शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

संरक्षक भिंतीला लागेना मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 00:11 IST

नाशिक : जुन्या नाशकातील गावठाणांमधील पडक्या वाड्यांइतकीच काझी गढी धोकादायक आहे. अनेक वर्षांपासून जीव मुठीत धरून राहणारे स्थानिक नागरिक जागा सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे याठिकाणी गढीला संरक्षक भितींचा प्रस्ताव पुढे आला. त्यासाठी इस्टिमेट आखले गेले, खर्चाचे अंदाज आखले गेले. परंतु खासगी जागेवर बांधकाम करण्यास महापालिकेला अधिकार नाही आणि दुसरीकडे शासनाकडून निधी आला नाही.

नाशिक : जुन्या नाशकातील गावठाणांमधील पडक्या वाड्यांइतकीच काझी गढी धोकादायक आहे. अनेक वर्षांपासून जीव मुठीत धरून राहणारे स्थानिक नागरिक जागा सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे याठिकाणी गढीला संरक्षक भितींचा प्रस्ताव पुढे आला. त्यासाठी इस्टिमेट आखले गेले, खर्चाचे अंदाज आखले गेले. परंतु खासगी जागेवर बांधकाम करण्यास महापालिकेला अधिकार नाही आणि दुसरीकडे शासनाकडून निधी आला नाही. परिणामी गढीचा धोका कायम आहे. गेल्या अनेक वर्षांत हा न सुटलेला प्रश्न यंदाही जैसे थे आहे.शहरातील जुन्या नाशिक गावठाणातील शंभर, दोनशे वर्षांपूर्वीचे वाडे आता जीर्ण झाले आहेत. त्यातील अनेक वाडे पडण्यावर आले आहेत. तर काही दर पावसाळ्यात कोसळत आहेत. त्यालगतच असलेली ही काझीची गढी. गढीला अनेक वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. तथापि, सध्या कोणीही वारस फिरकत नसल्याने ही जागी स्थलांतरितांसाठी मोक्याची बनली आहे. गढीचा एका भाग अत्यंत तीव्र उताराचा आहे. त्याच्या काठावर असलेल्या झोपड्यांना अत्यंत धोका आहे.पावसाळ्यात पाणी मुरल्यानंतर गढीवरील माती ढासळू लागली की, नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकतो. मग, शासकीय यंत्रणेची धावपळ होते. महापालिकेच्या वतीने नागरिकांना स्थलांतरित करण्याचा पर्याय असला तरी स्थानिक राजकारण आडवे येते आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेते मग हीच वेळ आहे, शासनाकडून, प्रशासनाकडून काहीतरी मागून घेण्याची. अशाप्रकारे मग तडजोडी सुरू होतात.२०१७-१८ मध्ये अशाच प्रकारे ढासळणाऱ्या गढीचा प्रश्न उभा राहिला. त्यावेळी सत्तेवर असलेले नसलेले सर्वच एकत्र आले आणि मग वर्षानुवर्षे गढीला कोट म्हणजेच संरक्षक भिंत बांधण्याची मागणी पुढे आली. त्यासाठी मग माती परीक्षण करण्यासाठी मेरीला नमुने पाठविण्यात आले. त्यांनी परीक्षण करून अहवाल दिला. काझीची गढी ही खासगी जागा असल्याने त्यावर सुमारे पाच ते सात कोटी रुपयांचा खर्च कसा करायचा, असा प्रश्न निर्माण झाला. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी शासनाकडून रक्कम आणून देऊ, असे आश्वासन दिले. परंतु गेल्या तीन वर्षांत निधी आला नाही की भिंत बांधली गेली नाही. राज्य शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभागानेदेखील याबाबत काहीच उत्सुकता दाखवली नाही. परिणामी काझी गढीला संरक्षक भिंत बांधण्याचा प्रश्न सुटलेला नाही.---------------------------गढी नव्हे, खरे तर ऐतिहासिक वारसा !भारतीय पुरातत्त्व विभागाची संरक्षित वास्तू असलेली ऐतिहासिक प्राचीन मातीची जुनी गढी म्हणजेच काझी गढीच्या तळाशी प्राचीन काळी ताम्रपाषाण युगातील नागरी वस्ती असावी, असा अंदाज वेळोवेळी झालेल्या उत्खननामधून तज्ज्ञांनी लिहून ठेवला आहे. या प्राचीन टेकडीवर १८८३ व १९०८ साली उत्खनन करण्यात आले. त्यानंतर पुन्हा परिसरात १९५०-५१ सालात भारतीय पुरातत्त्व विभाग व डेक्कन कॉलेजच्या वतीने नियमित उत्खनन करण्यात आले. भारतीय पुरातत्त्व विभागाने ही वास्तू ऐतिहासिक प्राचीन ठेवा म्हणून संरक्षित केली आहे. भारत सरकारच्या तत्कालीन पुरातत्त्व शिक्षण मंत्रालयाने १९४९-५० साली काझीची गढी प्राचीन स्मारके जतन कायद्यान्वये संरक्षित वास्तू म्हणून घोषित केली.---------------------गढीला वारस असून जणू ती स्थलांतरितांसाठी आश्रयस्थान झाली आहे. १९९० पूर्वी गढीचा काही भाग ढासळून दुर्घटना घडली होती. त्यावेळी तत्कालीन झोपडपट्टीवासीयांसाठी गाडगे महाराज वसाहत बांधून त्यात घरे देण्यात आली होती. या गढीवर कोणीही या आणि झोपडी टाका असे सुरू झाल्याने तेथे पुन्हा झोपड्या आणि पुन्हा पुनवर्सनचे प्रश्न यातच गढी गुरफटली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक