शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मोहपाडा-हतगड रस्ता : जीप, दुचाकीची समोरासमोर धडक; पाच जखमी सुरगाण्याजवळ अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:25 IST

सुरगाणा : चिराई घाटाजवळ रस्त्यावर झालेल्या जीप व दुचाकीच्या समोरासमोर धडकेत दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला, तर दुसºयाचा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ठळक मुद्देफरशीच्या वळणावर जोरदार धडक वाहतूक पोलीस दुर्लक्ष

सुरगाणा : तालुक्याचे प्रवेशद्वार समजले जाणारे चिराई घाटाजवळील मोहपाडा ते हतगड या जोड रस्त्यावर सकाळीच आठ वाजेच्या सुमारास झालेल्या जीप व दुचाकीच्या समोरासमोर धडकेत दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला, तर दुसºयाचा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर इतर पाच जण जखमी झाले असून, ते बुबळी येथील रहिवासी आहेत. त्यांची नावे समजू शकली नाहीत. त्यांना बुबळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार पांडूरंग चौरे (रा. सुफले दिगर ता. कळवण) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, महिंद्रा मॅक्स जीपचालक महेंद्र घुले (राहणार हट्टी) हा एम.एच.१२, बी.पी- ३००२ या जीपमध्ये कांदा लागवडीसाठी काही मजुरांना अभोणा भागात सकाळी घेऊन जात होता. याच रस्त्याने हतगडकडून हिरो होंडा क्रं एम.एच. १५, बी.बी.- १७४० या दुचाकीने सोनीराम मावंजी चौरे ( वय ३५. रा. सुफले दिगर ता. कळवण) व हिराजी मंगळू पवार (वय ५५ रा. मोहपाडा खिराड) हे दोघेही कामानिमित्ताने सुरगाण्याकडे येत होते. त्यांना फरशीच्या वळणावर जीपने जोरदारपणे धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाल्याने दोघांचाही मृत्यू झाला. यास चालक जबाबदार आहे अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. मयत सोनीराम चौरे व हिराजी पवार हे सासरे-जावई होते. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. चालक महेंद्र घुले यास अटक केली असून, पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, गोतरणे, सहारे, दवंगे आदी तपास करीत आहेत. बोरगाव ते बर्डीपाडा हा दुपदरी रस्ता सध्या मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या रस्त्यावर आतापर्यंत दोन ते अडीच वर्षांच्या कालावधीत वेगवेगळ्या अपघात अठ्ठावीस ते तीस जण मृत्युमुखी पडले आहेत, तर तीस ते चाळीस जण जखमी होऊन जायबंदी झाले आहेत. या मयतामध्ये विशेषत: अठरा ते पंचवर्षीय तरु णाईचा समावेश आहे. या राज्य महामार्गावर पोलिसांच्या आशीर्वादाने, वरदहस्ताने जागोजागी टपरीवर दमण येथील देशी, विदेशी दारू मिळत आहे. त्यामुळे तरु णाई मद्यधुंद होऊन बेदरकारपणे दुचाकी वाहने चालवत आहेत. याकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे.