शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

‘मनसे’त सळसळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:49 IST

जकारणात अचूक टायमिंगला मोठे महत्त्व असते. लोकांची मने पेटलेली असतात, तेव्हा तो विषय हाती घेऊन उभे राहिले तर त्यातून लोकमानसातील स्वीकारार्हता वाढीस हातभार लागून जातो. राज ठाकरे यांनी त्याचदृष्टीने मुंबईतील रेल्वे प्लॅटफार्मवरील चेंगराचेंगरीचा विषय उचलला. या निमित्ताने राज यांचा ‘फार्म’ परतून आल्याचे जे प्रत्यंतर आले ते पाहता त्यांच्या ‘मनसे’त आलेली ...

जकारणात अचूक टायमिंगला मोठे महत्त्व असते. लोकांची मने पेटलेली असतात, तेव्हा तो विषय हाती घेऊन उभे राहिले तर त्यातून लोकमानसातील स्वीकारार्हता वाढीस हातभार लागून जातो. राज ठाकरे यांनी त्याचदृष्टीने मुंबईतील रेल्वे प्लॅटफार्मवरील चेंगराचेंगरीचा विषय उचलला. या निमित्ताने राज यांचा ‘फार्म’ परतून आल्याचे जे प्रत्यंतर आले ते पाहता त्यांच्या ‘मनसे’त आलेली मरगळ दूर होण्याची अपेक्षा उंचावली आहे.गेल्या विधानसभा व त्या पाठोपाठच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आलेल्या अपयशानंतर ‘मनसे’च काय, भाजपातर सारेच पक्ष जणू गारठून गेलेले आहेत. नाशकात तर महापालिकेत असलेली सत्ता गमवावी लागलीच; परंतु निवडणुकीच्या पूर्वीच एकेक मनसैनिक पक्ष सोडून चालते झाल्याने पक्ष-संघटनाही खिळखिळी झाली. राज ठाकरे यांचा ‘गड’ म्हणून लौकिक प्राप्त नाशकात ‘मनसे’ची झालेली ही वाताहत पाहता खुद्द राज यांनीही नाशकात काहीसे दुर्लक्षच केल्याचे दिसून आले. ‘एवढे सारे करूनही नाशिककरांनी हेच फळ दिले’ म्हणून त्यांनी आपली उद्विग्नता प्रदर्शिली होतीच. त्यामुळे नाशकातील पक्ष पदाधिकारीही तेव्हापासून निस्तेजावस्थेतच होते. पक्ष नेतेच काय, महापौरपदावरून उतरलेले अशोक मुतर्डक यांच्यासारखे नेतेही नावाला उरल्यासारखे होते. कारण, ना पक्षाचा काही कार्यक्रम हाती होता, ना पुढचे काही उद्दिष्ट्य डोळ्यासमोर. नेतेच गारठल्यामुळे कार्यकर्त्यांचे विचारू नका. ते बिचारे कोणता झेंडा हाती घेऊ आता, या चिंतेत राजकारणात स्वत:ची ‘स्पेस’ शोधण्यात लागले होते. अशात मुंबईतील एल्फिन्स्टन रोड रेल्वेस्थानकावरील पुलावर चेंगराचेंगरी होऊन अनेक निष्पापांचे बळी गेल्याची घटना घडली. हाच मुद्दा हाती घेऊन साध्या साध्या सोयी सुविधा सरकार देऊ शकत नसेल तर, असले सरकार काय कामाचे असा प्रश्न करीत राज ठाकरे यांनी संताप मोर्चा काढला. स्वाभाविकच या मोर्चाच्या निमित्ताने नाशिकच्या ‘मनसे’तही सळसळ घडून आली. मोर्चाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीतच त्याची चुणूक दिसून आली. इतक्या दिवसांपासून हबकलेल्या अवस्थेत असलेले नेते-कार्यकर्ते झाडून बैठकीला उपस्थित राहिलेले दिसून आले. पक्षाच्या चलतीच्या काळातही पक्षाशी फटकून वागलेले माजी आमदार नितीन भोसले यांच्यासारख्या काही नेत्यांचा यातील सहभाग लक्षवेधी ठरला. अपेक्षेप्रमाणे मुंबई मोर्चासाठी नाशकातून रसद पुरवठाही झाला. विशेषत: मोर्चापुढे बोलताना राज ठाकरे यांनी त्यांच्या खास शैलीत सरकारचा जो समाचार घेतला आणि जिकडे तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगान सुरू असताना राज यांनी थेट मोदींवर निशाणा साधला, त्याने ‘मनसे’च्या शिडात चांगलीच हवा भरली गेली. नाशकात ‘मनसे’ची असलेली सत्ता हटवून महापालिकेत भाजपा वरचढ ठरली आहे. भाजपाच्या या सत्ताधाºयांना शिवसेनेसह अन्य सारे विरोधक वेळोवेळी अडचणीत आणण्याचे प्रयत्न करीत आहेतच. ‘मनसे’चे संख्याबळ तुलनेने खूपच मर्यादित असल्याने विरोधी पक्ष म्हणून ‘मनसे’चे अस्तित्व फारसे उठून दिसत नाही. परंतु आता राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावरच टीका केल्याने नाशकातील मनसैनिकांना महापालिकेतील भाजपाविरोधात सुस्पष्ट भूमिका घेऊन संधी मिळेल तेव्हा आडवे जाता येईल. त्यादृष्टीने महापालिका कामकाजाचा अनुभव असलेले ज्येष्ठ सदस्य मनसेकडे आहेत. तेव्हा मुंबईतील मुद्दा घेऊन मुंबईत ‘मनसे’चा मोर्चा निघाला असला तरी त्या निमित्ताने संघटनात्मक उत्साहाचे पडसाद नाशकातही दिसून येणे स्वाभाविक ठरले आहे.