शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

आईची काळजी वाढली, काळजावर दगड ठेवून मुलांना पाठवतात शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:11 IST

सायखेडा : शासनाने आठवीच्या पुढील वर्ग सुरू करण्याचे आदेश निर्गमित केले आणि प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या आहेत. ...

सायखेडा : शासनाने आठवीच्या पुढील वर्ग सुरू करण्याचे आदेश निर्गमित केले आणि प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या आहेत. एक महिना ज्या गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निघाले नाही, त्या गावातील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या असल्या तरी मुले शाळेत गेल्यावर आईची काळजी वाढली आहे. शाळेत येणारी मुले एकाच कुटुंबातील नाहीत. शिवाय कुटुंबातील माणसे कामानिमित्त घराबाहेर पडतात, त्यामुळे भीती आहे शिवाय सार्वजनिक ठिकाणी वाढत असलेली गर्दी आणि दुकानात होणारी गर्दी ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक असल्यामुळे आईला काळजी आहे.

मुलांचे शिक्षण देखील महत्त्वाचं आहे. ऑनलाईन शिक्षणात अनेक अडचणी येतात. ग्रामीण भागात स्मार्ट फोन नाही, फोनला रेंज नाही, शिवाय पालक फोन घेऊन शेतात जातात त्यामुळे ऑनलाईन शिक्षणात मोठी अडचण येते. त्यामुळे शाळा प्रत्यक्ष सुरू व्हाव्यात अशी सर्वांची इच्छा आहे पण त्यासोबत काळजी पण आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांचा समावेश असणार आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी असे अनेक तज्ज्ञ सांगत असल्यामुळे लहान मुलांना शाळेत संसर्ग होणार नाही याची काळजी आईला आहे. शिवाय शाळेत योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी होत आहे.

-------------------------

कोरोनाची भीती कायम आहे, अजून शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलांच्या गावातील कोरोना संख्या कमी झाली नाही. एका शाळेत येणारी मुले अनेक गावातील असतात. त्यामुळे भीती कायम आहे. शिवाय मुले शाळेत दूर राहात असली तरी सुट्टीत आणि येता जाता सोबत राहतात, जेवण सोबत करतात, त्यामुळे भीती वाटते, पण शिक्षणही महत्त्वाचं आहे. दीड वर्षापासून मुलांचा शारीरिक, मानसिक, भावनिक विकास थांबला आहे.

- उषा खालकर, आई, भेंडाळी (निफाड) (१९ उषा खालकर)

----------------------

माझी मुलगी ऋत्विजा ही दहावीमध्ये शिकत आहे. ती शाळेत जाताना स्वतःची व्यवस्थित काळजी घेते. नियमित मास्क वापरते. शाळेत जाताना सॅनिटायझर घेऊन जाते. दर एक तास झाल्यावर बेंच सॅनिटाईज करुन घेते. स्वतःची कोणतीही वस्तू इतरांना देत नाही. शाळेतून घरी आल्यावर कपडे बदलून धुण्यास टाकते. स्वच्छ अंघोळ करून मगच घरात वावरते.

- रेणुका काळे, ठाणगाव, ता. सिन्नर (१९ रेणुका काळे)

--------------------------

आमची मुले गेल्या दीड वर्षापासून घरीच आहेत. कोरोनाचा संसर्ग थांबलेला नाही, याची भीती कायम असूनही मुलांना शाळेत पाठवावेव लागत आहे. काळजी घेत शिक्षण सुरू ठेवणे गरजेचे आहे. मुलांना तशी समज कमी असली तरी त्यांना हात धुण्यास सांगितले आहे. गर्दी टाळणे,घरी आल्यावर अंघोळ करणे,कपडे धुणे अशी काळजी घेत मुलांचे शालेय शिक्षण सुरू ठेवावे लागत आहे.

- पूनम पुरकर, संगमेश्वर, मालेगाव (१९ पुनम पुरकर)

-----------------

घरी आले की अंघोळ करून कपडे बदला

शाळेत मुले एकाच ठिकाणी घोळका करून उभे राहू शकतात किंवा सोबत ये-जा करतात, जेवण सोबत करतात. अनेक महिन्यानंतर मित्र मैत्रीण भेटल्यामुळे आपुलकीने हितगुज करतात. त्यामुळे घरी आल्यावर मुलांनी अंघोळ करून कपडे बदलावीत, दप्तर, डबा सॅनिटाईझ करावा.

- डॉ. प्रल्हाद डेर्ले, माऊली हॉस्पिटल

190721\19nsk_24_19072021_13.jpg

१९ रेणुका काळे, १९ पूनम पूरकर