शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

बिबट्याच्या हल्ल्यापासून मातेने वाचविले दोन मुलांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 12:45 IST

लखमापूर : लखमापूर येथे मातेने दोन लहानग्या मुलांना बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचवत आई खरोखरच मायेचा सागर असल्याचीच प्रचिती या घटनेतून आल्यावाचून राहत नाही. या महिलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लखमापूर : लखमापूर येथे मातेने दोन लहानग्या मुलांना बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचवत आई खरोखरच मायेचा सागर असल्याचीच प्रचिती या घटनेतून आल्यावाचून राहत नाही. या महिलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.लखमापूर शिवारातील इनाम भागात शिवाजी बाबुराव देशमुख यांचे शेतात विहिरीचे खोदकाम चालू होते. त्या खोदकामासाठी राजस्थान येथील कामगार कामाला होते. ते कामगार परिवारासहित तिथेच झोपडीत तात्पुरती वस्ती करून राहत होते. दि. २७ रोजी वेळ सायंकाळी साडेसात वाजे दरम्यान विहिरीवर खोदकाम चालू होते मशीनचा मोठा आवाज येत होता . त्याच वेळेस झोपडीत श्रावण धनराज बिल हा सहा वर्षाचा मुलगा व चार वर्षाची निरमा धनराज बिल लहान मुलगी बसलेली होती. त्या मुलांची आई मंजु बिल हया झोपडी बाहेर स्वयंपाक करीत होती.कुठूनतरी अचानक तिथे बिबट्या आला . तिथे स्वयंपाक करीत असलेल्या महिलेची नजर चुकवून त्या लहान मुलांच्या दिशेने झोपडी जवळ जाऊ लागला . प्लॅस्टिकने बनविलेल्या झोपडीवर पंजा मारून प्लास्टिक फाडले व झोपडीत प्रवेश करणार तोच त्या मातेचे अचानक मुलांकडे लक्ष गेले. साक्षात समोर बिबट्याच्या रु पात मृत्यू उभा असताना त्या मातेने जीवाची पर्वा न करता आपल्या लहान मुलांच्या दिशेने झोपडीकडे धाव घेतली व मोठ्याने आरडाओरड केली. विहिरीचे काम ज्या ठिकाणी सुरू होते तेथे मुलांना घेऊन पळाली.तेथील मजूर कामगारांनी झोपडीकडे धाव घेतली. त्यांनी बिबट्याला हाकलून लावले. त्यांना बिबट्या तेथून दूर जाताना दिसला. जर त्या मातेचे लक्ष झोपडी कडे गेले नसते तर किती मोठा अनर्थ घडला असता याची कल्पना न केलेली बरी.-----------------------------बिबट्याचे वास्तव्य, शेतकरी धास्तावलेलखमापूर शिवारात बिबट्याचे हल्ले झाले .त्या हल्ल्यात शक्यतो लहान मुलेच बिबट्याने भक्ष बनविले आहे.हा शिवार नदीकाठी असल्याने हया भागात बिबट्याचे वास्तव्य कायम असल्याने शेतकरी वर्ग खूप धास्तावला आहे.लखमापूर परिसरात असा एक पण दिवस उजडत नाही की बिबट्याचे दर्शन कोणाला झाले नाही.आज शिवारात असी परिस्थिती गंभीर झाली आहे की कुत्रे थोडे बिबटे जास्त झाले आहेत. आता पर्यंत इतके बिबट्याने हल्ले केले . वनविभागास बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पाहिजे तसे यश आले नाही. तरी वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे अशी मागणी नितीन शिवाजी दळवी, योगेश दळवी व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक