शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

भरवस्तीत धोकादायक उघडे रोहित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 00:39 IST

वीज वितरण कंपनीच्या देवगाव सबस्टेशनअंतर्गत असलेल्या कार्यक्षेत्रातील रोहित्रांचा बोजवारा उडाला आहे. वारंवार तक्रारी, पदाधिकारी यांनी समक्ष, फोनद्वारे केलेली कानउघडणीचाही परिणाम या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर झाल्याचे दिसून येत नाही. केवळ ग्रामीण भाग म्हणून दुर्लक्ष केले जात असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. उघडे रोहित्र, तुटलेल्या वीजतारा यांचा स्पर्श होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

ठळक मुद्देखेडलेझुंगेवासीयांमध्ये संताप : वारंवार कळवूनही महावितरणचे दुर्लक्ष

खेडलेझुंगे : वीज वितरण कंपनीच्या देवगाव सबस्टेशनअंतर्गत असलेल्या कार्यक्षेत्रातील रोहित्रांचा बोजवारा उडाला आहे. वारंवार तक्रारी, पदाधिकारी यांनी समक्ष, फोनद्वारे केलेली कानउघडणीचाही परिणाम या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर झाल्याचे दिसून येत नाही. केवळ ग्रामीण भाग म्हणून दुर्लक्ष केले जात असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. उघडे रोहित्र, तुटलेल्या वीजतारा यांचा स्पर्श होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे.रूई-कोळगाव रस्त्यावर खंडेराव नरहरी गवळी यांचे वस्तीवर वीज महावितरण कंपनीचे रोहित्र (डीपी) आहे. रोडलगत असलेल्या या रोहित्राची अत्यंत बिकट परिस्थितीतून वाटचाल सुरू आहे. सदरच्या रोहित्राचे खांब तिरपे झाले आहेत. हे रोहित्र उघड्या स्वरूपात आहे. त्यावरील पत्र्याच्या पेट्या गंजून सडून गेलेली आहे. त्यामुळे त्यातील सर्व जोडणी करण्यात आलेले वायरींचे जॉइंट उघडे आहेत.फुटलेले व नादुरुस्त फ्युज त्या फ्युजमधील वाहिन्या परस्पर कनेक्शनसाठी जोडण्यात आल्या आहेत. त्यांना टेपही लावण्यात आलेला नाही किंवा विद्युतरोधक अशी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. या वस्तीवर लहान मुले, पाळीव प्राणीही आहेत. या उघड्या व धोकादायक रोहित्रांमुळे मोठा अनर्थ घडू शकतो. त्यामुळे त्याची दुरुस्ती होणे अत्यंत गरजेचे आहे. भविष्यात कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी या रोहित्राची तत्काळदुरु स्ती करून नवीन खांब बसवावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.वीज वितरण कंपनीच्या अधिकारी-कर्मचारी यांनी याबाबत सजगता दाखवून तत्काळ परिसरातील अशा धोकादायक रोहित्रांचीमाहिती गोळा करून त्यांच्या दुरुस्तीबाबत वरिष्ठ कार्यालयास कळवून दुरु स्ती करणे गरजेचे आहे.रोडलगत असलेल्या रोहित्रांची अशी दयनीय अवस्था असून, शेतातील, झाडांच्या गर्दीत असलेल्या रोहित्रांबाबत विचार न केलेलाबरा. परिसरातील एकूण रोहित्रांपैकी नादुरुस्त रोहित्रांची संख्यानक्कीच जास्त असल्याचा अंदाज आहे.ग्रामीण भागात वीज वितरण कंपनी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्व समान्य जनता यांच्याबाबत भीत भीतच माहीती देतात.ग्रामीण भागात बिबट्या, सर्प, रानडुकरांसारख्या श्वापदांमुळे हैराण असलेल्या ग्रामीण भागातील शेतकºयांना जाणूबुजून रात्रीची वीज उपलब्ध करून देण्यात येते. त्यामुळे शेतकरीवर्ग हैराण आहे. तरी या परिसरातील शेतकºयांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी परिसरातील नादुरु स्त रोहित्र व गंजलेल्या पेट्या, तिरपे झालेले खांब, दोन खांबामधील वीजवाहिनींचा झोल व इतर समस्यांची तत्काळ वरिष्ठ स्तरावरून पाहणी करून दुरु स्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण