शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
3
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
4
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
5
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
6
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
7
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
8
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
9
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
10
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
11
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
12
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
13
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
14
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
15
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
16
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
17
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
18
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
19
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
20
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू

आरटीओ कॉर्नर भाजीबाजारात मोबाइल चोरट्यांचा वावर

By admin | Updated: November 27, 2014 23:00 IST

पोलिसांचे दुर्लक्ष : भाजीव्रिकेते, ग्राहक त्रस्त

पंचवटी : दिंडोरीरोडवरील आरटीओ कॉर्नरला दररोज सायंकाळच्या सुमारास भरणाऱ्या भाजीबाजारात मोबाइल चोरणाऱ्या टोळक्याने धुमाकूळ घातला आहे. महिनाभरापासून भाजीपाला खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे किंमती मोबाइल चोरीस जात असल्याने आरटीओ कॉर्नरच्या भाजीबाजाराला चोर बाजाराचे स्वरूप प्राप्त झाल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे, दिंडोरीरोडवरील मेरी पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर हा भाजीबाजार भरत असून, दैनंदिन मोबाइल चोरीच्या घटना घडल्यानंतरही पंचवटी पोलिसांचे विशेषत: वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना हजारो रुपयांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. वारंवार मोबाइल चोरीच्या घटना घडत असल्याने या भाजीबाजारात भाजीविक्रीसाठी येणारे विक्रेते व भाजीपाला खरेदीसाठी येणारे ग्राहक त्रस्त झाले आहेत. पूर्वी गंगाघाटावरील आठवडे बाजार, महालक्ष्मी सिनेमागृहाबाहेर भरणारा भाजीबाजार, कृषी उत्पन्न बाजार समिती व आता मोबाइल चोरट्यांनी आरटीओ कॉर्नरचा भाजीबाजार लक्ष्य केल्याने पंचवटी पोलिसांच्या कामकाजावर संशय व्यक्त केला जात आहे. दुचाकीचोरी, चोरी, रोकड लुटणे, घरफोडी यांसारख्या घटना नित्याच्याच झालेल्या असताना, आता मोबाइल चोरीच्या घटनांत वाढ झाल्याची तक्रार नागरिकांनी केल्याने मोबाइल चोरी रोखण्यासाठी पंचवटी पोलीस पुढाकार घेतील का, असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे. (वार्ताहर)