शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

मनसेला जिल्ह्यात मिळाले अवघे सात उमेदवार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 22:40 IST

नाशिक : मनसेने नाशिक जिल्ह्यात पंधराच्या पंधरा विधानसभा जागा लढविण्याची तयारी केली, त्यासाठी पक्षाकडे उमेदवार नसले तरी अन्य पक्षांतून येणाऱ्यांना संधी देण्याची तयारीदेखील केली; परंतु त्यानंतरदेखील पक्षाला अपेक्षित उमेदवार देता आले नाही. संपूर्ण जिल्ह्यात एकूण सात उमेदवार देण्यात पक्षाला यश आले असून, त्यात अवघे तीन पक्षांतील मूळ कार्यकर्ते असून, तर चार अन्य पक्षांतून आलेले आयाराम आहेत.

ठळक मुद्देआयारामांचीही वानवा । भुजबळांच्या विरोधातील उमेदवाराचा अर्ज बाद

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मनसेने नाशिक जिल्ह्यात पंधराच्या पंधरा विधानसभा जागा लढविण्याची तयारी केली, त्यासाठी पक्षाकडे उमेदवार नसले तरी अन्य पक्षांतून येणाऱ्यांना संधी देण्याची तयारीदेखील केली; परंतु त्यानंतरदेखील पक्षाला अपेक्षित उमेदवार देता आले नाही. संपूर्ण जिल्ह्यात एकूण सात उमेदवार देण्यात पक्षाला यश आले असून, त्यात अवघे तीन पक्षांतील मूळ कार्यकर्ते असून, तर चार अन्य पक्षांतून आलेले आयाराम आहेत.२००९ मध्ये विधानसभा निवडणुकीत नाशिक शहरातील चार पैकी तीन मतदारसंघात उमेदवार निवडून आले होते तसेच महापालिकेत २०१२ मध्ये सत्तादेखील आली होती. त्यामुळेच नाशिक हा राज ठाकरे यांचा बालेकिल्ला मानला गेला; परंतु नंतर मात्र पक्षाचा प्रभाव कमी होत गेला. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा एकही उमेदवार नाशिक शहरातून निवडून आला नाही, तर महापालिकेच्या निवडणुकीतदेखील पक्षाची पीछेहाट झाली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर निवडणुकीसाठी निवडणूक लढवावी किंवा नाही अशा द्विधा मन:स्थितीत असलेल्या राज यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला; मात्र नाशिक-पुणे-मुंबई या सुवर्ण त्रिकोणातच शंभर जागांवर निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर नाशिकमध्ये मनसेचे नेते अभिजित पानसे आणि सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुलाखती घेतल्या. त्यावेळी त्यांनी नाशिक जिल्ह्यात पंधरा जागांवर उमेदवार देणार असल्याचे सांगितले. त्यासाठी ऐनवेळी अन्य पक्षांतून येणाऱ्यांनादेखील संधी देऊ असे उघडपणे सांगितले.तथापि, पक्षाला पंधरापैकी सात मतदारसंघातच उमेदवार मिळाले आहेत. यात नाशिक शहरात चारपैकी नाशिक पूर्व व नाशिक मध्यमध्ये दोन मतदारसंघात मूळ पक्षाचे उमेदवार आहेत, तर उर्वरित उमेदवारांपैकी नाशिक पश्चिम आणि देवळालीत शिवसेना आणि कॉँग्रेसमधून आलेल्यांना संधी देण्यात आली आहे.इगतपुरीतदेखील दोन वर्षांपूर्वी पक्षात आलेल्या आणि सध्या नगरसेवक असलेल्या युवकाला संधी देण्यात आली आहे, तर दिंडोरीत माजी सनदी अधिकारी आणि मालेगाव बाह्यमध्येदेखील आयारामांना संधी देण्यात आली आहे. छगन भुजबळ यांच्या विरोधात लढण्यासाठी येवल्यात ज्या उमेदवाराला संधी मिळाली त्याचा अर्जच छाननीत बाद झाला आहे. येवल्यात राज-भुजबळ मनोमिलन ?कुटुंबीयातील पहिला ठाकरे वरळी मतदारसंघात नशीब आजमावयाला निघाल्याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वरळीतून उमेदवार न देता अप्रत्यक्षपणे पुतण्याला साथ देण्याचे ठरविले. त्याचप्रमाणे छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातील मनसेच्या उमेदवाराला एबी फॉर्मच न मिळाल्याने त्याचा अर्ज बाद ठरविण्यात आल्यामुळे राज हे अप्रत्यक्षपणे भुजबळांच्या पाठीशी उभे राहिल्याची चर्चा रंगली आहे. मनसेचे येवल्यातून इच्छुक असलेल्या उमेदवाराने एबी फॉर्मच जोडला नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. त्यामुळे भुजबळ आणि राज ठाकरे यांचे या मतदारसंघापुरते ‘मनोमिलन’ झाल्याची शंका उपस्थित केली जात आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019