शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

मुरंबी ते भागओहळ रस्त्याची दयनीय अवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 18:19 IST

वेळुंजे :त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तसेच हरसूल भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा समजला जाणारा मुरंबी ते भागओहळ रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत असून सदर रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देप्रवाशांना मनस्ताप : दुरुस्तीची मागणी

वेळुंजे :त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तसेच हरसूल भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा समजला जाणारा मुरंबी ते भागओहळ रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत असून सदर रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.हरसूल शहरापासून शिरसगावमार्गे मुरंबी ते भागओहळ तसेच अन्य गावांना जोडणारा एकमेव मार्ग आहे. जेमतेम चार किलोमीटरचे अंतर असलेल्या या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यात लहानमोठे खड्डे निर्माण झाल्याने रस्ता की खड्डा अशी शंका येण्याइतपत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.रस्त्यावरील खडीही मोठ्या प्रमाणावर उखडलेली असल्याने मोटारसायकलस्वारांची वाहन चालविताना फजिती होऊन लहान - मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत आहे. तसेच चारचाकी वाहनधारकांना हा रस्ता डोकेदुखी ठरत आहेत. या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्यांना खड्ड्यांमुळे शारीरिक व्याधी जडत असून वाहनांचेही नुकसान होत आहे. दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचा असल्याने या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. रस्त्याऐवजी वाहनधारकांवर साईटपट्टीचा वापर करण्याची वेळ आली आहे. हा रस्ता दुरवस्थेमुळे नागरिकांना असून अडचण नसून खोळंबा ठरत आहे.संबंधित विभागाने तसेच लोकप्रतिनिधींनी रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad safetyरस्ते सुरक्षा