शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

जातपडताळणीची हजाराहून अधिक प्रकरणे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:28 IST

विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आवश्यक असलेल्या जातपडताळणी प्रमाणपत्रांअभावी अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशपासून वंचित रहावे लागत असताना नाशिक जिल्ह्यातील सुमारे एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांची जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणे प्रलंबित आहेत.

ठळक मुद्देपदव्युत्तर प्रवेशात अडचणी : पडताळणी समितीकडून शैक्षणिक दाखल्यांना प्राधान्य

नाशिक : विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आवश्यक असलेल्या जातपडताळणी प्रमाणपत्रांअभावी अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशपासून वंचित रहावे लागत असताना नाशिक जिल्ह्यातील सुमारे एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांची जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणे प्रलंबित आहेत. ही प्रकरणे निकाली काढण्यासाठी जातपडताळणी समितीचे अविरत काम सुरू आहे. मात्र प्रलंबित प्रकरणांपैकी अनेक अर्जदार त्यांच्या प्रकरणातील त्रुटींविषयी एसएमएस आणि पत्र पाठवूनही पुरावे सादर करीत नसल्याचे जातपडताळणी समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.नाशिक जिल्ह्यातील सुमारे १०७० जातवैधता प्रमाणपत्रांची प्रकरणे प्रलंबित आहेत. ही सर्व प्रकरणे वेगवेगळ्या त्रुटींअभावी प्रलंबित असल्याचा दावा जातपडताळणी समितीने केला आहे. जातवैधता प्रमाणपत्रांची शैक्षणिक प्रकरणे समितीकडून प्राधान्यक्रमाने निकाली काढले जात असल्याचे जातपडताळणी समितीचे सदस्य माधव पवार व विजय कोर यांनी दिली आहे. मात्र विद्यार्थ्यांकडून जातपडताळणीसाठी विद्यार्थ्यांची अडवणूक होत असून, पडताळणी समितीचे काम संथगतीने सुरू असल्याचा आरोप होत आहे. त्याचप्रमाणे जातपडताळणी समितीकडून जातवैधता प्रमाणपत्रांच्या दाव्यांमध्ये जाणीवपूर्वक त्रुटी काढून प्रकरणे प्रलंबित ठेवली जात असल्याचे आरोप पालक व विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. त्यातच पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी जातवैधता प्रमाणपत्र आवश्यक असून, अशा विद्यार्थ्यांना समितीकडे दावा दाखल करून प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तीन महिन्यांहूनही कमी कालावधी मिळत असल्यामुळे अशा विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात अडचण होत आहे. सर्व पुरावे सादर करूनही समितीकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप करीत पालकांनी जातवैधता प्रमाणपत्रांसाठी समाज कल्याण विभागात आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचा दावा केला आहे. मात्र जात सिद्ध करण्याची जबाबदारी ही संबंधित अर्जदाराची आहे. मात्र विद्यार्थी आणि पालक जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केल्यानंतर त्यातील त्रुटींची पूर्तताच करीत नसल्याने काही प्रलंबित आहेत. ज्या प्रकरणांमध्ये सर्व कागदपत्रांची आणि पुराव्यांची पूर्तता केलेली आहे असे कोणतेही प्रकरण समितीकडे प्रलंबित नसून अशाप्रकारची गेल्या तीन महिन्यांत २ जुलैपर्यंत प्राप्त झालेली सर्व प्रकरणे समितीने निकाली काढल्याचे माधव वाघ यांनी सांगितले.(क्रमश:)

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकारCaste certificateजात प्रमाणपत्र