शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

मनसेला जिल्ह्यात मिळाले अवघे सात उमेदवार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 22:40 IST

नाशिक : मनसेने नाशिक जिल्ह्यात पंधराच्या पंधरा विधानसभा जागा लढविण्याची तयारी केली, त्यासाठी पक्षाकडे उमेदवार नसले तरी अन्य पक्षांतून येणाऱ्यांना संधी देण्याची तयारीदेखील केली; परंतु त्यानंतरदेखील पक्षाला अपेक्षित उमेदवार देता आले नाही. संपूर्ण जिल्ह्यात एकूण सात उमेदवार देण्यात पक्षाला यश आले असून, त्यात अवघे तीन पक्षांतील मूळ कार्यकर्ते असून, तर चार अन्य पक्षांतून आलेले आयाराम आहेत.

ठळक मुद्देआयारामांचीही वानवा । भुजबळांच्या विरोधातील उमेदवाराचा अर्ज बाद

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मनसेने नाशिक जिल्ह्यात पंधराच्या पंधरा विधानसभा जागा लढविण्याची तयारी केली, त्यासाठी पक्षाकडे उमेदवार नसले तरी अन्य पक्षांतून येणाऱ्यांना संधी देण्याची तयारीदेखील केली; परंतु त्यानंतरदेखील पक्षाला अपेक्षित उमेदवार देता आले नाही. संपूर्ण जिल्ह्यात एकूण सात उमेदवार देण्यात पक्षाला यश आले असून, त्यात अवघे तीन पक्षांतील मूळ कार्यकर्ते असून, तर चार अन्य पक्षांतून आलेले आयाराम आहेत.२००९ मध्ये विधानसभा निवडणुकीत नाशिक शहरातील चार पैकी तीन मतदारसंघात उमेदवार निवडून आले होते तसेच महापालिकेत २०१२ मध्ये सत्तादेखील आली होती. त्यामुळेच नाशिक हा राज ठाकरे यांचा बालेकिल्ला मानला गेला; परंतु नंतर मात्र पक्षाचा प्रभाव कमी होत गेला. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा एकही उमेदवार नाशिक शहरातून निवडून आला नाही, तर महापालिकेच्या निवडणुकीतदेखील पक्षाची पीछेहाट झाली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर निवडणुकीसाठी निवडणूक लढवावी किंवा नाही अशा द्विधा मन:स्थितीत असलेल्या राज यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला; मात्र नाशिक-पुणे-मुंबई या सुवर्ण त्रिकोणातच शंभर जागांवर निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर नाशिकमध्ये मनसेचे नेते अभिजित पानसे आणि सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुलाखती घेतल्या. त्यावेळी त्यांनी नाशिक जिल्ह्यात पंधरा जागांवर उमेदवार देणार असल्याचे सांगितले. त्यासाठी ऐनवेळी अन्य पक्षांतून येणाऱ्यांनादेखील संधी देऊ असे उघडपणे सांगितले.तथापि, पक्षाला पंधरापैकी सात मतदारसंघातच उमेदवार मिळाले आहेत. यात नाशिक शहरात चारपैकी नाशिक पूर्व व नाशिक मध्यमध्ये दोन मतदारसंघात मूळ पक्षाचे उमेदवार आहेत, तर उर्वरित उमेदवारांपैकी नाशिक पश्चिम आणि देवळालीत शिवसेना आणि कॉँग्रेसमधून आलेल्यांना संधी देण्यात आली आहे.इगतपुरीतदेखील दोन वर्षांपूर्वी पक्षात आलेल्या आणि सध्या नगरसेवक असलेल्या युवकाला संधी देण्यात आली आहे, तर दिंडोरीत माजी सनदी अधिकारी आणि मालेगाव बाह्यमध्येदेखील आयारामांना संधी देण्यात आली आहे. छगन भुजबळ यांच्या विरोधात लढण्यासाठी येवल्यात ज्या उमेदवाराला संधी मिळाली त्याचा अर्जच छाननीत बाद झाला आहे. येवल्यात राज-भुजबळ मनोमिलन ?कुटुंबीयातील पहिला ठाकरे वरळी मतदारसंघात नशीब आजमावयाला निघाल्याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वरळीतून उमेदवार न देता अप्रत्यक्षपणे पुतण्याला साथ देण्याचे ठरविले. त्याचप्रमाणे छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातील मनसेच्या उमेदवाराला एबी फॉर्मच न मिळाल्याने त्याचा अर्ज बाद ठरविण्यात आल्यामुळे राज हे अप्रत्यक्षपणे भुजबळांच्या पाठीशी उभे राहिल्याची चर्चा रंगली आहे. मनसेचे येवल्यातून इच्छुक असलेल्या उमेदवाराने एबी फॉर्मच जोडला नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. त्यामुळे भुजबळ आणि राज ठाकरे यांचे या मतदारसंघापुरते ‘मनोमिलन’ झाल्याची शंका उपस्थित केली जात आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019