शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

आईची काळजी वाढली, काळजावर दगड ठेवून मुलांना पाठवतात शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:11 IST

सायखेडा : शासनाने आठवीच्या पुढील वर्ग सुरू करण्याचे आदेश निर्गमित केले आणि प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या आहेत. ...

सायखेडा : शासनाने आठवीच्या पुढील वर्ग सुरू करण्याचे आदेश निर्गमित केले आणि प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या आहेत. एक महिना ज्या गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निघाले नाही, त्या गावातील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या असल्या तरी मुले शाळेत गेल्यावर आईची काळजी वाढली आहे. शाळेत येणारी मुले एकाच कुटुंबातील नाहीत. शिवाय कुटुंबातील माणसे कामानिमित्त घराबाहेर पडतात, त्यामुळे भीती आहे शिवाय सार्वजनिक ठिकाणी वाढत असलेली गर्दी आणि दुकानात होणारी गर्दी ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक असल्यामुळे आईला काळजी आहे.

मुलांचे शिक्षण देखील महत्त्वाचं आहे. ऑनलाईन शिक्षणात अनेक अडचणी येतात. ग्रामीण भागात स्मार्ट फोन नाही, फोनला रेंज नाही, शिवाय पालक फोन घेऊन शेतात जातात त्यामुळे ऑनलाईन शिक्षणात मोठी अडचण येते. त्यामुळे शाळा प्रत्यक्ष सुरू व्हाव्यात अशी सर्वांची इच्छा आहे पण त्यासोबत काळजी पण आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांचा समावेश असणार आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी असे अनेक तज्ज्ञ सांगत असल्यामुळे लहान मुलांना शाळेत संसर्ग होणार नाही याची काळजी आईला आहे. शिवाय शाळेत योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी होत आहे.

-------------------------

कोरोनाची भीती कायम आहे, अजून शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलांच्या गावातील कोरोना संख्या कमी झाली नाही. एका शाळेत येणारी मुले अनेक गावातील असतात. त्यामुळे भीती कायम आहे. शिवाय मुले शाळेत दूर राहात असली तरी सुट्टीत आणि येता जाता सोबत राहतात, जेवण सोबत करतात, त्यामुळे भीती वाटते, पण शिक्षणही महत्त्वाचं आहे. दीड वर्षापासून मुलांचा शारीरिक, मानसिक, भावनिक विकास थांबला आहे.

- उषा खालकर, आई, भेंडाळी (निफाड) (१९ उषा खालकर)

----------------------

माझी मुलगी ऋत्विजा ही दहावीमध्ये शिकत आहे. ती शाळेत जाताना स्वतःची व्यवस्थित काळजी घेते. नियमित मास्क वापरते. शाळेत जाताना सॅनिटायझर घेऊन जाते. दर एक तास झाल्यावर बेंच सॅनिटाईज करुन घेते. स्वतःची कोणतीही वस्तू इतरांना देत नाही. शाळेतून घरी आल्यावर कपडे बदलून धुण्यास टाकते. स्वच्छ अंघोळ करून मगच घरात वावरते.

- रेणुका काळे, ठाणगाव, ता. सिन्नर (१९ रेणुका काळे)

--------------------------

आमची मुले गेल्या दीड वर्षापासून घरीच आहेत. कोरोनाचा संसर्ग थांबलेला नाही, याची भीती कायम असूनही मुलांना शाळेत पाठवावेव लागत आहे. काळजी घेत शिक्षण सुरू ठेवणे गरजेचे आहे. मुलांना तशी समज कमी असली तरी त्यांना हात धुण्यास सांगितले आहे. गर्दी टाळणे,घरी आल्यावर अंघोळ करणे,कपडे धुणे अशी काळजी घेत मुलांचे शालेय शिक्षण सुरू ठेवावे लागत आहे.

- पूनम पुरकर, संगमेश्वर, मालेगाव (१९ पुनम पुरकर)

-----------------

घरी आले की अंघोळ करून कपडे बदला

शाळेत मुले एकाच ठिकाणी घोळका करून उभे राहू शकतात किंवा सोबत ये-जा करतात, जेवण सोबत करतात. अनेक महिन्यानंतर मित्र मैत्रीण भेटल्यामुळे आपुलकीने हितगुज करतात. त्यामुळे घरी आल्यावर मुलांनी अंघोळ करून कपडे बदलावीत, दप्तर, डबा सॅनिटाईझ करावा.

- डॉ. प्रल्हाद डेर्ले, माऊली हॉस्पिटल

190721\19nsk_24_19072021_13.jpg

१९ रेणुका काळे, १९ पूनम पूरकर