शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

चक्रीवादळांमुळे मान्सून लांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 01:39 IST

नैर्ऋत्य मान्सूनच्या प्रवासात अडथळा निर्माण झाल्यामुळे मान्सूनची प्रगती रखडली असून, पठारी प्रदेशासह बहुतांश भागात मान्सूनचे आगमन २२ जूनपर्यंत लांबणार आहे. प्रशांत महासागराच्या पश्चिम नैर्ऋत्य भागात चक्रीवादळे तयार झाली आहे.

नाशिक : नैर्ऋत्य मान्सूनच्या प्रवासात अडथळा निर्माण झाल्यामुळे मान्सूनची प्रगती रखडली असून, पठारी प्रदेशासह बहुतांश भागात मान्सूनचे आगमन २२ जूनपर्यंत लांबणार आहे. प्रशांत महासागराच्या पश्चिम नैर्ऋत्य भागात चक्रीवादळे तयार झाली आहे. या वादळांच्या प्रभावाने मान्सूनचे आगमन लांबणार असून, या काळात तपमानाचा ४० अंश सेल्सिअसपर्यंत लांबण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.  प्रशांत महासागराच्या पश्चिम नैर्ऋत्य भागात म्हणजेच जपानच्या पूर्वेला व कॅनडाच्या पश्चिमेला आलेली वादळे ही या दशकातील सर्वात मोठी चक्रीवादळे ठरण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून भारतीय उपखंडावरील सर्व बाष्प आणि ढग हे चक्रीवादळाच्या केंद्रबिंदूकडे ओढले जात आहेत. त्यामुळेच  विविध भागातून ताशी १५ ते २० किमी वेगाने वारे वाहत असून, सर्व बाष्पयुक्त ढग भूखंडावरून वाहून जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र पठार व दख्खनचे पठार या  पठारी भागात पावसाचा खंड पडणारआहे. जोपर्यंत प्रशांत महासागरातील वादळे शांत होत नाहीत तोपर्यंत पाऊस लांबण्याचे संकेत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्याला साधारणत: १० ते ११ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता असून, १२ ते २२ जूनपर्यंत नाशिक जिल्हा व परिसरात पाऊस ओढ देणार आहे. ही परिस्थिती २३ जूननंतर बदलायला सुरु वात होईल व मान्सूनची प्रगती, प्रवास उत्तरेच्या दिशेने सुरू होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.चक्रीवादळांमुळे मान्सून लांबणार असल्याने २२ जूनपर्यंतच्या कालावधीत नाशिक जिल्ह्यात तपमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांनी बागायती कापसाची लागवड केलेली असेल त्यांनी २ दिवसाआड सिंचन करणे आवश्यक आहे.त्याचप्रमाणे ज्यांनी कोरड लागवड अथवा धूळपेरणी केली आहे, ती वाया जाण्याची भीतीही असून, किमान पाऊस पडल्याशिवाय शेतकºयांनी पेरणी करू नये, असा सल्ला कृषी तज्ज्ञ व जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

टॅग्स :Rainपाऊस