शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

नाशकात 'भारत बंद'ला संमिश्र प्रतिसाद; बाजार समिती, भाजी मंडईत शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 12:47 IST

व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. शेताचे बांधसुध्दा ओस पडलेले दिसत आहे, कारण शेतमालाचा उठाव होणार नसल्याने शेतमजूर, शेतकरी वर्ग बांधावर फिरकला नाही. ग्रामीण भागात या बंदला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे.

ठळक मुद्देबाजार समितीच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी विधेयकाची होळी

नाशिक : शहरासह जिल्ह्यात ह्यभारत बंदह्णला संमिश्र प्रतिसाद बघावयास मिळत आहे. नाशिक शहरातील पंचवटी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, पेठरोडवरील शरदचंद्र पवार कृषी मार्केट यार्डसह लासलगाव बाजार समिती, निफाड, सायखेडा बाजार समिती, येवला बाजार समितीमध्ये आज सकाळपासून शुकशुकाट पहावयास मिळत आहे. सर्व व्यवहार ठप्प असून शेतकऱ्यांनी कुठल्याहीप्रकारचा शेतमाल बाजार समित्यांमध्ये पोहचविला नाही.

दिल्ली येथे शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी विधेयक मगे घेण्याच्या मागणीसाठी मागील दहा ते बारा दिवसांपासून जोरदार आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांनी मंगळवारी (दि.८) 'भारत बंद'ची हाक दिली आहे. या भारत बंदला विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून स्वयंस्फूर्तीने पाठिंबा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरासह जिल्ह्यातील विविध गावागावांमध्ये प्रतिसाद मिळताना दिसत आहे. गोदाकाठालगत सुमारे ४२ गावांमध्ये बंद यशस्वी होत आहे. गावांमधील शेतमालाचे सर्व व्यवहार पुर्णपणे ठप्प झाले आहे. बाजारपेठांमध्ये निरव शांतता पहावयास मिळत आहे. व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. शेताचे बांधसुध्दा ओस पडलेले दिसत आहे, कारण शेतमालाचा उठाव होणार नसल्याने शेतमजूर, शेतकरी वर्ग बांधावर फिरकला नाही. ग्रामीण भागात या बंदला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे.

दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी विधेयकाची होळी करण्यात आली. केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात व दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, छावा, व्यापारी महासंघ,कांदा उत्पादक संघटना, माथाडी कामगार यांनी आज कळवण बंदच्या आवाहनास मेडिकल व वैद्यकीय ही अत्यावश्यक सेवा वगळता सर्वं व्यापारी व व्यावसायिक बांधवानी प्रतिसाद देऊन शंभर टक्के बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच कळवण बाजार समिती अंतर्गत कळवण, नाकोडा, अभोणा व कनाशी येथील आवारात कांदा व भुसार लिलाव बंद ठेऊन भारत बंदला पाठिंबा दिला.दरम्यान तहसीलदार बी ए कापसे यांना बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव, कांदा उत्पादक संघटनेचे तालुकाध्यक्ष विलास रौंदळ, छावाचे तालुकाप्रमुख प्रदीप पगार, शेतकरी नेते गोविंद पगार, वसाका बचाव समितीचे निमंत्रक सुनील देवरे, रिपाईचे सुनील बस्ते, टिनू पगार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदन देत केंद्र सरकारच्या कृषी कायदाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.केंद्राच्या कृषी कायदा विरोधी शेतकऱ्यांनी पुकारलेला बंद नाशकात यशस्वी होताना दिसत आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर बाजारसमिती संचालक मंडळ, विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शेतकरीविरोधी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदिवला. दिंडोरी त

 

 

टॅग्स :NashikनाशिकFarmer strikeशेतकरी संपBharat Bandhभारत बंदAgriculture Sectorशेती क्षेत्र