शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रभाग रचनेपासूनच आचारसंहिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 14:55 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रत्यक्ष घोषणा होण्यापुर्वीच निवडणूक यंत्रणेकडून प्रभाग रचना, मतदार याद्यांच्या अद्यावतीकरण, प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचे काम केले जाते. अशा वेळी राजकारण्यांकडून वा संबंधितांकडून याकामात हस्तक्षेप होण्याच्या

ठळक मुद्देआयोगाचा निर्णय : प्रतिबंधात्मक कारवाई, मालमत्तेची चौकशीसमाजकंटकांची धरपकड, पैसे व मद्य वाटपावर लक्ष

नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रभाग रचना जाहीर करण्यापासूनच राजकारण्यांचा निवडणूक प्रक्रियेत होत असलेल्या हस्तक्षेपाबाबत थेट निवडणूक आयोगाकडे तक्रारी गेल्याने यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्रत्येक निवडणूका निष्पक्ष व पारदर्शीपणे पार पडाव्यात यासाठी ज्या संस्थांच्या निवडणूका होणार आहेत, त्यांच्या कार्यक्षेत्रात निवडणूक पुर्व आदर्श आचारसंहिता लागू केली जाणार असून, प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर होताच, समाजकंटकांची धरपकड, पैसे व मद्य वाटपावर लक्ष ठेवण्याच्या सुचना आयोगाने दिल्या आहेत.राज्य निवडणूक आयोगाने अलिकडेच या संदर्भातील आपली भूमिका जाहीर केली असून, त्यात प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रत्यक्ष घोषणा होण्यापुर्वीच निवडणूक यंत्रणेकडून प्रभाग रचना, मतदार याद्यांच्या अद्यावतीकरण, प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचे काम केले जाते. अशा वेळी राजकारण्यांकडून वा संबंधितांकडून याकामात हस्तक्षेप होण्याच्या व त्यात प्रामुख्याने निवडणूक विषयक कामे करणाऱ्या शासकीय कर्मचाºयांचा सहभाग असण्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. मतदार यादी वा प्रभाग रचना तयार करतांनाच पक्षपात केला जात असल्याचे आयोगाचे म्हणणे आहे. त्यामुळेच की काय प्रभाग रचनेपासूनच निवडणूकेच्छूकांकडून निवडणूक जिंकण्याच्या इर्षेने निवडणूक आचारसंहितेचे पावलोपावली उल्लंंघन केले जाते किंबहुना तेव्हापासूनच निवडणूक तयारीला सुरूवात केली जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रारंभी मतदार यादीचे काम हाती घेतले जाते त्यानंतर लोकसंख्येच्या प्रमाणात प्रभाग रचना जाहीर केले जाते, प्रभाग रचनेनुसार मतदार यादीचे विभाजन केल्यानंतर प्रत्यक्ष मतदान घेतले जाते या तीन्ही टप्प्यावर निवडणुकीचे काम पारदर्शी व निष्पक्षपणे व्हावे यासाठी आयोगाने यापुढे मतदार यादीचे काम कर्तव्यदक्ष, निष्पक्ष व सचोटीच्या अधिकाºयांकरवी केले जावे अशी सुचना केली असून, या कामावर लक्ष ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाºयांच्या नेमणूका करण्यात याव्यात तसेच ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत संपण्याच्या दिनांकास ज्या अधिकाºयांना सध्याच्या पदावर ३ वर्षे पुर्ण होत असतील त्यांना निवडणुकीचे काम दिले जावू नये असेही सुचविण्यात आले आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकNashikनाशिक