शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जन्मदात्यानेच केला मुलाचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 01:23 IST

सिन्नर : भोजापूर धरणात हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या युवकाच्या खुनाचा तपास करण्यात वावी पोलिसांना यश आले. अवघ्या चोवीस तासात वावी पोलिसांनी खुनाचा उलगडा केला आहे. दारूच्या नशेत आई-वडील यांना मारहाण करीत असल्याने या जाचाला कंटाळून लहान भाऊ आणि वडिलांनीच त्याचा खून करून हातपाय बांधून मृतदेह म्हाळुंगी नदीपात्रात फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी दिली. 

ठळक मुद्देवावी पोलिसांचा तपास । लहान भावाचाही कृत्यात सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : भोजापूर धरणात हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या युवकाच्या खुनाचा तपास करण्यात वावी पोलिसांना यश आले. अवघ्या चोवीस तासात वावी पोलिसांनी खुनाचा उलगडा केला आहे. दारूच्या नशेत आई-वडील यांना मारहाण करीत असल्याने या जाचाला कंटाळून लहान भाऊ आणि वडिलांनीच त्याचा खून करून हातपाय बांधून मृतदेह म्हाळुंगी नदीपात्रात फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी दिली. शुक्रवारी सकाळी भोजापूर धरणात ३० वर्षीय युवकाचा मृतदेह हात बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता. मृतदेह कुचलेल्या अवस्थेत असल्याने दापूर आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जागेवरच शवविच्छेदन केले होते. मृत युवकाच्या खिशात आधारकार्ड व लायसन्स आढळून आल्याने मृतदेहाची ओळख पटली होती. मृत युवकाचे नाव ज्ञानेश्वर माधव सोनवणे असून, तो संगमनेर तालुक्यातील कासार-दुमाला येथील रहिवासी असल्याचे  समजल्यानंतर त्यादृष्टीने वावी पोलिसांनी तपासाची सूत्रे हलविली. शुक्रवारी मृतदेह आढळून आल्यानंतर घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक शर्मिला घारगे-वालावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी माधव रेड्डी (पडिले) यांनी भेट देऊन तपासकामी सूचना केल्या होत्या. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंंह, अपर पोलीस अधीक्षक  घारगे-वालावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी तपासकामी पथके तयार करून मृत युवकाच्या गावात म्हणजे संगमनेर तालुक्यातील कासार-दुमाला येथे पाठविले होते. सहाय्यक निरीक्षक गलांडे, उपनिरीक्षक अभय ढाकणे, विकास काळे यांच्यासह हवालदार उमेश खेडकर, प्रकाश उंबरकर, नवनाथ आडके यांनी कासार दुमाला येथे जाऊन तपास केल्यानंतर मृत युवकाच्या घरी सोमवार (दि. २४) रोजी जोरदार भांडण झाल्याचे पोलिसांना समजले होते. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला होता. घरात भांडणे झाल्यामुळे पोलिसांची संशयाची सुई मृत युवकाचे वडिल माधव गबाजी सोनवणे (६५) व लहान भाऊ बाळासाहेब सोनवणे (२७) याच्याभोवती फिरली होती.मयत ज्ञानेश्वर हा दारू पिऊन आई, वडील, भाऊ यांना मारहाण करण्यासह त्रास देत होता. या जाचाला कंटाळून वडील माधव सोनवणे व लहान भाऊ बाळासाहेब सोनवणे यांनी त्याचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर त्याचे हातपाय बांधून त्याला नदीपात्रात फेकून दिले.संशयितांच्या बोलण्यात विसंगतीघरात भांडण झाल्यामुळे पोलिसांची संशयाची सुई मृत युवकाचे वडील माधव गबाजी सोनवणे (६५) व लहान भाऊ बाळासाहेब सोनवणे (२७) याच्याभोवती फिरली होती. पोलिसांनी वडील व भाऊ यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांच्या बोलण्यात विसंगती आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर दोघांनी खुनाची कबुली दिल्याची माहिती वावी पोलिसांनी दिली.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी