शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सप्तशृंगगडावरील व्यावसायिकांसमोर समस्यांचा डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:11 IST

कळवण : कोरोना प्रादुर्भावामुळे चार महिन्यांपासून बंद असलेल्या उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत सप्तशृंग गडावरील मंदिर उघडण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थ ...

कळवण : कोरोना प्रादुर्भावामुळे चार महिन्यांपासून बंद असलेल्या उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत सप्तशृंग गडावरील मंदिर उघडण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे. मंदिर उघडण्याची आर्त हाक देत स्थानिक ग्रामस्थ व व्यावसायिकांना दिलासा देण्याची मागणी यावेळी झाली. रविवारी (दि.१८) सप्तशृंग गडावरील ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री छगनराव भुजबळ यांची नाशिक येथे भुजबळ फार्म हाऊस येथे भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, मार्चपासून महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आली आहेत. पर्यायी भाविक व त्या अनुषंगाने सेवा सुविधा संपूर्णतः बंद आहेत. श्री क्षेत्र सप्तशृंग गड या तीर्थक्षेत्राचा परिसर हा संपूर्णतः दुर्गम व गरीब लोकवस्तीचा आहे. येथील संपूर्ण अर्थकारण हे श्री भगवती मंदिर व भाविकांच्या संबंधित असलेल्या विविध सेवा-सुविधांवर आधारित आहे. मागील चार महिन्यांपासून मंदिर बंद असल्यामुळे हातावर पोट असलेल्या नागरिकांचे प्रचंड हलाखीचे दिवस सुरू असून, त्यांच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी मंदिर व त्यासंबंधित सर्व सेवा-सुविधा शासकीय नियमाअंतर्गत सुरू होणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी सप्तशृंग गड व्यापारी संघटना अध्यक्ष अजय दुबे, शांताराम गवळी, योगेश कदम, बंटी गुरव, बाबा तिवारी, कैलास सदगीर, ग्रामपंचायत सदस्य दत्तू बर्डे, राजेश गवळी, शांताराम सदगीर उपस्थित होते.

----------------------

अनेक कुटुंबे स्थलांतरित बेरोजगारीमुळे सप्तशृंग गडावरील अनेक कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत, तसेच व्यवसाय वा मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेले बँकांच्या कर्जाचे हप्ते थकीत आहेत. त्यामुळे व्यापारी व ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत, तरी हप्त्यांची मुदत वाढवून मिळण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा होणे गरजेचे आहे. स्थानिक ग्रामस्थ व व्यापारी वर्गाने कोविड -19 संबंधित लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण केलेले आहेत. त्यामुळे सहानुभूतीपूर्वक विचार होऊन महाराष्ट्र राज्यातील सर्व धार्मिक स्थळे खुली करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.