शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
5
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
6
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
7
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
8
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
9
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
10
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
11
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
12
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
13
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
14
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
15
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
16
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
17
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
18
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
19
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
20
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   

मोबाइल कंपन्यांना मनपाचा दणका

By admin | Updated: March 21, 2017 00:50 IST

टॉवर्स सील : थकबाकी न भरल्यास घरमालकांकडून वसुली

नाशिक : महापालिकेने मिळकत कर थकविणाऱ्या विविध मोबाइल कंपन्यांचे सुमारे २७ टॉवर्स सील केले आहेत. त्यामुळे संबंधित कंपन्यांमार्फत देण्यात येणारी इंटरनेट व मोबाइल सेवा विस्कळीत झाली आहे. महापालिकेच्या कारवाईनंतर काही कंपन्यांनी थकबाकीचा भरणा केला आहे मात्र, ज्या कंपन्या थकबाकी भरणार नाहीत त्यांच्या थकबाकीची रक्कम संबंधित घरमालकांकडून वसूल केली जाणार असल्याचे उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी स्पष्ट केले आहे.महापालिकेने मिळकत कराच्या थकबाकी वसुलीसाठी मोहीम सुरू केलेली आहे. त्यात मोबाइल कंपन्यांनी ठिकठिकाणी उभारलेल्या टॉवर्सचीही सुमारे ६ कोटी रुपये थकबाकी आहे. शहरात सुमारे २०० टॉवर्स आहेत. त्यात महापालिकेने आतापर्यंत २७ मोबाइल टॉवर्सवर जप्तीची कारवाई करत सील ठोकले. त्यात जीटीएल, एअरसेल व एटीसी कंपन्यांचा समावेश होता. यापूर्वी महापालिकेने बजावलेल्या नोटीसांनुसार आयडिया कंपनीने २४ लाख रुपये तर इंडस कंपनीने २४ लाख ५० हजार रुपयांची थकबाकी भरली आहे. तसेच एटीसी कंपनीने येत्या २३ मार्चपर्यंत थकबाकी भरण्याची लेखी हमी महापालिकेला दिली आहे. शहरात एटीसी कंपनीचे ४२ मोबाइल टॉवर्स असून, त्यातील १५ टॉवर्स महापालिकेने सील केले होते. याशिवाय, इंडस, रिलायन्स व रिलायन्स जीओ या कंपन्यांनीही २२ मार्चपर्यंत थकबाकी भरण्याची लेखी हमी दिली आहे. सदर कंपन्यांनी मुदतीत थकबाकी न भरल्यास त्यांचेही टॉवर्स सील केले जाणार असल्याचे उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी सांगितले. दरम्यान, महापालिकेने मोबाइल टॉवर्स सील करण्याची कारवाई केल्याने अनेक भागात मोबाइल व इंटरनेट सेवा विस्कळीत झाली असून, त्याचा सर्वाधिक फटका नाशिकरोड भागात बसल्याचे सांगितले जाते. (प्रतिनिधी)