शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
6
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
7
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
8
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
9
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
10
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
11
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
12
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
13
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
14
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
15
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
16
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
17
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
18
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
19
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
20
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी

डासांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 01:25 IST

दहा ते पंधरा वर्षांपूर्वी बांधलेल्या गटारी ठिकठिकाणी तुटल्यामुळे सांडपाणी गटारीच्या बाहेर येऊन घरासमोर तसेच रस्त्यावर साचत आहे. परिणामी डास व माश्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सदर गटारींचे नव्याने बांधकाम करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

ठळक मुद्देनांदूरवैद्य । गटारींचे नव्याने बांधकाम करण्याची मागणी

नांदूरवैद्य : दहा ते पंधरा वर्षांपूर्वी बांधलेल्या गटारी ठिकठिकाणी तुटल्यामुळे सांडपाणी गटारीच्या बाहेर येऊन घरासमोर तसेच रस्त्यावर साचत आहे. परिणामी डास व माश्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सदर गटारींचे नव्याने बांधकाम करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.गावातील गल्लीबोळात सांडपाणी साचलेले दिसून येत असून, तुंबलेले नाले, गटारी व कचऱ्याचे ढीगही मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. घाणीचे प्रमाण वाढल्यामुळे माश्या व डासांच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या प्रादुर्भावामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. ग्रामपंचायतीने गावात वेळीच औषध फवारणी करून माश्या व डासांचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पावसाळ्यानंतर नांदूरवैद्य येथे कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढलेला दिसत आहे. प्रत्येक गल्लीत दररोज स्वच्छतेचा नारा दिला जात असला तरी ठिकठिकाणी बारीकसारीक कचºयाचे ढिग आढळून येत आहेत. अनेक गल्ल्यांमध्ये नालेसफाई नसल्यामुळे येथेही मच्छर, माश्यांचा प्रादुर्भाव वाढलेला दिसत आहे. मच्छरांच्या या प्रादुर्भावापासून मुक्तता करण्यासाठी औषधाची फवारणी करण्यात यावी, तसेच प्रत्येक कुटुंबाला कीटकनाशक पावडरच्या पाकिटांचे वाटप करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.गावातील नागरिकांनीदेखील स्वच्छतेसाठी पुढे आले पाहिजे. आपण ज्या ठिकाणी राहातो, वावरतो तो परिसर, घर, घरातील व घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. फवारणीयंत्र अनेक दिवसांपासून नादुरु स्त असल्यामुळे त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करून गावातील घाणीचे साम्राज्य असलेल्या परिसरात औषध फवारणी करण्यात येईल, असे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

गावातील गटारींची अवस्था अतिशय बिकट झाली असून, सदर तुटलेल्या गटारींची नव्याने दुरु स्ती करण्यात यावी. तसेच ग्रामपंचायत कार्यालयाजवळील प्रसाधनगृहाची नव्याने बांधणी करण्यात यावी. सदर प्रसाधनगृह अस्वच्छ असल्यामुळे बसस्थानकावरील प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.- गणेश मुसळे, ग्रामस्थ, नांदूरवैद्य

टॅग्स :Healthआरोग्य