शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिकीकरणामुळे लोहार व्यवसायाला अवकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 00:02 IST

सायखेडा : तिसऱ्या पिढीत अलौकिक कारागिरीमुळे जगण्याचे साधन बनलेला घिसाडी समाजाचा लोहारकीचा व्यवसाय बदलत्या युगाच्या नांदीत अडचणीत येऊ लागला आहे. शासनाकडून समाजाची अवहेलना होत असल्याने प्रगत पिढी या व्यवसायाकडे काणाडोळा करीत असल्याची खंत लोहार व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. परिणामी हा व्यवसाय व कला सांभाळणारी पिढी लुप्त होत असल्याचे विदारक चित्र सध्या ग्रामीण भागात बघावयास मिळत आहे.

ठळक मुद्देविदारक चित्र : घिसाडी समाजाची आर्थिक फरफट कायम; आवक मंदावली

सायखेडा : तिसऱ्या पिढीत अलौकिक कारागिरीमुळे जगण्याचे साधन बनलेला घिसाडी समाजाचा लोहारकीचा व्यवसाय बदलत्या युगाच्या नांदीत अडचणीत येऊ लागला आहे. शासनाकडून समाजाची अवहेलना होत असल्याने प्रगत पिढी या व्यवसायाकडे काणाडोळा करीत असल्याची खंत लोहार व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. परिणामी हा व्यवसाय व कला सांभाळणारी पिढी लुप्त होत असल्याचे विदारक चित्र सध्या ग्रामीण भागात बघावयास मिळत आहे.आधुनिक युगात मशिनरीचा वापर सुमार वाढला. यामुळे हस्तकलेला जास्तीचा भाव उरला नाही पर्यायाने वडिलोपार्जित कला लोप पावण्याच्या मार्गावर आहे. समाजाच्या उपजीविकेचे परंपरागत साधन म्हणजे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी आणि घरगुती उपयोगाची लोखंडाची हत्यारे, अवजारे बनविण्यात घिसाडी समाजाच्या या व्यवसायात ६० ते ७० टक्के योगदान महिलांचे आहे. त्यासाठी भट्टी लावणे, तप्त लाल लोखंडावर गरजेप्रमाणे ७ ते १५ किलो वजनाचे घण मारणे, ग्राइंडर मशीन नसल्यास काणसीने जोर लावून हत्यारे घासणे, बनवलेली हत्यारे, अवजारे आसपासच्या गावांतील आठवडी बाजारात जाऊन विकणे ही कामे महिलाच करतात. शिवाय रोज सकाळी पाणी उपलब्ध करण्यापासून सगळी घरगुती कामे करणे, मुले सांभाळणे, त्यांना शाळेत पाठवणे ही कामेही त्यांना करावीच लागतात. उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी त्यांना पहाटे चार ते रात्री बारापर्यंत अंगमेहनत करावी लागते, तेव्हा कुठे त्यांना दोनशे रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळते. सध्या कोरोनात परिस्थिती बिकट बनली असल्यामुळे या समाजाला मिळणारी मिळकत थंडावली आहे.भटकंती करणाºया घिसाडी समाजाला गरीब परिस्थितीचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागत असल्याने मागील काही वर्षांपासून समाजाचे जीवनमान ढासळले आहे. शासन कोणतेही आर्थिक साहाय्य करीत नाही. पर्यायाने समाज शासकीय योजनांपासून वंचित राहत असून, समाजाची शासनाकडून अवहेलना होत आहे.- संतोष पवार,लोहार व्यावसायिक, भेंडाळी

टॅग्स :businessव्यवसायgram panchayatग्राम पंचायत