शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नाशिकला मॉन्सून दाखल एका दिवसात ६३ मिलिमीटरची हजेरी

By admin | Updated: June 17, 2014 00:09 IST

नाशिकला मॉन्सून दाखल एका दिवसात ६३ मिलिमीटरची हजेरी

 

नाशिक : आधी केरळ आणि नंतर कोकणात दाखल झालेल्या मॉन्सूनने गेल्या काही दिवसांपासून मुंबईत आणि आता दोन दिवसांपासून नाशिकमध्येही हजेरी लावल्याचे चित्र आहे. सोमवारी (दि. १६) जिल्ह्यात ६३ मिलिमीटर पावसाची नोेंद करण्यात आली.रविवारी मध्यरात्री साडेतीन ते चारच्या दरम्यान पावसाने हजेरी लावली होती. त्यात सोमवारी दिवसभर वातावरण ढगाळ होते. दुपारनंतर काही भागात पावसाला रिमझिम सुरुवात झाली. दुपारी साडेतीननंतर मात्र काही वेळ शहराच्या प्रमुख भागात पावसाने दमदार हजेरी लावली. सोमवारी दिवसभरात ६३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, ती तालुकानिहाय पुढीलप्रमाणे- नाशिक- ६ मि.मी., इगतपुरी- ६, दिंडोरी- १, पेठ- ७, त्र्यंबकेश्वर व सुरगाणा- ३० मि.मी., तर अन्य तालुक्यांत पावसाची निरंक नोेंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षाच्या तुलनेत पावसाची हजेरी जूनच्या पहिल्या आठवड्यात ९० टक्के कमी झाली आहे. यंदाच्या वर्षी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल अन् मे महिन्यातही पावसाने अवेळी हजेरी लावल्याने यंदाच्या पावसाळ्यात पाऊस कमी होण्याची चर्चा होती. त्यातच हवामान खात्याने यंदाच्या वर्षी सरासरीच्या तुलनेत अवघा ८८ ते ९० टक्केच पाऊस होणार असल्याचे जाहीर केले होते. १ ते ११ जून २०१४ दरम्यान अवघ्या १६३.६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी १ ते ११ जून २०१३ दरम्यान तब्बल १५६८.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. त्या तुलनेत यंदाच्या पावसाची नोंद १६३.६ (१०.९१ टक्के) इतकी अत्यल्प झाली आहे. मागील वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात नाशिक, दिंडोरी, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, बागलाण, देवळा, सिन्नर या तालुक्यांत १०० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली होती.यावर्षी मात्र १ ते ११ जूनदरम्यान दिंडोरी- ५३, इगतपुरी- २२ वगळता अन्य तालुक्यांत अत्यल्प पावसाची नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)