शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

मनसेला जिल्ह्यात मिळाले अवघे सात उमेदवार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 22:40 IST

नाशिक : मनसेने नाशिक जिल्ह्यात पंधराच्या पंधरा विधानसभा जागा लढविण्याची तयारी केली, त्यासाठी पक्षाकडे उमेदवार नसले तरी अन्य पक्षांतून येणाऱ्यांना संधी देण्याची तयारीदेखील केली; परंतु त्यानंतरदेखील पक्षाला अपेक्षित उमेदवार देता आले नाही. संपूर्ण जिल्ह्यात एकूण सात उमेदवार देण्यात पक्षाला यश आले असून, त्यात अवघे तीन पक्षांतील मूळ कार्यकर्ते असून, तर चार अन्य पक्षांतून आलेले आयाराम आहेत.

ठळक मुद्देआयारामांचीही वानवा । भुजबळांच्या विरोधातील उमेदवाराचा अर्ज बाद

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मनसेने नाशिक जिल्ह्यात पंधराच्या पंधरा विधानसभा जागा लढविण्याची तयारी केली, त्यासाठी पक्षाकडे उमेदवार नसले तरी अन्य पक्षांतून येणाऱ्यांना संधी देण्याची तयारीदेखील केली; परंतु त्यानंतरदेखील पक्षाला अपेक्षित उमेदवार देता आले नाही. संपूर्ण जिल्ह्यात एकूण सात उमेदवार देण्यात पक्षाला यश आले असून, त्यात अवघे तीन पक्षांतील मूळ कार्यकर्ते असून, तर चार अन्य पक्षांतून आलेले आयाराम आहेत.२००९ मध्ये विधानसभा निवडणुकीत नाशिक शहरातील चार पैकी तीन मतदारसंघात उमेदवार निवडून आले होते तसेच महापालिकेत २०१२ मध्ये सत्तादेखील आली होती. त्यामुळेच नाशिक हा राज ठाकरे यांचा बालेकिल्ला मानला गेला; परंतु नंतर मात्र पक्षाचा प्रभाव कमी होत गेला. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा एकही उमेदवार नाशिक शहरातून निवडून आला नाही, तर महापालिकेच्या निवडणुकीतदेखील पक्षाची पीछेहाट झाली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर निवडणुकीसाठी निवडणूक लढवावी किंवा नाही अशा द्विधा मन:स्थितीत असलेल्या राज यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला; मात्र नाशिक-पुणे-मुंबई या सुवर्ण त्रिकोणातच शंभर जागांवर निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर नाशिकमध्ये मनसेचे नेते अभिजित पानसे आणि सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुलाखती घेतल्या. त्यावेळी त्यांनी नाशिक जिल्ह्यात पंधरा जागांवर उमेदवार देणार असल्याचे सांगितले. त्यासाठी ऐनवेळी अन्य पक्षांतून येणाऱ्यांनादेखील संधी देऊ असे उघडपणे सांगितले.तथापि, पक्षाला पंधरापैकी सात मतदारसंघातच उमेदवार मिळाले आहेत. यात नाशिक शहरात चारपैकी नाशिक पूर्व व नाशिक मध्यमध्ये दोन मतदारसंघात मूळ पक्षाचे उमेदवार आहेत, तर उर्वरित उमेदवारांपैकी नाशिक पश्चिम आणि देवळालीत शिवसेना आणि कॉँग्रेसमधून आलेल्यांना संधी देण्यात आली आहे.इगतपुरीतदेखील दोन वर्षांपूर्वी पक्षात आलेल्या आणि सध्या नगरसेवक असलेल्या युवकाला संधी देण्यात आली आहे, तर दिंडोरीत माजी सनदी अधिकारी आणि मालेगाव बाह्यमध्येदेखील आयारामांना संधी देण्यात आली आहे. छगन भुजबळ यांच्या विरोधात लढण्यासाठी येवल्यात ज्या उमेदवाराला संधी मिळाली त्याचा अर्जच छाननीत बाद झाला आहे. येवल्यात राज-भुजबळ मनोमिलन ?कुटुंबीयातील पहिला ठाकरे वरळी मतदारसंघात नशीब आजमावयाला निघाल्याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वरळीतून उमेदवार न देता अप्रत्यक्षपणे पुतण्याला साथ देण्याचे ठरविले. त्याचप्रमाणे छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातील मनसेच्या उमेदवाराला एबी फॉर्मच न मिळाल्याने त्याचा अर्ज बाद ठरविण्यात आल्यामुळे राज हे अप्रत्यक्षपणे भुजबळांच्या पाठीशी उभे राहिल्याची चर्चा रंगली आहे. मनसेचे येवल्यातून इच्छुक असलेल्या उमेदवाराने एबी फॉर्मच जोडला नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. त्यामुळे भुजबळ आणि राज ठाकरे यांचे या मतदारसंघापुरते ‘मनोमिलन’ झाल्याची शंका उपस्थित केली जात आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019