शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
4
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
5
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
6
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
7
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
8
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
9
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
10
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
11
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
12
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
13
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
14
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
15
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
16
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
17
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
18
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
19
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
20
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
Daily Top 2Weekly Top 5

आईची काळजी वाढली, काळजावर दगड ठेवून मुलांना पाठवतात शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:11 IST

सायखेडा : शासनाने आठवीच्या पुढील वर्ग सुरू करण्याचे आदेश निर्गमित केले आणि प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या आहेत. ...

सायखेडा : शासनाने आठवीच्या पुढील वर्ग सुरू करण्याचे आदेश निर्गमित केले आणि प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या आहेत. एक महिना ज्या गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निघाले नाही, त्या गावातील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या असल्या तरी मुले शाळेत गेल्यावर आईची काळजी वाढली आहे. शाळेत येणारी मुले एकाच कुटुंबातील नाहीत. शिवाय कुटुंबातील माणसे कामानिमित्त घराबाहेर पडतात, त्यामुळे भीती आहे शिवाय सार्वजनिक ठिकाणी वाढत असलेली गर्दी आणि दुकानात होणारी गर्दी ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक असल्यामुळे आईला काळजी आहे.

मुलांचे शिक्षण देखील महत्त्वाचं आहे. ऑनलाईन शिक्षणात अनेक अडचणी येतात. ग्रामीण भागात स्मार्ट फोन नाही, फोनला रेंज नाही, शिवाय पालक फोन घेऊन शेतात जातात त्यामुळे ऑनलाईन शिक्षणात मोठी अडचण येते. त्यामुळे शाळा प्रत्यक्ष सुरू व्हाव्यात अशी सर्वांची इच्छा आहे पण त्यासोबत काळजी पण आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांचा समावेश असणार आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी असे अनेक तज्ज्ञ सांगत असल्यामुळे लहान मुलांना शाळेत संसर्ग होणार नाही याची काळजी आईला आहे. शिवाय शाळेत योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी होत आहे.

-------------------------

कोरोनाची भीती कायम आहे, अजून शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलांच्या गावातील कोरोना संख्या कमी झाली नाही. एका शाळेत येणारी मुले अनेक गावातील असतात. त्यामुळे भीती कायम आहे. शिवाय मुले शाळेत दूर राहात असली तरी सुट्टीत आणि येता जाता सोबत राहतात, जेवण सोबत करतात, त्यामुळे भीती वाटते, पण शिक्षणही महत्त्वाचं आहे. दीड वर्षापासून मुलांचा शारीरिक, मानसिक, भावनिक विकास थांबला आहे.

- उषा खालकर, आई, भेंडाळी (निफाड) (१९ उषा खालकर)

----------------------

माझी मुलगी ऋत्विजा ही दहावीमध्ये शिकत आहे. ती शाळेत जाताना स्वतःची व्यवस्थित काळजी घेते. नियमित मास्क वापरते. शाळेत जाताना सॅनिटायझर घेऊन जाते. दर एक तास झाल्यावर बेंच सॅनिटाईज करुन घेते. स्वतःची कोणतीही वस्तू इतरांना देत नाही. शाळेतून घरी आल्यावर कपडे बदलून धुण्यास टाकते. स्वच्छ अंघोळ करून मगच घरात वावरते.

- रेणुका काळे, ठाणगाव, ता. सिन्नर (१९ रेणुका काळे)

--------------------------

आमची मुले गेल्या दीड वर्षापासून घरीच आहेत. कोरोनाचा संसर्ग थांबलेला नाही, याची भीती कायम असूनही मुलांना शाळेत पाठवावेव लागत आहे. काळजी घेत शिक्षण सुरू ठेवणे गरजेचे आहे. मुलांना तशी समज कमी असली तरी त्यांना हात धुण्यास सांगितले आहे. गर्दी टाळणे,घरी आल्यावर अंघोळ करणे,कपडे धुणे अशी काळजी घेत मुलांचे शालेय शिक्षण सुरू ठेवावे लागत आहे.

- पूनम पुरकर, संगमेश्वर, मालेगाव (१९ पुनम पुरकर)

-----------------

घरी आले की अंघोळ करून कपडे बदला

शाळेत मुले एकाच ठिकाणी घोळका करून उभे राहू शकतात किंवा सोबत ये-जा करतात, जेवण सोबत करतात. अनेक महिन्यानंतर मित्र मैत्रीण भेटल्यामुळे आपुलकीने हितगुज करतात. त्यामुळे घरी आल्यावर मुलांनी अंघोळ करून कपडे बदलावीत, दप्तर, डबा सॅनिटाईझ करावा.

- डॉ. प्रल्हाद डेर्ले, माऊली हॉस्पिटल

190721\19nsk_24_19072021_13.jpg

१९ रेणुका काळे, १९ पूनम पूरकर