शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

‘मनसे’त सळसळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:49 IST

जकारणात अचूक टायमिंगला मोठे महत्त्व असते. लोकांची मने पेटलेली असतात, तेव्हा तो विषय हाती घेऊन उभे राहिले तर त्यातून लोकमानसातील स्वीकारार्हता वाढीस हातभार लागून जातो. राज ठाकरे यांनी त्याचदृष्टीने मुंबईतील रेल्वे प्लॅटफार्मवरील चेंगराचेंगरीचा विषय उचलला. या निमित्ताने राज यांचा ‘फार्म’ परतून आल्याचे जे प्रत्यंतर आले ते पाहता त्यांच्या ‘मनसे’त आलेली ...

जकारणात अचूक टायमिंगला मोठे महत्त्व असते. लोकांची मने पेटलेली असतात, तेव्हा तो विषय हाती घेऊन उभे राहिले तर त्यातून लोकमानसातील स्वीकारार्हता वाढीस हातभार लागून जातो. राज ठाकरे यांनी त्याचदृष्टीने मुंबईतील रेल्वे प्लॅटफार्मवरील चेंगराचेंगरीचा विषय उचलला. या निमित्ताने राज यांचा ‘फार्म’ परतून आल्याचे जे प्रत्यंतर आले ते पाहता त्यांच्या ‘मनसे’त आलेली मरगळ दूर होण्याची अपेक्षा उंचावली आहे.गेल्या विधानसभा व त्या पाठोपाठच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आलेल्या अपयशानंतर ‘मनसे’च काय, भाजपातर सारेच पक्ष जणू गारठून गेलेले आहेत. नाशकात तर महापालिकेत असलेली सत्ता गमवावी लागलीच; परंतु निवडणुकीच्या पूर्वीच एकेक मनसैनिक पक्ष सोडून चालते झाल्याने पक्ष-संघटनाही खिळखिळी झाली. राज ठाकरे यांचा ‘गड’ म्हणून लौकिक प्राप्त नाशकात ‘मनसे’ची झालेली ही वाताहत पाहता खुद्द राज यांनीही नाशकात काहीसे दुर्लक्षच केल्याचे दिसून आले. ‘एवढे सारे करूनही नाशिककरांनी हेच फळ दिले’ म्हणून त्यांनी आपली उद्विग्नता प्रदर्शिली होतीच. त्यामुळे नाशकातील पक्ष पदाधिकारीही तेव्हापासून निस्तेजावस्थेतच होते. पक्ष नेतेच काय, महापौरपदावरून उतरलेले अशोक मुतर्डक यांच्यासारखे नेतेही नावाला उरल्यासारखे होते. कारण, ना पक्षाचा काही कार्यक्रम हाती होता, ना पुढचे काही उद्दिष्ट्य डोळ्यासमोर. नेतेच गारठल्यामुळे कार्यकर्त्यांचे विचारू नका. ते बिचारे कोणता झेंडा हाती घेऊ आता, या चिंतेत राजकारणात स्वत:ची ‘स्पेस’ शोधण्यात लागले होते. अशात मुंबईतील एल्फिन्स्टन रोड रेल्वेस्थानकावरील पुलावर चेंगराचेंगरी होऊन अनेक निष्पापांचे बळी गेल्याची घटना घडली. हाच मुद्दा हाती घेऊन साध्या साध्या सोयी सुविधा सरकार देऊ शकत नसेल तर, असले सरकार काय कामाचे असा प्रश्न करीत राज ठाकरे यांनी संताप मोर्चा काढला. स्वाभाविकच या मोर्चाच्या निमित्ताने नाशिकच्या ‘मनसे’तही सळसळ घडून आली. मोर्चाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीतच त्याची चुणूक दिसून आली. इतक्या दिवसांपासून हबकलेल्या अवस्थेत असलेले नेते-कार्यकर्ते झाडून बैठकीला उपस्थित राहिलेले दिसून आले. पक्षाच्या चलतीच्या काळातही पक्षाशी फटकून वागलेले माजी आमदार नितीन भोसले यांच्यासारख्या काही नेत्यांचा यातील सहभाग लक्षवेधी ठरला. अपेक्षेप्रमाणे मुंबई मोर्चासाठी नाशकातून रसद पुरवठाही झाला. विशेषत: मोर्चापुढे बोलताना राज ठाकरे यांनी त्यांच्या खास शैलीत सरकारचा जो समाचार घेतला आणि जिकडे तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगान सुरू असताना राज यांनी थेट मोदींवर निशाणा साधला, त्याने ‘मनसे’च्या शिडात चांगलीच हवा भरली गेली. नाशकात ‘मनसे’ची असलेली सत्ता हटवून महापालिकेत भाजपा वरचढ ठरली आहे. भाजपाच्या या सत्ताधाºयांना शिवसेनेसह अन्य सारे विरोधक वेळोवेळी अडचणीत आणण्याचे प्रयत्न करीत आहेतच. ‘मनसे’चे संख्याबळ तुलनेने खूपच मर्यादित असल्याने विरोधी पक्ष म्हणून ‘मनसे’चे अस्तित्व फारसे उठून दिसत नाही. परंतु आता राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावरच टीका केल्याने नाशकातील मनसैनिकांना महापालिकेतील भाजपाविरोधात सुस्पष्ट भूमिका घेऊन संधी मिळेल तेव्हा आडवे जाता येईल. त्यादृष्टीने महापालिका कामकाजाचा अनुभव असलेले ज्येष्ठ सदस्य मनसेकडे आहेत. तेव्हा मुंबईतील मुद्दा घेऊन मुंबईत ‘मनसे’चा मोर्चा निघाला असला तरी त्या निमित्ताने संघटनात्मक उत्साहाचे पडसाद नाशकातही दिसून येणे स्वाभाविक ठरले आहे.