शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

आधुनिकीकरणामुळे लोहार व्यवसायाला अवकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 00:02 IST

सायखेडा : तिसऱ्या पिढीत अलौकिक कारागिरीमुळे जगण्याचे साधन बनलेला घिसाडी समाजाचा लोहारकीचा व्यवसाय बदलत्या युगाच्या नांदीत अडचणीत येऊ लागला आहे. शासनाकडून समाजाची अवहेलना होत असल्याने प्रगत पिढी या व्यवसायाकडे काणाडोळा करीत असल्याची खंत लोहार व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. परिणामी हा व्यवसाय व कला सांभाळणारी पिढी लुप्त होत असल्याचे विदारक चित्र सध्या ग्रामीण भागात बघावयास मिळत आहे.

ठळक मुद्देविदारक चित्र : घिसाडी समाजाची आर्थिक फरफट कायम; आवक मंदावली

सायखेडा : तिसऱ्या पिढीत अलौकिक कारागिरीमुळे जगण्याचे साधन बनलेला घिसाडी समाजाचा लोहारकीचा व्यवसाय बदलत्या युगाच्या नांदीत अडचणीत येऊ लागला आहे. शासनाकडून समाजाची अवहेलना होत असल्याने प्रगत पिढी या व्यवसायाकडे काणाडोळा करीत असल्याची खंत लोहार व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. परिणामी हा व्यवसाय व कला सांभाळणारी पिढी लुप्त होत असल्याचे विदारक चित्र सध्या ग्रामीण भागात बघावयास मिळत आहे.आधुनिक युगात मशिनरीचा वापर सुमार वाढला. यामुळे हस्तकलेला जास्तीचा भाव उरला नाही पर्यायाने वडिलोपार्जित कला लोप पावण्याच्या मार्गावर आहे. समाजाच्या उपजीविकेचे परंपरागत साधन म्हणजे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी आणि घरगुती उपयोगाची लोखंडाची हत्यारे, अवजारे बनविण्यात घिसाडी समाजाच्या या व्यवसायात ६० ते ७० टक्के योगदान महिलांचे आहे. त्यासाठी भट्टी लावणे, तप्त लाल लोखंडावर गरजेप्रमाणे ७ ते १५ किलो वजनाचे घण मारणे, ग्राइंडर मशीन नसल्यास काणसीने जोर लावून हत्यारे घासणे, बनवलेली हत्यारे, अवजारे आसपासच्या गावांतील आठवडी बाजारात जाऊन विकणे ही कामे महिलाच करतात. शिवाय रोज सकाळी पाणी उपलब्ध करण्यापासून सगळी घरगुती कामे करणे, मुले सांभाळणे, त्यांना शाळेत पाठवणे ही कामेही त्यांना करावीच लागतात. उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी त्यांना पहाटे चार ते रात्री बारापर्यंत अंगमेहनत करावी लागते, तेव्हा कुठे त्यांना दोनशे रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळते. सध्या कोरोनात परिस्थिती बिकट बनली असल्यामुळे या समाजाला मिळणारी मिळकत थंडावली आहे.भटकंती करणाºया घिसाडी समाजाला गरीब परिस्थितीचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागत असल्याने मागील काही वर्षांपासून समाजाचे जीवनमान ढासळले आहे. शासन कोणतेही आर्थिक साहाय्य करीत नाही. पर्यायाने समाज शासकीय योजनांपासून वंचित राहत असून, समाजाची शासनाकडून अवहेलना होत आहे.- संतोष पवार,लोहार व्यावसायिक, भेंडाळी

टॅग्स :businessव्यवसायgram panchayatग्राम पंचायत