शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शिवसैनिकांसाठी ‘मिसळ पार्टी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 01:16 IST

नाशिक : गेल्या विधानसभा निवडणुकीत शहरातील तिन्ही मतदारसंघांवर भाजपाने बाजी मारल्याने त्याचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेने शहरातील तिन्ही मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले असून, त्यासाठी पक्षापासून काही कारणास्तव दुरावलेल्या माजी शाखा प्रमुख, पदाधिकारी, माजी नगरसेवक अशांना जवळ करण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात ‘मिसळ पार्टी’चे आयोजन करण्यावर शनिवारी संपर्क प्रमुखांनी शिक्कामोर्तब केले. पश्चिम मतदारसंघात झालेल्या ‘मिसळ पार्टी’च्या निमित्ताने पक्षांतर्गत गटबाजीला यापुढे थारा नको, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

ठळक मुद्देभाजपाला शह : जुन्या पदाधिकाºयांना आणणार प्रवाहातपक्षापासून दूर गेलेल्या माजी शाखाप्रमुख, पदाधिकारी, माजी नगरसेवकांची मनधरणी

नाशिक : गेल्या विधानसभा निवडणुकीत शहरातील तिन्ही मतदारसंघांवर भाजपाने बाजी मारल्याने त्याचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेने शहरातील तिन्ही मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले असून, त्यासाठी पक्षापासून काही कारणास्तव दुरावलेल्या माजी शाखा प्रमुख, पदाधिकारी, माजी नगरसेवक अशांना जवळ करण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात ‘मिसळ पार्टी’चे आयोजन करण्यावर शनिवारी संपर्क प्रमुखांनी शिक्कामोर्तब केले. पश्चिम मतदारसंघात झालेल्या ‘मिसळ पार्टी’च्या निमित्ताने पक्षांतर्गत गटबाजीला यापुढे थारा नको, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.शनिवारी सातपूरच्या एका लॉन्सवर पश्चिम म्हणजेच सिडको-सातपूर मतदारसंघातील शिवसैनिकांसाठी ‘मिसळ पार्टी’चे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी नाशिक भेटीवर येऊन गेलेले उत्तर महाराष्टÑ संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत यांनी ‘मिसळ पार्टी’ला कार्यकर्ते पक्षाशी जोडण्याची जोड देऊन त्याचे कौतुक केले होते व अशा पार्टीला आपण स्वत: उपस्थित राहणार असल्याचे जाहीर केल्याने शनिवारच्या मिसळ पार्टीला संजय राऊत यांच्यासह जिल्हा संपर्क नेते आमदार अजय चौधरी हेदेखील उपस्थित होते.साधारणत: दीडशेहून अधिक जुने, निष्ठावंत शिवसैनिकांची यादी तयार करून त्यांना ‘मिसळ पार्टी’चे घरपोच निमंत्रण देण्यात आले व त्यांना शनिवारच्या मिसळ पार्टीत आदराचे स्थान देण्यात आले. काही कारणास्तव पक्षापासून दुरावले असलेले किंवा गटबाजीमुळे दूर गेलेल्यांचा सत्कारही यावेळी पक्ष नेत्यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी बोलताना खासदार राऊत यांनी, महापालिका निवडणुकीत काय झाले ते विसरून व झालेल्या पराभवाची कारणमीमांसा करण्यापेक्षा आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला आत्तापासूनच लागण्याचे आवाहन केले. लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्यात मिसळा व त्यांची कामे करा, असा सल्ला देऊन ‘मिसळ पार्टी’ही मनोमीलनासाठी उपयुक्त असून, त्यात गटबाजीला थारा नको, प्रत्येक मतदारसंघात असा उपक्रम राबविला जावा व अशा पार्टीला आपण स्वत: उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सागिंतले. यावेळी आमदार चौधरी यांनीही मार्गदर्शन केले. आगामी काळात नाशिक मध्य, नाशिक पूर्व या मतदारसंघात ‘मिसळ पार्टी’चे आयोजन करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. जुन्या सैनिकांना साथ या मिसळ पार्टीच्या निमित्ताने शिवसेनेने विधानसभा व लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे मानले जात असून, त्याची सुरुवात १९८२ पासून शिवसेनेत सक्रिय असलेले परंतु विविध कारणास्तव पक्षापासून दूर गेलेल्या माजी शाखाप्रमुख, पदाधिकारी, माजी नगरसेवकांची मनधरणी करण्यात आली आहे.