शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

महामार्गाच्या दुरुस्तीला अखेर लागला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 20:42 IST

घोटी : मुंबई - आग्रा महामार्गावर काही दिवसांपासून माणिकखांब, बोरटेंभे, सारख्या विविध अपघातात काहींना जीव गमवावा लागला. खासदार हेमंत गोडसे यांचा अल्टिमेटम, मनसे व आदिवासी संघटनेने आंदोलनाचा दिलेला इशारा, दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रस्त्याच्या दुर्दशेबद्दल व्यक्त केलेले आश्चर्य आणि ह्यलोकमतह्णने टाकलेला प्रकाश या साऱ्या घडामोडीनंतर अखेर टोल प्रशासनाने महामार्गावरील रस्त्याचे काम हाती घेतले असून खड्डे बुजवायला अखेर मुहूर्त लागला आहे.

ठळक मुद्देमुंबई-आग्रा महामार्ग : टोल प्रशासनाकडून रस्त्यांची कामे सुरू

घोटी : मुंबई - आग्रा महामार्गावर काही दिवसांपासून माणिकखांब, बोरटेंभे, सारख्या विविध अपघातात काहींना जीव गमवावा लागला. खासदार हेमंत गोडसे यांचा अल्टिमेटम, मनसे व आदिवासी संघटनेने आंदोलनाचा दिलेला इशारा, दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रस्त्याच्या दुर्दशेबद्दल व्यक्त केलेले आश्चर्य आणि ह्यलोकमतह्णने टाकलेला प्रकाश या साऱ्या घडामोडीनंतर अखेर टोल प्रशासनाने महामार्गावरील रस्त्याचे काम हाती घेतले असून खड्डे बुजवायला अखेर मुहूर्त लागला आहे. घोटी सिन्नर फाटा, न्हाईडीचा डोंगर, फूड प्लाझा, पिंप्री सदो बायपास ते कसारा घाट या विविध ठिकाणी कामाला सुरुवात झाली आहे.मुंबई - आग्रा महामार्गावरील गेल्या दोन महिन्यांपासून खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते. या खड्ड्यांमुळे नाहक जीव जात होते. बहुतांश नागरिक अधू झाले. दररोज गाड्या नादुरुस्त होत होत्या. वाढत्या खड्ड्यांमुळे महामार्गाची चाळण झाल्याने वाहन चालकांचे कंबरडे मोडले होते. कसारा घाट ते वाडीवऱ्हे दरम्यान रस्त्यावरील खड्डे डोकेदुखी बनली होती. इगतपुरी तालुका हद्दीतील झालेल्या ह्या खड्ड्यांकडे हेतुपुरस्सररित्या डोळेझाक केल्या जात असल्याचे निदर्शनास येत होते. या महामार्गाच्या झालेल्या दुरवस्थेला जबाबदार असलेल्या टोल प्रशासनाने कुठल्याही उपयोजना आखल्या नसल्याने त्या बद्दल आश्चर्य व्यक्त केले जात होते. त्या पार्श्वभूमीवर आता रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे.महामार्गावरील खड्डे, दिशादर्शक फलक, दुभाजकावरील वाढलेली झाडे, स्पीडब्रेकर, व्हाईट साईड पट्टी, साईडपट्ट्या मजबूत करणे, वळणे, धोकादायक ठिकाणे व अपघातग्रस्त ठिकाणी सूचनाफलक लावणे, उताराच्या व वळणाच्या ठिकाणी वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना करणे, धुक्याचे प्रमाण जास्त असल्याने विविध ठिकाणी रेडियम लाईट अशा विविध आवश्यक बाबींची प्रशासनाने पूर्तता केल्यास भविष्यातील अपघात कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या ठिकाणी उपाययोजनांची गरजमहामार्गावरील वाडीवऱ्हे बायपास, गोंदे फाटा, रोठे कंपनीसमोरील पूल, पाडळी फाटा, जिंदाल पूल, मुंढेगाव फाटा, माणिकखांब येथील दोन वळणमार्ग, रेल्वे पूल,सिन्नर फाटा ते टोल नाका, बोरंटेभे फाटा, इगतपुरी बायपास रेल्वे पूल, इगतपुरी बायपास ही अपघाताची क्षेत्र बनले आहेत. याठिकाणी उपाययोजनांची गरज आहे.फोटो- २६ महामार्ग वर्क-१

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाGovernmentसरकार