शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

चक्रीवादळांमुळे मान्सून लांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 01:39 IST

नैर्ऋत्य मान्सूनच्या प्रवासात अडथळा निर्माण झाल्यामुळे मान्सूनची प्रगती रखडली असून, पठारी प्रदेशासह बहुतांश भागात मान्सूनचे आगमन २२ जूनपर्यंत लांबणार आहे. प्रशांत महासागराच्या पश्चिम नैर्ऋत्य भागात चक्रीवादळे तयार झाली आहे.

नाशिक : नैर्ऋत्य मान्सूनच्या प्रवासात अडथळा निर्माण झाल्यामुळे मान्सूनची प्रगती रखडली असून, पठारी प्रदेशासह बहुतांश भागात मान्सूनचे आगमन २२ जूनपर्यंत लांबणार आहे. प्रशांत महासागराच्या पश्चिम नैर्ऋत्य भागात चक्रीवादळे तयार झाली आहे. या वादळांच्या प्रभावाने मान्सूनचे आगमन लांबणार असून, या काळात तपमानाचा ४० अंश सेल्सिअसपर्यंत लांबण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.  प्रशांत महासागराच्या पश्चिम नैर्ऋत्य भागात म्हणजेच जपानच्या पूर्वेला व कॅनडाच्या पश्चिमेला आलेली वादळे ही या दशकातील सर्वात मोठी चक्रीवादळे ठरण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून भारतीय उपखंडावरील सर्व बाष्प आणि ढग हे चक्रीवादळाच्या केंद्रबिंदूकडे ओढले जात आहेत. त्यामुळेच  विविध भागातून ताशी १५ ते २० किमी वेगाने वारे वाहत असून, सर्व बाष्पयुक्त ढग भूखंडावरून वाहून जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र पठार व दख्खनचे पठार या  पठारी भागात पावसाचा खंड पडणारआहे. जोपर्यंत प्रशांत महासागरातील वादळे शांत होत नाहीत तोपर्यंत पाऊस लांबण्याचे संकेत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्याला साधारणत: १० ते ११ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता असून, १२ ते २२ जूनपर्यंत नाशिक जिल्हा व परिसरात पाऊस ओढ देणार आहे. ही परिस्थिती २३ जूननंतर बदलायला सुरु वात होईल व मान्सूनची प्रगती, प्रवास उत्तरेच्या दिशेने सुरू होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.चक्रीवादळांमुळे मान्सून लांबणार असल्याने २२ जूनपर्यंतच्या कालावधीत नाशिक जिल्ह्यात तपमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांनी बागायती कापसाची लागवड केलेली असेल त्यांनी २ दिवसाआड सिंचन करणे आवश्यक आहे.त्याचप्रमाणे ज्यांनी कोरड लागवड अथवा धूळपेरणी केली आहे, ती वाया जाण्याची भीतीही असून, किमान पाऊस पडल्याशिवाय शेतकºयांनी पेरणी करू नये, असा सल्ला कृषी तज्ज्ञ व जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

टॅग्स :Rainपाऊस