शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

राज्य सरकारला महिनाभराचा अल्टिमेटम, अन्यथा पुन्हा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:11 IST

मराठा आरक्षणाच्या विषयावर कोंडी फुटावी यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दुसरे राज्यस्तरीय मूक आंदोलन सोमवारी (दि. २१) करण्यात ...

मराठा आरक्षणाच्या विषयावर कोंडी फुटावी यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दुसरे राज्यस्तरीय मूक आंदोलन सोमवारी (दि. २१) करण्यात आले. नाशिक शहरातील गंगापूर रोडवर झालेल्या या आंदोलनात खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली समाजाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनात मराठा आरक्षणावर लोकप्रतिनिधींना बोलावे असे जाहीर आवाहन करण्यात आल्याने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबींसींचे नेते छगन भुजबळ, राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे तसेच विधान सभेचे अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींनी आंदोलनस्थळी भेट घेऊन मराठा समाजाच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली.

छत्रपती संभाजीराजे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारला महिनाभराची मुदत दिली असली तरी या काळात आपण राज्यभर दौरा करणार असून महिनाभरात मागण्यांची पूर्तता न झाल्यास पुन्हा राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असे सांगितले. राज्य शासन आणि केंद्र सरकारने समन्वयाची भूमिका घेतली, तरच आरक्षण मिळू शकणार असल्याचेही ते म्हणाले.

कोल्हापूर येथील आंदोलनानंतर राज्य सरकारच्या निमंत्रणानुसार त्यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार येत्या गुरुवारी राज्य शासन रिव्ह्यू पिटिशन दाखल करणार आहे. त्यासाठी २१ दिवसांचा वेळ मागितला असल्याने आंदोलन पुढे ढकलले आहे, असे ते म्हणाले.

इन्फो...

राज ठाकरे यांच्या सूचनेचे स्वागत

मुंबईतील विमानतळाला छत्रपती शिवरायांचे नाव देण्याच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेचे खासदार संभाजीराजे यांनी स्वागत केले. तसेच सारथीला ८ विभागीय कार्यालये सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यातील कोल्हापूर उपकेंद्राचे काम जागा निश्चितीनंतर सुरू होणार आहे. या संस्थेला अधिक निधी व संपूर्ण स्वायत्तता देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोट

मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे, मात्र इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये. मराठा समाजासोबतच ओबीसी आरक्षणाचाही प्रश्न तयार झाला आहे. त्यामुळे या समाजांनी एकत्रित येऊन आरक्षणासाठी लढा देण्याची आवश्यकता आहे. ओबीसींचे ‘आक्रोश’ आंदोलन त्यांचे राजकीय आरक्षण वाचविण्यासाठीच आहे.

- छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठामंत्री

कोट-

मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका करण्यासोबतच राज्य शासन राज्यपालांमार्फत राष्ट्रपतींकडेही लवकरच प्रस्ताव सादर करणार आहे. अन्य ११ मागण्यांबाबत राज्य शासन लवकरच दिलासादायक निर्णय घेईल.

- दादा भुसे, कृषिमंत्री