शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

‘मिसळ’ची सरमिसळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 02:00 IST

राजकारणी असले म्हणून काय झाले, राजकारणेतर मित्रत्व असू शकत नाही का? त्यातूनच कुठे मिसळ पार्टी आयोजिली गेली असेल व तिथे केले असेल प्रत्येकाने मनमोकळे तर त्याला राजकारण म्हणून काय बघायचे? पण हल्ली तसे होत नाही कारण तत्त्व, निष्ठा कितीही गुंडाळून ठेवल्या गेल्या असल्या तरी, राजकारणातील अभिनिवेश सुटता सुटत नाहीत. संबंधितांचे वर्तनच तसे घडून येताना दिसते. नाशकातील खासगी ‘मिसळ’ पार्टीची चर्चाचर्वण होणे त्यामुळेच स्वाभाविक ठरून गेले आहे.

ठळक मुद्देनव्या उद्योगाच्या शुभारंभाचे निमित्त सारे सहकारी यानिमित्ताने एकवटले‘चिंतकां’ची सद्दी संपलेली नाही

साराशकिरण अग्रवालराजकारणी असले म्हणून काय झाले, राजकारणेतर मित्रत्व असू शकत नाही का? त्यातूनच कुठे मिसळ पार्टी आयोजिली गेली असेल व तिथे केले असेल प्रत्येकाने मनमोकळे तर त्याला राजकारण म्हणून काय बघायचे? पण हल्ली तसे होत नाही कारण तत्त्व, निष्ठा कितीही गुंडाळून ठेवल्या गेल्या असल्या तरी, राजकारणातील अभिनिवेश सुटता सुटत नाहीत. संबंधितांचे वर्तनच तसे घडून येताना दिसते. नाशकातील खासगी ‘मिसळ’ पार्टीची चर्चाचर्वण होणे त्यामुळेच स्वाभाविक ठरून गेले आहे.शिवसेनेतून भाजपा व्हाया राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास करून आलेल्या सुनील बागुल यांनी आपल्या मूळ पक्षातील तत्कालीन सवंगड्यांना दिलेल्या मिसळ पार्टीला खरे तर दिंडोरीतील त्यांच्या एका नव्या उद्योगाच्या शुभारंभाचे निमित्त होते, पण त्याखेरीजचे संदर्भ लावून ही पार्टी वेगवेगळ्या शक्यतांना जन्म घालणारी ठरली. कारण, एरव्ही एकमेकांना न भेटणारे मूळ राजकीय प्रवाहाबाहेरचे सारे सहकारी यानिमित्ताने एकवटले होते. यात शिवसेनेबाहेर पडून सध्या दुसºया पक्षात असलेले जसे होते तसेच शिवसेनेत कायम असलेलेही होते. फरक इतकाच की ते विद्यमान पक्षाधारींबरोबर जमवून न घेऊ शकलेले व परिणामी पक्षात राहूनही जणू अडगळीत पडलेलेच आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या स्थानिक पक्ष नेतृत्वाबद्दलच्या चर्चेचा तडका या मिसळ पार्टीत लाभून गेला. अर्थात, शिवसेनेत अडगळीत पडल्याची व्यथा मनी बाळगणाºयांबरोबरच अन्य पक्षात जाऊनही अडगळीत पडून असलेलेच या निमित्ताने एकत्र आलेले दिसून आले, त्यामुळेही या तडक्याचा खमंगपणा लक्षवेधी ठरून गेला म्हणायचे. बागुल भाजपात भलेही प्रदेश उपाध्यक्षपदी आहेत, पण अनेक उपाध्यक्षांच्या गर्दीत त्यांना तेथे अपेक्षित सन्मान लाभणे शक्य नाही. शिवाय भाजपाचे संस्कार पचविणे हे तितकेसे सहज नक्कीच नाही. अलीकडच्या काळात भाजपाचेही काँग्रेसीकरण होत चालले आहे हा भाग वेगळा, परंतु तेथील ‘चिंतकां’ची यासंदर्भातील सद्दी अजून संपलेली नाही. परिणामी पर पक्षातून आलेल्या बागुल यांच्याकडे तसे त्रयस्थतेनेच पाहिले जाते. शिवसेनेत टिकून असलेले दत्ता गायकवाड, जयंत दिंडे यांची अवस्थाही वेगळी नाही. एकेकाळी पक्षासाठी खस्ता खाल्लेले हे नेते आज स्वपक्षात दुर्लक्षिले गेले आहेत. विनायक पांडे स्वभावत: शिवसैनिक असले तरी मध्यंतरीच्या काळात त्यांनीही धरसोडीचे राजकारण केले, त्यामुळे तेही बाजूला पडल्यासारखे आहेत. अशा पार्श्वभूमीवर या साºयांची मांदियाळी जमून आल्यानेच ती चर्चेत ठरली. आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांची पार्श्वभूमी त्यास असेलही, परंतु या साºयांचे अराजकीय मैत्र हा कौतुकाचा विषय न ठरता त्यांच्या एकत्रिकरणातून निरनिराळे अर्थ काढले जातात तेव्हा संबंधितांची व त्यांच्या पक्षनिष्ठेबद्दलची विश्वासार्हताही पणास लागते आणि तोच यातील खरा मुद्दा आहे. कारण मिसळ पार्टीच्या निमित्ताने राजकीय सरमिसळ झालेल्यांची ‘मन की बात’ वेगळीच असली आणि पूर्वीचे दिन आता राहिले नाहीत, असाच त्यामागील समान धागा राहिल्याचे पाहता, त्यातून तसाच अर्थ प्रसृत होणे व विश्वसार्हतेचीही चर्चा घडून येणे क्रमप्राप्त ठरते.