शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
3
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
4
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
5
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
6
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
7
"तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
8
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
9
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
10
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
11
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
12
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
13
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
14
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
15
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
16
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
17
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
18
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
19
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
20
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’

मान्सून आला... आपत्ती टाळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 00:40 IST

दोन आठवड्यांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. वादळी वाºयामुळे शेकडो घरांचे पत्रे उडाले, तर वीज कोसळून नागरिकांना जीव गमवावा लागला.

नाशिक : दोन आठवड्यांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. वादळी वाºयामुळे शेकडो घरांचे पत्रे उडाले, तर वीज कोसळून नागरिकांना जीव गमवावा लागला. ठिकठिकाणी झाडे व फांद्या उन्मळून पडल्याने परिस्थिती पूर्वपदावर येण्यास बराच कालावधी लोटला. दरवर्षी पावसाळ्यात नेहमीच नैसर्गिक आपत्तीचा धोका निर्माण होतो. ही आपत्ती नेमकी कधी व कशी येईल हे कोणी सांगू शकत नाही, तसेच ती थोपवणेही कोणाला शक्य नाही. मात्र अशी आपत्ती आली किंवा येणार असेल तर फार फार तर जीवित व वित्तहानी कशी टाळता येईल, त्याबाबत उपाययोजना करणे मानवाला शक्य आहे. यंदा मान्सूनचे आगमन होण्यापूर्वीच मान्सूनपूर्व पावसाने सलामी देत भविष्याची चुणूक दाखविली आहे. पाऊस म्हटला की वादळी वारा, वीज कोसळणे, नदी, नाल्यांना महापूर येणे या नैसर्गिक आपत्तीच्या संभाव्य घटना घडू शकतात. त्यापासून बचाव करणे व आपत्तीत सापडलेल्यांना मदत करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनांतर्गत काही खबरदारीच्या उपाययोजना सुचविण्यात येऊन विविध यंत्रणांची जबाबदारीही निश्चित करण्यात आलेली आहे. अर्थात शासकीय यंत्रणा सारे काही घडून गेल्यावर उपाययोजना करेनच, परंतु नैसर्गिक आपत्तीपासून स्वत:चा बचाव कसा करता येईल, नागरिकांनी सतर्क राहणेही गरजेचे आहे. धोकादायक ठिकाणांवर सेल्फी घेणे, गड, किल्ले, ट्रेकिंग ठिकाणांची माहिती नसताना गर्दी करणे, पूर-धबधब्याचे फोटो काढणे आदी गोष्टी टाळणे क्रमप्राप्त आहे. स्वत: सुरक्षित राहिल्यास दुसºयाची सुरक्षितता जोपासता येते हेच सर्वाधिक महत्त्वाचे...अशी आहेमान्सूनपूर्व तयारी४जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आलेला असून, कार्यालयीन वेळेमधील कर्मचाऱ्यांची ड्यूटी धरून जिल्हास्तरीय कार्यालयांचे कर्मचाºयांची रात्रीच्या दोन पाळ्यांमध्ये अशा एकूण तीन पाळ्यांमध्ये (दिवस व रात्र) नियंत्रण कक्ष सुरू आहे.४जिल्हा नियंत्रण कक्षासाठी १०७७ हा टोल फ्री क्रमांक सर्वांसाठी कार्यान्वित करण्यात आलेला आहे.४तालुकास्तरावर १ जूनपासून २४ तास नियंत्रण कक्ष सुरू करण्याच्या सूचना देण्यात येऊन ते कार्यान्वित झाले आहेत.४जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना तालुकास्तरावरील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी यांच्या आवश्यकतेनुसार मान्सूनपूर्व बैठक घेऊन तालुक्यामध्ये आवश्यक त्या आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करण्यात आलेले आहे.४पाटबंधारे विभागास नाशिक जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याचा साठा महसूल विभागास कळविणे तसेच सोडलेले पाणी व त्यामुळे बाधित होणारी गावे याबाबतची माहिती कळविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार पूरबाधित गावांना अगोदर सूचना देणे काठावरच्या गावांमधील नागरिकांना धोका पोहोचू नये म्हणून आगाऊ कार्यवाही करणे सहज शक्य होणार आहे.गोदावरीच्या पुराचा धोकागोदावरी व दारणा नदी या दोन महत्त्वाच्या नद्या असून, या नद्यांवर धरणे बांधण्यात आलेली आहेत. गौतमी गोदावरी, कश्यपी, गंगापूर व आळंदी या चार धरणांतून साधारणत: वीस हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग केल्यास गोदावरी नदीच्या पुराचा फटका नाशिक शहरातील नदीकाठच्या वस्त्यांना पोहोचू शकतो. तर मुकणे, दारणा, कडवा, वालदेवी या धरणांतून पाणी सोडल्यास ते दारणा नदीतून ३५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग केल्यास दारणा, सांगवी, गोंडेगाव, कोठुरे, कालवी, सावळी, गंगावाडी या गावांना धोका पोहोचतो. वाघाड, करंजवण, पुनेगाव, ओझरखेड, पालखेड या धरणातून कादवा नदीतून ३५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग झाल्यास ब्राह्मणगाव, सुंदरपूर, रौळस या गावांना पुराचा धोका आहे.४गोदावरी, दारणा व कादवा या तीन धरणांचा विसर्ग नांदूरमधमेश्वर येथे येतो, त्यामुळे बॅक वॉटरमुळे सायखेडा, चांदोरी या गावांना आजवर वेळोवेळी पाण्याचा विळखा पडत असला तरी, गेल्या तीन वर्षांपासून नांदूरमधमेश्वर धरणाला दरवाजे बसविण्यात आल्याने पुराचा धोका कमी झाला असला तरी, साधारणत: ९० हजार क्यूसेकच्या पुढे विसर्ग झाल्यास चांदोरी, सायखेडा, शिंगवे, करंजगाव, चापडगाव, मांजरगाव, चाटोरी, खेडलेझुंगे, वडगाव, कानळद, कोपरगाव या गावांना पुराच्या पाण्याचा धोका आहे.

टॅग्स :Rainपाऊसnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय