शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

जातीचे दाखले देताना चुकीचे उल्लेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:14 IST

अकरावी प्रवेशासाठी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे जातीचे दाखले बनविण्याची प्रक्रिया महा-ई-सेवा केंद्रांच्या माध्यमातून सुरू असून, असंख्य दाखले प्रांताधिकारी कार्यालयात बनविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नाशिक : अकरावी प्रवेशासाठी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे जातीचे दाखले बनविण्याची प्रक्रिया महा-ई-सेवा केंद्रांच्या माध्यमातून सुरू असून, असंख्य दाखले प्रांताधिकारी कार्यालयात बनविण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र अनुसूचित जातीचे दाखविले बनविताना बौद्ध धर्माचा उल्लेख न करता दाखल्यावर १९५६ पूर्वीच्या जातीचा उल्लेख केला जात असल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. या प्रकरणाची कोणतीही माहिती प्रांताधिकारी कार्यालयाला नसल्याचे बोलले जात आहे.  दहावीतून अकरावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शहरातील विविध महा-ई-सेवा केंद्रांच्या माध्यमातून जातीचे दाखले बनविण्याची प्रक्रिया पूर्ण होत आहे, तर अजूनही मोठ्या प्रमाणात दाखल्यांसाठीचे अर्ज दाखल झालेले आहेत. या केेंद्रांकडून आॅनलाइन पद्धतीने असंख्य अर्ज दाखले बनविण्यासाठी प्रांत कार्यालयात पाठविण्यात आलेले आहेत. परंतु ज्या अनुसूचित जाती संवर्गातील बौद्ध धर्माच्या उमेदवारांनी सर्व कागदपत्रे दिलेली असतानाही त्यांना ‘महार’ अशा जातीचे प्रमाणपत्र वितरित केले जात आहे. वास्तविक १९५६ च्या कायद्यानुसार त्यात बदल करण्यात आला असून, ‘महार’ ऐवजी ‘बुद्धिस्ट’ शब्द वापरण्याचा कायदा संमत झालेला असतानाही जातीचे दाखल देताना चुकीच्या पद्धतीने शब्दप्रयोग केले जात असल्याच्या तक्रारी पालकांनी केलेल्या  आहेत.  यासंदर्भात अनेक पालकांनी विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना कोणतेही समाधानकारक उत्तर देण्यात आलेले नाही. अनेक पालकांनी पुरावे देऊनही त्यांचा ५० वर्षांचा पुरावा ग्राह्य धरताना १९५६ नंतर झालेल्या बदलाची नोंदच घेतली जात नसल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे कागदपत्रांची पाहणी करताना संबंधित यंत्रणा केवळ विद्यार्थ्याच्या आजोबांच्या जातीच्या दाखल्यावरील जात ग्राह्य धरत आहेत.  जो दाखल १९५६ पूर्वीचा आहे तोच पुरावा ग्राह्य धरला जात आहे. यास पालकांनी आक्षेप घेतला असून, दाखले देताना ‘बौद्ध’ असा उल्लेख टाळला जात असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.  या प्रकरणी काही मागासवर्गीय सामाजिक संघटनांनी मागीलवर्षी आवाज उठविला होता, तेव्हा तत्काळ बदल करण्यात आला होता. परंतु यावर्षी पुन्हा असाच प्रकार सुरू झाल्यामुळे अनेक पालक आणि मागासवर्गीय संघटनांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.विलंब होण्याची धमकीचसध्या याबाबत कोणताही बदल करणे शक्य नसल्याचे सांगून येथील काही जबाबदार अधिकाºयांनी जातीच्या दाखल्यातील बदलाबाबत आग्रह धरल्यास विद्यार्थ्यांना दाखला मिळण्यास विलंब होण्याची भीती घातली जात आहे. वास्तविक संबंधितांनी त्रुटी दुरुस्तीसाठीची व्यवस्था करणे तसेच नवीन दाखल्यांमधील त्रुटी दूर करण्यासाठी निर्णय घेणे अपेक्षित असताना सदर प्रकरण बेजबाबदार पद्धतीने हाताळले जात आहे. या प्रकरणी तक्रारी आणि विरोध वाढल्यास याच कार्यालयाचे कामकाज अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आताच योग्य तो बदल करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय