शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
5
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
6
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
7
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
8
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
9
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
10
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
11
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
12
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
13
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
14
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
15
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
16
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
17
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
18
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
19
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
20
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?

रणरणत्या उन्हातील ‘मातृरूप दर्शन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 00:46 IST

नाशिक : डोक्यावर आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सामानाचं गाठोडं अन्् हाताच्या पाळण्यात धरलेला इवलासा जीव. एकीकडे हातातील आपल्या इवल्याशा जिवाला जिवापल्याड सांभाळण्याची जीवघेणी कसरत, तर दुसरीकडे अंगाची लाही करणाऱ्या तळपत्या उन्हातील शेकडो मैलांची पायपीट करणा-या अनेक माता महामार्गावरून चालत जातानाचे दृश्य हृदयाला पिळवटून टाकणारे.

धनंजय रिसोडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : डोक्यावर आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सामानाचं गाठोडं अन्् हाताच्या पाळण्यात धरलेला इवलासा जीव. एकीकडे हातातील आपल्या इवल्याशा जिवाला जिवापल्याड सांभाळण्याची जीवघेणी कसरत, तर दुसरीकडे अंगाची लाही करणाऱ्या तळपत्या उन्हातील शेकडो मैलांची पायपीट करणा-या अनेक माता महामार्गावरून चालत जातानाचे दृश्य हृदयाला पिळवटून टाकणारे.कोरोनाच्या विळख्यातील समाजाचे सर्वाधिक विदारक चित्र सध्या महामार्गांवर अनुभवायला मिळत आहे. कुणाचे बाळ दीड वर्षाचे, कुणाचे दोन वर्षांचे, कुणाचे सहा महिन्यांचे तर एका महिलेचे बाळ तर अवघे आठवड्याचे. अक्षरश: ओली बाळंतीणदेखील आपल्या तान्हुल्याचा जीव जगविण्यासाठी रणरणत्या उन्हात डोक्यासह सर्वांगाला पोळणारे चटके सहन करीत शेकडो मैल चालत आपापल्या कुटुंबांसह गावी निघाल्या आहेत.थेट विल्होळी नाक्यापासून ते ओझरपर्यंतच्या रस्त्यावर कोणत्याही वेळी किमान काही माता आपापल्या बालकांना घेऊन गावी निघाल्याचे दिसून येत आहे.अवघे आठवड्याचे बाळ हातात घेऊन एक माता पायी मध्य प्रदेशकडे निघाली होती, तर दोन वर्षांचे बालक एका कंबरेवर घेऊन दुसरी माता थेट त्यापेक्षाही मोठा पल्ला गाठण्याच्या उद्देशाने उत्तर प्रदेशकडे कुटुंबीयांसह निघाली होती. काही माता एकमेकींना भावनिक मदतीचा सहारा देत पुढे-पुढे मार्गक्रमण करीत होत्या. रणरणत्या उन्हातील हे मातृरूप दर्शन पाहणाºया प्रत्येकाला कोरोनाच्या विळख्यातील समाजाचे सर्वाधिक करूण दृश्य होते. काही कुटुंबांकडे तर जेवणासाठी लागणारे डाळ, तांदूळदेखील पुढील दोन दिवसांपुरतेच होते. पुढे कुठे तरी वाटप होईल, तिथे जमेल तसे पोटभरू पण घरी पोहोचू हा त्या कुटुंबांचा निर्धार अद्वितीय होता.---------ठेकेदारांनी केली नाही मदतगावाकडे परतणा-या या कुटुंबांपैकी बहुतांश जणांना त्यांच्या ठेकेदारांनी अडचणीच्या या प्रसंगात साथ दिली नाही. घरी परतण्यासाठी थोडेफार पैसेदेखील उधार दिले नाहीत. त्यामुळे प्रती माणशी दोन-तीन हजार रुपये खर्चून गावी जाण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नसल्याने पायी किंवा सायकलवर कुटुंबाला घेऊन मार्गक्रमण करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरलेला नसल्याचे त्यांच्या बोलण्यातून अधोरेखित झाले.

टॅग्स :Nashikनाशिक