शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

हरित क्षेत्राला पन्नास टक्कयापेक्षा अधिक क्षेत्रातील शेतकऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 01:13 IST

नाशिक : स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील मखमलाबाद शिवारात साकारण्यात येणाºया हरितक्षेत्र विकास प्रकल्पासाठी अंतिम उद्देश घोषित करण्यासाठी मंगळवारी (दि. २९) होणाºया महासभेत निर्णय होणार आहे. मात्र अगोदर ज्या शेतकऱ्यांनी संमती दिली त्याच्या अटी शर्तींबाबत खुलासा झालेला नाही तर विरोध करणाºया शेतकºयांचे प्रमाण हे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी या शेतकºयांनी केली आहे. त्यामुळे मंगळवारी होणाºया सभेत लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात याकडे शेतकºयांचे लक्ष लागून आहे.

ठळक मुद्देअडचण : महासभेच्या आजच्या निणर्याकडे लक्ष

नाशिक : स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील मखमलाबाद शिवारात साकारण्यात येणाºया हरितक्षेत्र विकास प्रकल्पासाठी अंतिम उद्देश घोषित करण्यासाठी मंगळवारी (दि. २९) होणाºया महासभेत निर्णय होणार आहे. मात्र अगोदर ज्या शेतकऱ्यांनी संमती दिली त्याच्या अटी शर्तींबाबत खुलासा झालेला नाही तर विरोध करणाºया शेतकºयांचे प्रमाण हे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी या शेतकºयांनी केली आहे. त्यामुळे मंगळवारी होणाºया सभेत लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात याकडे शेतकºयांचे लक्ष लागून आहे.महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. २९) महासभा होणार आहे. मखमलाबाद येथे स्मार्ट सिटी अंतर्गत स्वतंत्र नगरी वसविण्यासाठी अत्याधुनिक जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी आधी शेतकºयांच्या जागा घेऊन टीपी स्कीम म्हणजेच नगररचना योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकºयांना फायनल प्लॉट मिळणार आहे. ५५-४५ या तत्त्वावर जागा घेण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव होता. काही शेतकºयांनी त्यास संमती दिली असली तरी २२ अटी घातल्या होत्या आणि त्याचे निराकरण झाल्यानंतरच योजना राबबावी, असे त्यांचे म्हणणे होते. महासभेत या विषयावर चर्चा झाली आणि त्यांनी नगररचना योजना राबविण्यासाठी इरादादेखील स्पष्ट करण्यात आला. मात्र, प्रत्यक्ष शासनाला पाठविलेल्या ठरावात या अटींचा उल्लेख नाही. दुसºया शेतकºयांच्या गटाचा पूर्ण योजनेलाच विरोध आहे. त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर त्यावर दिलासा मिळू शकला नसला तरी नगररचना विभागाने मात्र त्यांचे म्हणणे एकून घ्यावे, असे तांत्रिक मान्यता देतानाच्या पत्रात नमूद केले आहे. मात्र प्रत्यक्षात अशी कोणतीही सुनावणीच झालेली नाही. त्यातच नगररचना योजनेसाठी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रातील शेतकºयांचा विरोध असल्यास हा प्रस्ताव रद्द होईल अशी तरतूद असल्याने आता विरोध करणाºया शेतकºयांची संख्या अधिक असून, त्यामुळेच हा प्रकल्प रद्द करावा, अशी त्यांची मागणी आहे. भाजपच्या उपमहापौर भिकूबाई बागुल यांचा या प्रस्तावास विरोध असून, त्यांच्या सुपुत्र आणि माजी नगरसेवक संजय बागुल यांच्यासह अन्य शेतकºयांनीच यापूर्वी विरोध केला आहे. त्यामुळे आताही त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.नगररचना विभागाने यापूर्वी मसुद्याला तांत्रिक मान्यता दिली असली तरी आता त्यात अनेक त्रुटी त्यांना दर्शवल्या असून त्यानुसार विरोध करणाºयांची बाजू समजावून घेऊन सुनावणी देणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. कारण विरोध करणाºया शेतकºयांनी प्रतिज्ञापत्रावर विरोध नोंदवला आहे. नाल्या लगत तीस मिटर रस्ता दाखवताना प्रस्तावात वाकडा असलेला नाला सरळ दर्शविण्यात आला आहे, त्याबाबत देखील नगररचना संचालकांनी त्रुटी काढली आहे. त्याच प्रमाणे मधूक र कोशिरे यांच्या जमिनीसंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्यात कोणतीही तब्दीली करता येणार नसल्याचे दिवाणी न्यायालयाने स्पष्ट केले आहे, असे अनेक मुद्दे विरोध करणाºया शेतकºयांनी मांडले आहेत. महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासह सर्व पक्षीय गटनेत्यांना त्यांनी पत्र दिले आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती