जुन्नर या तीन शहरांच्या मध्यभागी आहेत. तसेच जुन्नर-अहमदनगर महामार्गापासून जवळ आहे. परिसरातील टाकळी ढोकेश्वर या आठव्या शतकातील लेणी या किल्ल्यापासून जवळच आहेत.

अहमदनगर निजामशाहीच्या मुख्य भागात हा किल्ला असल्याने याची निर्मिती आणि इतिहास निजामशाही काळातील टेहाळणी दुर्ग असण्याची शक्यता आहे. भोरवाडीचा किल्ला हा गिरीदुर्ग प्रकारातील एकमेव किल्ला आहे. गिरीदुर्ग अभ्यासक गिरीश टकले यांचेही यासाठी मार्गदर्शन लाभले.

- सुदर्शन कुलथे, गिर्यारोहक, नाशिक

--

फोटो आर वर १२फोर्ट/१/२

120721\12nsk_53_12072021_13.jpg~120721\12nsk_54_12072021_13.jpg

भोरवाडीचा गिरीदुर्ग~भोरवाडी किल्ल्याचे विविध रुपे.