शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

८४ गट, १६८ गणांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2022 01:46 IST

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमामध्ये झालेल्या सुधारणेनुसार नाशिक जिल्हा परिषदेच्या ८४ गट आणि पंचायत समितीच्या १६८ गणांची प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना गुरुवारी (दि.२) जिल्हा प्रशासनाने जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यात ११ गट वाढल्याने गटांची संख्या आता ८४ इतकी झाली आहे. मालेगाव तालुक्यात दोन गट वाढले तर इतर नऊ तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक गट वाढला आहे. येत्या ८ जून पर्यंत नागरिकांना हरकती आणि सूचना नोंदविता येणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद: ८ तारखेपर्यंत हरकती सूचना नोंदविता येणार

नाशिक: महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमामध्ये झालेल्या सुधारणेनुसार नाशिक जिल्हा परिषदेच्या ८४ गट आणि पंचायत समितीच्या १६८ गणांची प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना गुरुवारी (दि.२) जिल्हा प्रशासनाने जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यात ११ गट वाढल्याने गटांची संख्या आता ८४ इतकी झाली आहे. मालेगाव तालुक्यात दोन गट वाढले तर इतर नऊ तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक गट वाढला आहे. येत्या ८ जून पर्यंत नागरिकांना हरकती आणि सूचना नोंदविता येणार आहे.

२०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांचा प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला असून त्या संदर्भातील अधिसूचना काढण्यात आली. त्यानुसार मालेगाव तालुक्यात एक गट वाढल्याने पर्ययाने दोन गण वाढले आहेत. तर बागलाण, सुरगाणा, पेठ, दिंडोरी, चांदवड, नाशिक, त्र्यंबकेश्वर, कळवण आणि सिन्नर या ९ तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक गट वाढला आहे.

निफाड तालुक्यात ओझर नगरपालिका झाल्याने तो गट कमी होऊन अन्य एक गट वाढला आहे. असे असले तरी या ठिकाणी पूर्वी १० गट होते त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. देवळा, नांदगाव, येवला व इगतपुरी या ४ तालुक्यांमधील गट, गणांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. या प्रारूप रचनेवर ८ जून पर्यंत कार्यालयीन वेळेत हरकती आणि सूचना मागविण्यात आलेल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामपंचायत विभागात हरकती आणि सूचना नोंदविण्याची कार्यवाही केली जाणार आहे. नागरिकांनी आपल्या सूचना वेळेत दाखल कराव्यात, ८ तारखेनंतरच्या कोणत्याही सूचना विचारात घेतल्या जाणार नसल्याचे निवडणूक उपजिल्हाधिकारी स्वाती थवील यांनी सांगितले.

--इन्फो--

प्रभागांचा झाला विस्तार

जिल्हा परिषदेचे सध्या ७३ गट असून १४६ गण आहेत. नव्या प्रभाग रचनेनुसार ८३ गट झाले आहेत तर गणांची संख्या १६८ इतकी झाली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबरोबरच पंचायत समितीची देखील निवडणूक घेतली जाते. महानगरपालिकेच्या रचनेप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या प्रारूप प्रभागांची रचना वाढली असून प्रभाग देखील वाढले आहेत.

--इन्फो--

असा आहे प्रभाग रचनेचा कार्यक्रम

८ जून पर्यंत : जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी

२२ जून पर्यंत : प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी होऊन अंतिम रचना करणे

२७ जून रोजी : जिल्हाधिकारी यांनी अंतिम प्रभागरचना राजपत्रात जाहीर करणे

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदGovernmentसरकारElectionनिवडणूक