शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
6
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
7
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
8
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
9
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
10
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
11
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
12
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
13
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
14
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
15
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
16
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
17
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
18
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
19
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
20
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."

भोजापूर धरणातून आवर्तन सोडण्यास मनसेचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 17:43 IST

सिन्नर : तालुक्यात यंदा पाऊस अत्यल्प प्रमाणात पडल्यामुळे पाण्याची उपलब्धता व भविष्याची गरज ओळखून पाण्याचा वापर करावा यासाठी तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण असलेले भोजापूर धरणातील पाण्याचे आवर्तन न सोडण्याची मागणी तालुका महाराष्टÑ नवनिर्माण सेना व चापडगाव ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सिन्नर : तालुक्यात यंदा पाऊस अत्यल्प प्रमाणात पडल्यामुळे पाण्याची उपलब्धता व भविष्याची गरज ओळखून पाण्याचा वापर करावा यासाठी तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण असलेले भोजापूर धरणातील पाण्याचे आवर्तन न सोडण्याची मागणी तालुका महाराष्टÑ नवनिर्माण सेना व चापडगाव ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. भोजापूर धरणातून पाणी सोडण्यास विरोध असल्याचे निवेदन तहसीलदार नितीन गवळी यांना देण्यात आले.तालुक्यात १९७२ च्या दुष्काळापेक्षा अतिशय भयावह दुष्काळाच्या झळा बसत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. येणाºया काळात त्याचा परिणाम गंभीर होणार असल्याने भोजापूर धरणारच्या पाण्यावर तालुक्याच्या नजरा आहे. त्यामुळे धरणातील शिल्लक असलेला पाणीसाठी भविष्यसाठी जपून ठेवण्याची मागणी मनसेच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थिती असल्याने रब्बी पिकांची पेरणी होवू शकत नाही. १२ दिवसाच्या पाण्याच्या आवर्तनाने कोणत्याही शेतकºयाचा फायदा होणार नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चारा-पाण्याची सोय नसतांना देवू केलेल्या पाण्याचे आवर्तन सोडून कोणाला फायदा होणार तसेच हे पाणी टॅँकर आणि पेयजल योजनेतून पुरविल्यास संपूर्ण तालुक्याला पुढील सहा महिने उपयोगात येवू शकते असे निवेदानात म्हटले आहे. काही राजकीय नेत्यांनी भविष्याचा विचार न करता आवर्तन सोडण्याची निर्णय घेतला आहे. जरी आवर्तन सोडले तर भविष्यात दुष्काळाची स्थिती अधिक भयावह होणार असल्याने तहसीलदार गवळी यांनी स्वत: लक्ष घालून योग्य तो निर्णय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

टॅग्स :Waterपाणी