शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

डासांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 01:25 IST

दहा ते पंधरा वर्षांपूर्वी बांधलेल्या गटारी ठिकठिकाणी तुटल्यामुळे सांडपाणी गटारीच्या बाहेर येऊन घरासमोर तसेच रस्त्यावर साचत आहे. परिणामी डास व माश्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सदर गटारींचे नव्याने बांधकाम करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

ठळक मुद्देनांदूरवैद्य । गटारींचे नव्याने बांधकाम करण्याची मागणी

नांदूरवैद्य : दहा ते पंधरा वर्षांपूर्वी बांधलेल्या गटारी ठिकठिकाणी तुटल्यामुळे सांडपाणी गटारीच्या बाहेर येऊन घरासमोर तसेच रस्त्यावर साचत आहे. परिणामी डास व माश्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सदर गटारींचे नव्याने बांधकाम करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.गावातील गल्लीबोळात सांडपाणी साचलेले दिसून येत असून, तुंबलेले नाले, गटारी व कचऱ्याचे ढीगही मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. घाणीचे प्रमाण वाढल्यामुळे माश्या व डासांच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या प्रादुर्भावामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. ग्रामपंचायतीने गावात वेळीच औषध फवारणी करून माश्या व डासांचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पावसाळ्यानंतर नांदूरवैद्य येथे कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढलेला दिसत आहे. प्रत्येक गल्लीत दररोज स्वच्छतेचा नारा दिला जात असला तरी ठिकठिकाणी बारीकसारीक कचºयाचे ढिग आढळून येत आहेत. अनेक गल्ल्यांमध्ये नालेसफाई नसल्यामुळे येथेही मच्छर, माश्यांचा प्रादुर्भाव वाढलेला दिसत आहे. मच्छरांच्या या प्रादुर्भावापासून मुक्तता करण्यासाठी औषधाची फवारणी करण्यात यावी, तसेच प्रत्येक कुटुंबाला कीटकनाशक पावडरच्या पाकिटांचे वाटप करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.गावातील नागरिकांनीदेखील स्वच्छतेसाठी पुढे आले पाहिजे. आपण ज्या ठिकाणी राहातो, वावरतो तो परिसर, घर, घरातील व घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. फवारणीयंत्र अनेक दिवसांपासून नादुरु स्त असल्यामुळे त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करून गावातील घाणीचे साम्राज्य असलेल्या परिसरात औषध फवारणी करण्यात येईल, असे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

गावातील गटारींची अवस्था अतिशय बिकट झाली असून, सदर तुटलेल्या गटारींची नव्याने दुरु स्ती करण्यात यावी. तसेच ग्रामपंचायत कार्यालयाजवळील प्रसाधनगृहाची नव्याने बांधणी करण्यात यावी. सदर प्रसाधनगृह अस्वच्छ असल्यामुळे बसस्थानकावरील प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.- गणेश मुसळे, ग्रामस्थ, नांदूरवैद्य

टॅग्स :Healthआरोग्य